Skip to main content

उत्तर प्रदेशातील मुस्लीम युवकाची सर्वे करण्याच्या नावाखाली हत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कार्यवाही करा- टिपु सुलतान ब्रिगेड

 


किनवट ता. प्रतिनिधी:

उत्तर प्रदेशातील संभल शहरात मस्जीदीच्या सर्वे करण्याच्या नावाखाली मुस्लिम युवकाची हत्या करण्यात आली व दंगल घडवण्यात आली  या प्रकरणी दोषी संबधित दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी यासाठी टिपु सुलतान बिगेडतर्फे  महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी मार्फत देण्यात आले .

सविस्तर माहिती अशी की उत्तर प्रदेशातील संभाल शहरात असलेल्या जमा मस्जिद चे सर्वे करण्यासाठी प्रशासन आले होते त्याचवेळी काही दंगल खोरांनी तेथे येऊन मुस्लिम समाजाचे विरोधात घोषणाबाजी करून मस्जीदीवर तुफान दगडफेक केली मुस्लिम समाजाच्या दुकानावर घरावर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी दंगल खोरावर काही कारवाही न करता उलट मुस्लिम समुदायाच्या विरोधात एकतर्फी कारवाई करून मज्जिद्दीवर निरपराध मुस्लिम समुदाया वर गोळीबार केला या गोळीबारात पाच मुस्लिम युवकांचा जीव गेला तसेच पोलिसांनी २५०० निरप्राप मुस्लिम लोकांवर गुन्हे दाखल केले तरी उत्तर प्रदेशातील 100 शहरात दंगल घडविणाऱ्या समाजकंटकावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी तसेच निरप्राप मुस्लिम योगावर गोळीबार करून त्यांची हत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व सेवेतून बडतर्फ करण्यात यावे उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी टिपू सुलतान ब्रिगेड शाखा किनवट च्या वतीने करण्यात आली या निवेदनावर सय्यद नदीम टिपू  सुलतान ब्रिगेड जिल्हाध्यक्ष नांदेड, शेख जुबेर उपाध्यक्ष , खान शेख , नोमान शेख, फैसल शेख ,उमर शेख ,मदस्सीर शेख , शेख जावेद ,अखनीर खान, साहिल शेख, अशपाक शेख ,रेहान , वसीम भाटी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...