Skip to main content

मुख्यमंत्री साहेब आमाच्याकडेही लक्ष असु द्या! होमगार्ड वर्धापण दिनी व्यक्त झाल्या भावना

 


(किनवट बातमीदार) ता.२२


किनवट येथील होमगार्ड तालुका समादेशक कार्यालया तर्फे ७८ व्या वर्धापण दिना निमित्त रस्त्याच्या मुख्य मार्गाने रूट मार्च काढण्यात आला व शासकीय क्रिडा संकुल येथे परेड घेण्यात आला.

या वेळी तालुका समादेशक अधिकारी संजय कोंडापलकुलवार, अंशकालीन लिपिक प्रल्हाद एडके, सार्जंट मेजर सय्यद फेरोज अली, सेक्शन लिडर ज्ञानेश्वर सुर्यवंशी, दिपक भास्कर पत्की, माया येरेकार, सुनिता मंत्रीवार, यमुना कुमरे, ज्योती कांबळे तथा सर्व होमगार्ड पथक कर्मचारी उपस्थित होते.



▪️प्रतिक्रिया-

होमगार्डच्या मानधनात वाढ केली गेली तरीही शासनाने आम्हाला 365 दिवस ड्युटी लावून सहकार्य करावे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणेआम्हालाही सवयी सुविधा द्याव्या आम्ही घरी जातो तेव्हा आम्हाला लेकरे विचारतात बाबा आमच्यासाठी काय आणलं तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी येतं शासनाने आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घ्यावे तसेच सेवा निवृती नंतर पेंशन द्यावे व आमचा प्रश्न मिटवावा- होमगार्ड मुंडे


▪️ आम्ही एवढ्या वर्षा पासुन जिवाची पर्वा न करता घरदार लेकर बाळ सोडून होमगार्ड मध्ये मानधन तत्वावर नोकरी करत आहोत परंतु आम्हाला इतर शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे मान सन्मान वागणुक मिळावी हि आमची माफक अपेक्षा आहे कोणताही सण असो उत्सव असो सर्वांच्या पुढे जाऊन आम्ही ड्युटी करतो आमची एकच मागणी आहे की मुख्यमंत्री साहेबांनी आमच्याकडे लक्ष देवुन आमचे प्रश्न त्वरीत सोडवावे आमचा गांभीर्याने विचार करावा - महिला होमगार्ड सुनिता मंत्रीवार


▪️ आज ७८ वर्षा झाले शासनाने आजही होमगार्ड अनेक सुविधा पासुन वंचीत आहे आमचा विचार करावा- माया गौतम येरेकार

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.