Skip to main content

"गोंडर' कादंबरीला शब्दवेल "स्व.नर्मदाबाई तु.धर्माळे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार" जाहीर..



○ 21/22 डिसेंबर रोजी सातारा येथे वितरण

○ मा.लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते 

नांदेड-

आज सर्जनशील शब्दवेल,पनवेल. या नामांकित संस्थेचा अतिशय सन्मानाचा स्व. नर्मदाबाई तू धर्माळे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार-2024 सन्मानाचा पहिला पुरस्कार 'गोंडर' या बहुचर्चित कादंबरीला जाहीर झाला आहे.

दिनांक 21 आणि 22 रोजी सातारा येथे होणाऱ्या सर्जनशील शब्दवेल साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. 'गोंडर' कादंबरीला मिळालेला हा 24 वा राज्यस्तरीय पुरस्कारासून गोंडर ही कादंबरी महाराष्ट्र/ कर्नाटक/ गुजरात/ मध्य प्रदेश अशा विविध राज्यासोबत जपान /कॅनडा/ मलेशिया/ सिंगापूर/ युके अशा विविध देशांमध्ये सुद्धा वाचकांची आवडीची ठरली आहे.'गोंडर' कादंबरीला परवाच गडचिरोली येथील 'महामृत्युंजय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार' जाहीर झाला आहे. 15 डिसेंबर रोजी गडचिरोली येथे वितरण होणार आहे.  अनेक मान्यवर पुरस्काराने सन्मानित झालेल्या गोंडर कादंबरीला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद आणि कादंबरीची विक्रमी विक्री झाली आहे. कादंबरीने केलेले विविध प्रयोग आकाशवाणी क्रमशः वाचन अशा विविध स्वरूपातून ही कादंबरी सबंध महाराष्ट्रात मैलाचा दगड ठरली आहे. अशा बहुचर्चित कादंबरीला महाराष्ट्रातील 24 नामवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.अशोक कुबडे लिखित 'गोंडर' या कादंबरीला वाचकांचा प्रचंड  प्रतिसाद मिळत असल्याने सबंध साहित्य क्षेत्रात अशोक कुबडे यांचा गौरव आणि कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे. इसाप प्रसिद्ध केलेली ही कादंबरी आज सर्व सर्व दूर पोहोचले आहे या घवघवीत यशाबद्दल लेखक अशोक कुबडे यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

_______________________________

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...