Skip to main content

साईप्रसाद जटालवार यांच्याकडून माधव मेकेवाड यांच्यावर घेण्यात आलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळले....



बहुचर्चित असलेले माधव मेकेवाड यांचा अखेर अर्ज मंजूर


भोकर:-(प्रतिनिधी)

आज दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी, ८५-मोकर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी भोकर यांचे कार्यालयातील बैठक सभागृहात प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननीची प्रक्रीया सुरु करण्यात आली. श्री माधव नरसिंग मेकेवाड या उमेदरवाराचे नामनिर्देशनपत्राची छाननी सुरु असताना आक्षेप अर्जदार यांनी श्री. माधव नरसिंग मेकेवाड यांनी दिनांक 29/10/2024 रोजी सादर केलेल्या नामनिर्देशन आक्षेप सादर करण्यात आला असे की,

माधव नरसिंग मेकेवाड यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेले शपथपत्र है निवडणूक आयोगानी निर्देशीत केलेल्या स्वरुपात (फॉरमेंट) मध्ये नाही. त्यांनी त्यांचे स्वतःच्या मनाने फॉरमॅट तयार करून काही रकाने वगळून तयार केले असून त्यामध्ये त्यांनी बरीचशी माहिती नियमाप्रमाणे लिहीलेली नाही. त्यांनी मतदारांना प्रभावीत करण्या करीता त्याच्या शपथपत्रात सर्व अवलंबीत व्यक्तींची माहिती पुर्णपणे लिहीलेली नाही. त्यामुळे त्यांचे नामनिर्देशपत्र नामंजूर करावे अशी साईप्रसाद जटालवार यांनी ऍड.सलीम (जिल्हासत्र न्यायालय,भोकर तथा दिवाणी न्यायालय)यांच्या द्वारे  विनंती केली.


उमेदवार श्री माधव नरसिंग मेकेवाड यांनी सुनावणी वकील न घेता स्वतः च उच्च शिक्षित असल्याने दरम्यान शपथपत्रातील पॅन व इतर माहिती बाबीबाबत खुलासा केला. सदर शपथपत्रातील माहिती व वरील आक्षेपानूसार संबंधीत उमेदवाराचे नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्राची पडताळणी केली असता सदरचे शपथपत्र विहीत नमुण्यात पुर्णपणे भरल्याचे दिसून येते. तसेच आक्षेपदार यांचे विधिज यांनी उमेदवाराच्या शपथपत्रातील भाग अ ७ (ब) मधील रकाना (२) व (४) मधील नमुण्या बाबत आक्षेप घेतला आहे. तथापी मा. भारत निवडणूक आयोगाने विहीत केलेल्या शपथपत्राच्या नमुण्याचे अवलोकन केले असता, आक्षेपदाराच्या म्हणण्यात तथ्य दिसुन येत नाही. तसेच मा. भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक निर्णय अधिका-यासाठी निर्देशपुस्तीका, २०२३ मधील प्रकरण-६ मधील सुचना क्र.६.१०.१ (चार) मधील निर्देशानुसार उमेदवाराने सादर केलेल्या शपथपत्रातील माहितीची सत्यता तपासण्याचे अधिकार निवडणूक निर्णय अधिकारी यांना नसल्यामुळे, त्या निकषावर नामनिर्देशनपर फेटाळू नये असे मा. भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...