जिल्हास्तरीय आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्काराने सन्मानित;
(किनवट तालुका प्रतिनिधी )
किनवट तालुक्यातील शैक्षणिक भौतिक तसेच गुणवत्ता वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करणारे विद्यार्थीप्रिय तसेच तालुक्यातील सर्वच शिक्षकांच्या मनामध्ये एक आपुलकीची जागा निर्माण करणारे कार्यतत्पर कर्तव्यदक्ष आदर्श गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा रामनाथ बने हे वयोमानानुसार ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
नांदेड जिल्हापासून जवळपास १५० किमी असणारा किनवट तालुका हा अतिशय दुर्गम डोंगरी आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो अश्या ठिकाणी बहुदा कर्मचारी अधिकारी नौकरीसाठी येणास तयार नसतात परंतु अश्या परिस्थितीत ज्ञानोबा बने यांची जिल्हा परिषद हायस्कुल चाकूर जिल्हा लातूर येथून अराजपात्रित मुख्याध्यापक पदावरून पदोन्नती मिळवून गटशिक्षणाधिकारी पंस किनवट म्हणून बढती मिळाली.
मूळचे ढाळेगाव ता.अहमदपूर जि.लातूर चे रहिवाशी असलेले ज्ञानोबा बने यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मूळ गावीच झाले त्यानंतर पदवीचे शिक्षण दयानंद महाविद्यालय लातूर तर बिएड शासकीय महाविद्यालय परभणी येथे झाले.शिक्षण पूर्ण होतच सन १९९२ साली जिल्हा परिषद हायस्कूल अंदुरी या शाळेतून त्यांच्या नौकरीची सुरुवात झाली.सन १९९२ ते २००६ पर्यंत त्यांनी सदर शाळेवर माध्यमिक शिक्षक म्हणून कर्तव्य बजावल्यानंतर त्यांची सन २००६ साली जिल्हा परिषद हायस्कूल चाकूर ता चाकूर जि.लातूर येथे अराजपत्रित मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली याच शाळेवर त्यांनी २००६ ते १६ जानेवारी २०२३ पर्यंत एक कार्यतत्पर कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक म्हणून कर्तव्य पार पाडले.आणि १७ जानेवारी २०२३ रोजी ते किनवट तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.किनवट तालुक्यातील शिवणी बिटाचे शिक्षणविस्ताराधिकारी संजय कराड यांनी गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांना सोबती सारथी बनून मोलाचे सहकार्य केले.
गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा रामनाथ बने यांच्या कार्याबद्दल व्यक्तीमत्वाबद्दल लिहावे बोलावे तेवढं कमीच आहेत शब्दालासुद्धा कोडे पडावे असे व्यक्तीमत्व गणिताचे गाढे अभ्यासक राष्ट्रीय कबड्डी,हॉलिबाल खेळाडू नेहमीच प्रसन्न मुद्रा,शांत संयमी कार्यतत्पर कर्तव्यदक्ष विद्यार्थीप्रिय तसेच अल्प काळात सर्व शिक्षक केंद्रप्रमुख शिक्षणविस्तार अधिकारी तसेच पं.स शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी यांच्या मनावर अधिराज्य मिळवले.विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले त्यांनी आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यकाळात शिक्षण विभागात निःस्वार्थ,प्रामाणिक व स्वच्छ चरित्र अबाधित ठेऊन कार्य केले.त्यांनी तालुक्यातील अनेक दुर्गम भागातील प्राथमिक माध्यमिक शाळेना भेटी देऊन तेथील विद्यार्थी शिक्षक पालक यांचे प्रश्न जाणून घेऊन ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.सेवानिवृत्त कालावधी कमी असताना सुद्धा आपल्या कुटूंबासह गोकुंदा किनवट येथे राहून शिक्षकांच्या निःस्वार्थ सेवेसाठी १४ ते १६ तास उपलब्ध राहत असत.यामुळेच ते सर्व तालुक्यातील शिक्षकांचे शिक्षकप्रिय गटशिक्षणाधिकारी ठरले.त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी जिल्हास्तरीय आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.त्यांच्या भावी सेवानिवृत्तीचा काळ निरोगी आनंददायी राहण्यासाठी प्राथमिक शिक्षक मारोती भोसले व सर्व शिक्षकवृंद यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
Comments
Post a Comment