Skip to main content

पुस्तक परीक्षण “ भारतीय परिप्रेक्ष्यातील समाजशास्त्रीय विचारांचे मूलाधार ” ; समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त व संदर्भयुक्त ग्रंथ पुस्तकपरीक्षण - डॉ. प्रकाश खेत्री




 “ भारतीय परिप्रेक्ष्यातील समाजशास्त्रीय विचारांचे मूलाधार ” ;

समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त व संदर्भयुक्त ग्रंथ

                                                                      पुस्तकपरीक्षण - डॉ. प्रकाश खेत्री

लेखक :- डॉ. हेमंत सोनकांबळे

प्रकाशक :- कैलास पब्लिकेशन, छत्रपती संभाजीनगर

प्रकाशन तारीख :- 12 ऑक्टोबर, 2024

पृष्ठ संख्या :- 290

किंमत :- ₹ 350                   

                             समाजशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे प्राध्यापक डॉ. हेमंत सोनकांबळे यांचे “भारतीय परिप्रेक्ष्यातील समाजशास्त्रीय विचारांचे मूलाधार” हे पुस्तक विशेषत : एन.ई.पी. २०२०, सी.बी.सी.एस./यु.जी.सी. अभ्यासक्रमावर आधारित आहे. हे पुस्तक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  आणि महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांच्या बी.ए. आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय, SET/NET आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातही हे पुस्तक अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. या पुस्तकात समाजशास्त्राचे विविध दृष्टिकोन, भारतीय सामाजिक विचारवंतांची भूमिका आणि आधुनिक समाजशास्त्राचे परिप्रेक्ष्य मांडले गेले आहेत.

                        महात्मा जोतीराव फुले कला व विज्ञान महाविद्यालय, गोकुंदा (किनवट) येथे समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले लेखक, आमचे मित्र, डॉ. हेमंत लक्ष्मणराव सोनकांबळे हे समाजशास्त्र विषयाचे अभ्यासक असून शिक्षण, संशोधन आणि सामाजिक परिवर्तन या क्षेत्रांत त्यांचे अनमोल योगदान आहे. ते कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषदेचे राज्य सचिव आहेत, त्यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समाजशास्त्र विषयक २९ शोधनिबंध सादर केले आहेत. फुले-शाहू-आंबेडकर चळवळींचे तसेच आदिवासी प्रश्नांचे ते  अभ्यासक  आहेत. आदिवासी गोंड जमतीवर त्यांनी संशोधन केले आहे. याशिवाय 'समाजशास्त्र परिचय आणि सामाजिक संस्था' (२०१४), 'पाचात्य समाजशास्त्रीय विचारवंत' (२०१८) हे समाजशास्त्राचे तर 'जाती अंताची लढाई' (२०२१) कविता संग्रहाचे लेखन त्यांच्या नावे आहे. 

                 समाजशास्त्र हे मानवजातीच्या उत्क्रांतीपासूनच आपल्या सभोवतालच्या समाज व जगाला जाणून घेण्यासाठी महत्त्वाचे शास्त्र आहे. याच अनुषंगाने “भारतीय परिप्रेक्ष्यातील समाजशास्त्रीय विचारांचे मूलाधार” हे पुस्तक भारतीय समाजशास्त्रीय विचारांना एक सुस्पष्ट चौकट प्रदान करते. या पुस्तकात भारतीय समाजशास्त्रातील सामाजिक  विचारवंतांच्या विचारांची सखोल मांडणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक प्रकरणात महत्त्वपूर्ण सामाजिक विचारवंतांचे जीवनचरित्र, कार्य, विचार आणि योगदान यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. प्रमुख प्रकरणांमध्ये महात्मा जोतीराव फुले यांचे शेतकरी, शिक्षण व धर्मसुधारणांसाठीचे योगदान, अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न याची मांडणी केली आहे, राजर्षी शाहू महाराज यांचे आरक्षण विषक धोरण, सामाजिक समता, शैक्षणिक धोरण व महिलांसाठी केलेले महत्त्वाचे कार्य याची माहिती दिली आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्यायाची वैचारिक भूमिका, जाती व्यवस्थेवर सखोल अभ्यास, कामगार कल्याण आणि संविधान निर्मितीतील योगदानाचा आढावा घेतला आहे. या शिवाय महाराजा सयाजीराव गायकवाड, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. गोविंद सदाशिव घुर्ये, डॉ. एम.एन. श्रीनिवास, डॉ. इरावती दिनकर कर्वे, डॉ.ए.सी.दुबे आदींचे जीवनचरित्र,कार्य आणि योगदान यांची विस्तृतपणे मांडणी केली आहे. पुस्तकातील दुसरे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे समाजशास्त्रज्ञांचा सिद्ध्न्ताचे विश्लेषणही अत्यंत तपशीलवार आहे. हे पुस्तक समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी केवळ एक शैक्षणिक साधन नाही, तर सामाजिक परिवर्तनाच्या व  बदलांच्या गतीला समजून घेण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. या पुस्तकाची भाषा सोपी, प्रवाही व अभ्यासकांना आकलन होईल अशी आहे. प्रकरणांची सुलभ आणि स्पष्ट भाषेत मांडणी, गुंतागुंतीच्या संकल्पनांना सोप्या शब्दांत समजावून देण्याचा कौशल्यपूर्ण प्रयत्न केला आहे. लेखकाने विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून लेखन केले आहे. विचारवंतांचे जीवनचरित्र, विचार, तत्त्वज्ञान, सिद्धांत व संकल्पना सहज समजावून देण्यात लेखक यशस्वी ठरले आहेत.

                          डॉ. हेमंत सोनकांबळे यांचे “भारतीय परिप्रेक्ष्यातील समाजशास्त्रीय विचारांचे मूलाधार” हे पुस्तक समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असून आजच्या समाजात सामाजिक विषमता, धर्म, भाषा व जातीवाद आणि भेदभावावर आधारित समाजात अनेक  सामाजिक समस्या दिसून येतात,या समस्यांवर वैचारिक आणि सैद्धांतिक दृष्टिकोनातून उपाय सुचवण्यासाठी या पुस्तकातील विचारवंतांचे विचार आणि  भूमिका महत्त्वाच्या  ठरतील  असा विश्वास वाटतो. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सामाजिक चळवळी क्षीण झाल्या आहेत, त्या गतिमान करण्यास या विचारवंतांचे विचार मदत करतील असी आशा वाटते. NEP 2020 च्या अनुषंगाने भारतीय समाजशास्त्राचे मूलभूत विचार, संकल्पना आणि तत्त्वज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य हे पुस्तक यशस्वीरीत्या करेल, या बाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. हे पुस्तक समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी आणि प्राध्यापिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ते प्रत्येकाने खरेदी करून आपल्या संग्रही ठेवावे असे आहे.


                                         पुस्तक परीक्षण,

                                        डॉ. प्रकाश खेत्री,

                                            अध्यक्ष

                           कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषद, 

                                            महाराष्ट्र


                          ===================

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...