Skip to main content

सामाजिक न्याय दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न !




 सामाजिक न्याय दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न ! 

किनवट प्रतिनिधी 

मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाडी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा, व मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोकुंदा व्दारा संचलित मातोश्री कमलताई ठमके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्य सामाजिक न्याय दिन व शालेय जीवनातील महत्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्याच्या भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या 10 वी व 12 वी परीक्षेतील गुणवंताचा व वैद्यकीय प्रवेशास पात्र विद्यार्थी तसेच त्यांच्या पाल्यांचा सत्कार समारंभ गोकुंदा रोड स्थित एन.के.गार्डन येथे संपन्न झाला.


यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. भिमराव केराम, आमदार किनवट माहूर व प्रमुख पाहुणे मा.कावलि मेघना मॅडम-सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट,

मा.सुनिल बिर्ला,पोलिस निरिक्षक पोलिस स्टेशन,किनवट, मा.राजेंद्र शेळके सहाय्यक प्रकल्प अधिकारी,मा.प्रेमसिंग आडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, मा.प्रदीप नाईक सहाय्यक प्रकल्प अधिकारी,मा.दत्तात्रय डोंगशेनवार, मा.शुभांगीताई ठमके, प्राचार्या म.ज्यो.फुले मा.व.उ.मा.वि.घोटी ता.किनवट,संस्थेचे सचिव मा.अभि प्रशांत ठमके,माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, गणु जाधव केंद्र प्रमुख,नया कॅंप  मा.संतोष मरसकोल्हे  ॲड.मिलिंद सर्पे,गोकुळ भवरे,किरण ठाकरे,दत्ता जायभाये आदी मान्यवर उपस्थित होते.


प्रारंभी मान्यवरच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमाचे दीप-धूप-पूष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर संस्थेचे सचिव मा.अभि प्रशांत ठमके व कोष्याध्यक्षा मा. शुभांगीताई ठमके यांनी मान्यवराचे शाल- पूष्पहार देवून स्वागत केले. कार्याक्रमाचे  प्रास्ताविकात प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री.अंबादास जुनगरे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत जात आहे याचे सविस्तर विवरण केले.


या सत्कार समारंभात संस्थेच्या सलंग्न असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय, गोकुंदा, महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा, मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मेडीयम स्कुल कोठारी, महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोटी, मातोश्री कमलताई ठमके माध्यमिक विद्यालय सुभाषनगर, किनवट, मातोश्री कमलताई ठमके उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा या मधील 10 वी 12 वी परीक्षेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवणारे गुणवंत, वैद्यकिय प्रवेशास पात्र गुणवंत व  पाल्यांचा सत्कार शाल, पुष्पहार व ग्रंथभेट देवून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.


महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा सेमी इंग्रजी माध्यमात एकूण 241 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 241 विद्यार्थी उत्तीर्ण झाले निकालाची टक्केवारी शंभर टक्के आहे. त्यामध्ये 90% पेक्षा जास्त गुण घेणारे तब्बल 73 विद्यार्थी आहे व 75 % पेक्षा जास्त गुण घेणारे 133 विद्यार्थी आहे. गणित व विज्ञान विषयात प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांनी शंभर पैकी 100 गुण प्राप्त केलेली आहे व एका विद्यार्थिनीने सामाजिक शास्त्रामध्ये शंभर गुण घेतलेले आहेत.


मराठी माध्यमात 165 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 163 उत्तीर्ण झाले निकालाची टक्केवारी 98.78 आहे.90% पेक्षा जास्त गुण घेणारे 7 विद्यार्थी आहेत. अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, चित्रकला परीक्षा, विज्ञान प्रदर्शनी व खेळ यामध्ये  विद्यार्थी सहभागी होत असतात यामध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच NMMS परीक्षेत तीन विद्यार्थी पात्र ठरले आहे व पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत दहा व आठ विद्यार्थी अनुक्रमे गुणवंत ठरले आहेत.


चित्रकला परीक्षेत इंटरमीडिएट मध्ये 130 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 125 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्याची टक्केवारी 96.15 आहे एलिमेंटरी या परीक्षेमध्ये 334 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 298 विद्यार्थी उत्तीर्ण झाले टक्केवारी 89.22 आहे.


