Skip to main content

पुस्तक परीक्षण “ भारतीय परिप्रेक्ष्यातील समाजशास्त्रीय विचारांचे मूलाधार ” ; समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त व संदर्भयुक्त ग्रंथ पुस्तकपरीक्षण - डॉ. प्रकाश खेत्री




 “ भारतीय परिप्रेक्ष्यातील समाजशास्त्रीय विचारांचे मूलाधार ” ;

समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त व संदर्भयुक्त ग्रंथ

                                                                      पुस्तकपरीक्षण - डॉ. प्रकाश खेत्री

लेखक :- डॉ. हेमंत सोनकांबळे

प्रकाशक :- कैलास पब्लिकेशन, छत्रपती संभाजीनगर

प्रकाशन तारीख :- 12 ऑक्टोबर, 2024

पृष्ठ संख्या :- 290

किंमत :- ₹ 350                   

                             समाजशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे प्राध्यापक डॉ. हेमंत सोनकांबळे यांचे “भारतीय परिप्रेक्ष्यातील समाजशास्त्रीय विचारांचे मूलाधार” हे पुस्तक विशेषत : एन.ई.पी. २०२०, सी.बी.सी.एस./यु.जी.सी. अभ्यासक्रमावर आधारित आहे. हे पुस्तक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  आणि महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांच्या बी.ए. आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय, SET/NET आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातही हे पुस्तक अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. या पुस्तकात समाजशास्त्राचे विविध दृष्टिकोन, भारतीय सामाजिक विचारवंतांची भूमिका आणि आधुनिक समाजशास्त्राचे परिप्रेक्ष्य मांडले गेले आहेत.

                        महात्मा जोतीराव फुले कला व विज्ञान महाविद्यालय, गोकुंदा (किनवट) येथे समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले लेखक, आमचे मित्र, डॉ. हेमंत लक्ष्मणराव सोनकांबळे हे समाजशास्त्र विषयाचे अभ्यासक असून शिक्षण, संशोधन आणि सामाजिक परिवर्तन या क्षेत्रांत त्यांचे अनमोल योगदान आहे. ते कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषदेचे राज्य सचिव आहेत, त्यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समाजशास्त्र विषयक २९ शोधनिबंध सादर केले आहेत. फुले-शाहू-आंबेडकर चळवळींचे तसेच आदिवासी प्रश्नांचे ते  अभ्यासक  आहेत. आदिवासी गोंड जमतीवर त्यांनी संशोधन केले आहे. याशिवाय 'समाजशास्त्र परिचय आणि सामाजिक संस्था' (२०१४), 'पाचात्य समाजशास्त्रीय विचारवंत' (२०१८) हे समाजशास्त्राचे तर 'जाती अंताची लढाई' (२०२१) कविता संग्रहाचे लेखन त्यांच्या नावे आहे. 

                 समाजशास्त्र हे मानवजातीच्या उत्क्रांतीपासूनच आपल्या सभोवतालच्या समाज व जगाला जाणून घेण्यासाठी महत्त्वाचे शास्त्र आहे. याच अनुषंगाने “भारतीय परिप्रेक्ष्यातील समाजशास्त्रीय विचारांचे मूलाधार” हे पुस्तक भारतीय समाजशास्त्रीय विचारांना एक सुस्पष्ट चौकट प्रदान करते. या पुस्तकात भारतीय समाजशास्त्रातील सामाजिक  विचारवंतांच्या विचारांची सखोल मांडणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक प्रकरणात महत्त्वपूर्ण सामाजिक विचारवंतांचे जीवनचरित्र, कार्य, विचार आणि योगदान यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. प्रमुख प्रकरणांमध्ये महात्मा जोतीराव फुले यांचे शेतकरी, शिक्षण व धर्मसुधारणांसाठीचे योगदान, अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न याची मांडणी केली आहे, राजर्षी शाहू महाराज यांचे आरक्षण विषक धोरण, सामाजिक समता, शैक्षणिक धोरण व महिलांसाठी केलेले महत्त्वाचे कार्य याची माहिती दिली आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्यायाची वैचारिक भूमिका, जाती व्यवस्थेवर सखोल अभ्यास, कामगार कल्याण आणि संविधान निर्मितीतील योगदानाचा आढावा घेतला आहे. या शिवाय महाराजा सयाजीराव गायकवाड, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. गोविंद सदाशिव घुर्ये, डॉ. एम.एन. श्रीनिवास, डॉ. इरावती दिनकर कर्वे, डॉ.ए.सी.दुबे आदींचे जीवनचरित्र,कार्य आणि योगदान यांची विस्तृतपणे मांडणी केली आहे. पुस्तकातील दुसरे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे समाजशास्त्रज्ञांचा सिद्ध्न्ताचे विश्लेषणही अत्यंत तपशीलवार आहे. हे पुस्तक समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी केवळ एक शैक्षणिक साधन नाही, तर सामाजिक परिवर्तनाच्या व  बदलांच्या गतीला समजून घेण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. या पुस्तकाची भाषा सोपी, प्रवाही व अभ्यासकांना आकलन होईल अशी आहे. प्रकरणांची सुलभ आणि स्पष्ट भाषेत मांडणी, गुंतागुंतीच्या संकल्पनांना सोप्या शब्दांत समजावून देण्याचा कौशल्यपूर्ण प्रयत्न केला आहे. लेखकाने विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून लेखन केले आहे. विचारवंतांचे जीवनचरित्र, विचार, तत्त्वज्ञान, सिद्धांत व संकल्पना सहज समजावून देण्यात लेखक यशस्वी ठरले आहेत.

                          डॉ. हेमंत सोनकांबळे यांचे “भारतीय परिप्रेक्ष्यातील समाजशास्त्रीय विचारांचे मूलाधार” हे पुस्तक समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असून आजच्या समाजात सामाजिक विषमता, धर्म, भाषा व जातीवाद आणि भेदभावावर आधारित समाजात अनेक  सामाजिक समस्या दिसून येतात,या समस्यांवर वैचारिक आणि सैद्धांतिक दृष्टिकोनातून उपाय सुचवण्यासाठी या पुस्तकातील विचारवंतांचे विचार आणि  भूमिका महत्त्वाच्या  ठरतील  असा विश्वास वाटतो. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सामाजिक चळवळी क्षीण झाल्या आहेत, त्या गतिमान करण्यास या विचारवंतांचे विचार मदत करतील असी आशा वाटते. NEP 2020 च्या अनुषंगाने भारतीय समाजशास्त्राचे मूलभूत विचार, संकल्पना आणि तत्त्वज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य हे पुस्तक यशस्वीरीत्या करेल, या बाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. हे पुस्तक समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी आणि प्राध्यापिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ते प्रत्येकाने खरेदी करून आपल्या संग्रही ठेवावे असे आहे.


                                         पुस्तक परीक्षण,

                                        डॉ. प्रकाश खेत्री,

                                            अध्यक्ष

                           कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषद, 

                                            महाराष्ट्र


                          ===================

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.