Skip to main content

उत्तर प्रदेशातील मुस्लीम युवकाची सर्वे करण्याच्या नावाखाली हत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कार्यवाही करा- टिपु सुलतान ब्रिगेड

 


किनवट ता. प्रतिनिधी:

उत्तर प्रदेशातील संभल शहरात मस्जीदीच्या सर्वे करण्याच्या नावाखाली मुस्लिम युवकाची हत्या करण्यात आली व दंगल घडवण्यात आली  या प्रकरणी दोषी संबधित दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी यासाठी टिपु सुलतान बिगेडतर्फे  महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी मार्फत देण्यात आले .

सविस्तर माहिती अशी की उत्तर प्रदेशातील संभाल शहरात असलेल्या जमा मस्जिद चे सर्वे करण्यासाठी प्रशासन आले होते त्याचवेळी काही दंगल खोरांनी तेथे येऊन मुस्लिम समाजाचे विरोधात घोषणाबाजी करून मस्जीदीवर तुफान दगडफेक केली मुस्लिम समाजाच्या दुकानावर घरावर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी दंगल खोरावर काही कारवाही न करता उलट मुस्लिम समुदायाच्या विरोधात एकतर्फी कारवाई करून मज्जिद्दीवर निरपराध मुस्लिम समुदाया वर गोळीबार केला या गोळीबारात पाच मुस्लिम युवकांचा जीव गेला तसेच पोलिसांनी २५०० निरप्राप मुस्लिम लोकांवर गुन्हे दाखल केले तरी उत्तर प्रदेशातील 100 शहरात दंगल घडविणाऱ्या समाजकंटकावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी तसेच निरप्राप मुस्लिम योगावर गोळीबार करून त्यांची हत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व सेवेतून बडतर्फ करण्यात यावे उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी टिपू सुलतान ब्रिगेड शाखा किनवट च्या वतीने करण्यात आली या निवेदनावर सय्यद नदीम टिपू  सुलतान ब्रिगेड जिल्हाध्यक्ष नांदेड, शेख जुबेर उपाध्यक्ष , खान शेख , नोमान शेख, फैसल शेख ,उमर शेख ,मदस्सीर शेख , शेख जावेद ,अखनीर खान, साहिल शेख, अशपाक शेख ,रेहान , वसीम भाटी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.