उच्च माध्यमिक विभागात इयत्ता बारावी विज्ञान शाखेत 422 विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी 418 विद्यार्थी उत्तीर्ण झाले निकालाची टक्केवारी 99.05 आहे. कला विभागात 199 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 176 विद्यार्थी उत्तीर्ण झाले कला शाखेचा निकाल 88.44 आहे प्राणी विज्ञान व तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र व गणित विषयात शंभर पैकी 100 गुण विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहेत. तसेच वैद्यकीय प्रवेशास अनेक विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. आनंद राम नरवाडे हा विद्यार्थी आयआयटी गुवाहाटी येथे प्रवेशासाठी पात्र झाला आहे.


आज प्रदूषणाचे भूत सगळ्यांच्याच मानगुटीवर बसलेला आहेत त्यालाच पर्याय म्हणून कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी रामानंद अनिल शिरभाते याने एटनॉमस मोबाईल चार्जिग स्टेशन फॉर इलेक्ट्रिकल वेहिकल्स या प्रकल्पाचे राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये सादरीकरण केले, संस्थेअंतर्गत चालविल्या जाणान्या मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नो सायन्स गोकुंदा या इन्स्टिट्यूट मधून नीट परीक्षेत अगदी कमी कालावधीत विद्याथ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलेले आहे. संस्थेच्या इतर विद्यालयाने सुद्धा मार्च 2024 च्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केलेले आहेत.


मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूल गोकुंदा यामध्ये दहावीला 55 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 54 विद्याधर्थी उत्तीर्ण झाले निकालाची टक्केवारी 98.43 अशी आहे.

मातोश्री कमलताई उमके उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावीला एकूण 180 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 179 उत्तीर्ण झाले. त्यामधील नामांकित शाळेत असलेले सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले नामांकित शाळेत चा निकाल शंभर टक्के आहे याच कॉलेजचा विद्यार्थी सुयश प्रशांत ठमके हा 92.67% गुण घेऊन केवळ कॉलेजमधूनच नाही तर माहूर आणि किनवट या दोन्ही तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.तसेच उद्यानविद्या या विषयात त्याने २०० पैकी २०० गुण प्राप्त केले आहे.


संस्थेअंतर्गत चालविल्या जाणारी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय घोटी येथील दहावीचा निकाल ९४.०२ टक्के असा आहे. बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९५.८३ टक्के आहे. व कला शाखेचा निकाल 90% आहे.


 तसेच मातोश्री कमलताई ठमके विद्यालय सुभाष नगर शाळेचा निकाल यावर्षी 100% लागलेला आहे.



प्रमुख पाहूणे म्हणून आपले मनोगत मांडत असतांना मा. कावली मेघना मॅडम, सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त, सदाचार अभ्यास करण्याची जिद्द व बिकट परिस्थितीला सामोरे जाण्याचे गुण अंगीकारले पाहीजे.जेणे करूण आपले ध्येय साध्य करता येईल असा मौलीक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.


अध्यक्षिय समारोप करताना मा. आमदार भिमराव केराम यांनी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना सांगीतलेली माऱ्याच्या व मोक्याच्या जागा काबिज करा या प्ररेणादायी शब्दांची आठवण करून दिली. तसेच किनवट सारख्या आदिवासी भागात ठमके दामपत्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून जे कार्य करत आहे ते वाखण्याजोगे आहेत असे गौरवोद्गार काढले. तसेच हा गुणवंताचा सत्कार सोहळा घडवून आणला याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ व संलग्न सर्व विद्यालये व कनिष्ठ  महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.


विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत मांडतांना सुयश प्रशांत ठमके यांने आपल्या यशाचे गमक सांगत असतांना परीक्षेला आंनदी मनाने सामोरे गेले पाहिजे व कष्ट, जिद्द आणि परिश्रम ही त्रिसुत्री आपल्या जीवनात प्रत्येक विद्यार्थ्यानी राबवावी असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.सुयशने आपल्या यशाचे श्रेय अध्यापक वर्ग व आई-वडीलानां समर्पित केले.


सदरील कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन पर्यवेक्षक प्रा. संतोषसिंह बैसठाकूर यांनी केले तर आभार प्रज्ञा पाटील मॅडम यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या समारंभास मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, विद्यार्थीनी, परिसरातील नागरीक व विविध वृत्तपत्रातील पत्रकार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला