Skip to main content

महाविकास आघाडीचे उमेदवार मा.प्रदीप नाईक यांना अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा.

 


किनवट (प्रतिनिधी) : मागील पाच वर्षातील दिव्यांग लोकांना विद्यमान आमदार केराम कडून वेळोवेळी हक्काचा असलेल्या  स्थानिक विकास निधी वाटप साठी पाठपुरावा करूनही राखीव निधी वाटप न केल्याने आणि त्यांचे घरचे फक्तं उंबरठे झिवून आलेल्या वाईट अनुभवातून किनवट माहूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी त्यांचा अखिल भारतीय अपंग कामगार संघटना शाखा किनवट आणि माहूर संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मा.प्रदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांना अमोल कोल्हे यांचा सभेत जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

   किनवट व माहूर तालुका आदिवासी बहुल भाग म्हणून शासन दरबारी नोंद आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये किनवट व माहूर मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांच्याकडे संघटनेने वारंवार पत्रव्यवहार करून दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करण्याबाबत विनंती अर्ज सादर करूनही आमदार भीमराव केराम यांनी खर्च केले नाही.दिनांक ०१/१२/२०२२ रोजी जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडून पत्र क्र. २०५० भीमराव केराम यांना देऊन आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत दिव्यांग (नेत्रहिन,शारीरिक अपंग,मुखबधीर,कर्णबधिर,शारीरिक व मानसिक विकलांग ) यांना प्रतिवर्षी १० लक्ष रुपये खर्च करण्यासंबंधी पत्र दिले होते; परंतु आमदार भीमराव केराम यांनी त्या पत्राला केराची टोपली दाखवून दिव्यांगांवर अन्याय केल्याचे दिसून येत आहे.

  माजी आमदार प्रदीप नाईक यांनी संघटनेकडे स्वतः येऊन मी आमदार झाल्यानंतर किनवट व माहूर तालुक्यातील सर्व दिव्यांगांना न्याय मिळवून देईल असे शब्द संघटनेला दिले आहे. म्हणून संघटनेने दि १५/११/२०२४ रोजी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मा.प्रदीप नाईक रा.कॉ.प. शरदचंद्र पवार अधिकृत उमेदवार यांना अखिल भारतीय अपंग कामगार संघटना शाखा किनवट माहूर संघटनेकडून  जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...