Skip to main content

महाविकास आघाडीचे उमेदवार मा.प्रदीप नाईक यांना अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा.

 


किनवट (प्रतिनिधी) : मागील पाच वर्षातील दिव्यांग लोकांना विद्यमान आमदार केराम कडून वेळोवेळी हक्काचा असलेल्या  स्थानिक विकास निधी वाटप साठी पाठपुरावा करूनही राखीव निधी वाटप न केल्याने आणि त्यांचे घरचे फक्तं उंबरठे झिवून आलेल्या वाईट अनुभवातून किनवट माहूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी त्यांचा अखिल भारतीय अपंग कामगार संघटना शाखा किनवट आणि माहूर संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मा.प्रदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांना अमोल कोल्हे यांचा सभेत जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

   किनवट व माहूर तालुका आदिवासी बहुल भाग म्हणून शासन दरबारी नोंद आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये किनवट व माहूर मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांच्याकडे संघटनेने वारंवार पत्रव्यवहार करून दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करण्याबाबत विनंती अर्ज सादर करूनही आमदार भीमराव केराम यांनी खर्च केले नाही.दिनांक ०१/१२/२०२२ रोजी जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडून पत्र क्र. २०५० भीमराव केराम यांना देऊन आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत दिव्यांग (नेत्रहिन,शारीरिक अपंग,मुखबधीर,कर्णबधिर,शारीरिक व मानसिक विकलांग ) यांना प्रतिवर्षी १० लक्ष रुपये खर्च करण्यासंबंधी पत्र दिले होते; परंतु आमदार भीमराव केराम यांनी त्या पत्राला केराची टोपली दाखवून दिव्यांगांवर अन्याय केल्याचे दिसून येत आहे.

  माजी आमदार प्रदीप नाईक यांनी संघटनेकडे स्वतः येऊन मी आमदार झाल्यानंतर किनवट व माहूर तालुक्यातील सर्व दिव्यांगांना न्याय मिळवून देईल असे शब्द संघटनेला दिले आहे. म्हणून संघटनेने दि १५/११/२०२४ रोजी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मा.प्रदीप नाईक रा.कॉ.प. शरदचंद्र पवार अधिकृत उमेदवार यांना अखिल भारतीय अपंग कामगार संघटना शाखा किनवट माहूर संघटनेकडून  जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...