Skip to main content

@युद्ध नको, बुद्ध हवे.....



भारत देश हा असा देश आहे ईथे वैराला उत्तर मैत्री आणि प्रेम आहे. माणूस नावाचा प्राणी विभिन्न जाती-धर्मात जन्माला आलेल्या 'माणसाचा' मानव म्हणून संवेदनशील व हृदयस्पर्शी जीवन जगणे हा त्याचा मूलाधार आहे. वेळोवेळी संपूर्ण जगाला अहिंसा, करुणा व मैत्रीचा संदेश देणारी बुद्धांची ती स्थितप्रज्ञ मूर्ती सांगत असते. पण  तोफगोळय़ांचा मारा करून क्षणार्धात त्या मूर्तीची नासधूस केली जाते. 

मार्च २००१ मध्येच नव्हे तर अनेक वेळा बुद्धमूर्ती तोडण्यात आल्या.पण त्यानंतर काय घडलं नि आजला काय घडतयं, हे उभे जग पाहत आहे. द्वेषाने पेटलेला 'माणूस' नावाचा दहशतवाद अवघ्या जगासाठी धोक्याची घंटा ठरतो आहे. हा माणूस येत्या काळात काय विद्ध्वंस घडवेल, याचा काहीही नेम राहिलेला नाही. हा माणूस माणसाचा वैरी का झाला? एकमेकांच्या रक्ताची होळी खेळण्याइतपत तो हिंस्त्र व पशू का झाला? ‘माणूस’ नावाच्या जगातील सर्वात मोठय़ा धर्माला त्याचे उत्तर सापडत नाही वा त्याला ते समजून घेण्याची गरजही वाटत नसावी का?.

बुद्धत्वाची, प्रज्ञेची प्राप्ती जगातील कोणतीही व्यक्ती करू शकते का?. त्याला धर्म, भाषा, प्रांत व जातीचे कोणतेही बंधन आडवे येत नाही का?. मग, जगभर पसरलेल्या मानवी दहशतवादाचे मूळ कशात आहे? हा प्रश्न दररोज जगण्याची लढाई लढताना प्रत्येक माणसाला अस्वस्थ करतो आहे.

 दिनदर्शिकेतील प्रत्येक तारीख नि वार, कोणता, कुठे नि काय रक्तपात घडवेल हे भविष्यवेत्ता सांगू शकणार नाही. ही भीषण परिस्थिती का व कोणामुळे निर्माण झाली असावी? 

क्रौर्य आणि हिंसा हा पशूंचा धर्म आहे. विवेकी माणसाचा तो अधर्म होईल. तेव्हा क्रूर आणि हिंसक कर्म न करणे, हेच माणसाच्या सुखसमृद्धीचं मर्म आहे. सुज्ञ माणसाने दुष्टविचार व दृष्टप्रवृत्ती टाळावी, मानव धर्म पाळावा,भांडणतंटे व अशांतता यांना आळा घालावा. ते न कुणाच्याही हिताचे हे जाणावे. माणसाने माणसाला का आणावा कमीपणा? संपूर्ण विश्वात शांतता नांदण्यासाठी ‘मानवधर्म’आपणाला सदैव हीच शिकवण देतं राहते. त्यानंतरही दहशतवाद उफाळून येतोच.


माणसाने माणसांवर केलेल्या हल्ल्यात अनेक लोक मृत्युमुखी पडतात. मृतांना श्रद्धांजली आणि कँडलमार्च निघतो. काळा दिवस म्हणून बर्याच तारखांची नोंदही होते परंतु जग आणि माणूस कुठेच थांबत नाही. असं हे चक्र सुरू राहत आहे . भारतातील अनेक राज्यांत तसेच मुंबई, राजस्थान, दिल्ली, हैदराबाद या प्रमुख शहरांत दहशतवाद्यांनी घडवून आणलेला रक्तपात. बॉम्बस्फोट मालिकां किडय़ा-मुंग्यांप्रमाणे माणसं मारणे इतकी मानवी दहशत पसरली आहे. पशूहून हिंस्त्र झालेला माणूस एकमेकांच्या जीवावर उठला आहे. युद्ध हाच त्याला पर्याय वाटू लागला आहे. द्वेषाला उत्तर द्वेष, हेच त्याच्या डोक्यात भिनले आहे.

 प्रत्येक माणसांतील मानवहित जपणारा आणि मानवधर्म हाच जगात सर्वश्रेष्ठ मानणारा बुद्धाचा शांतीचा 'सन्मार्ग' तो स्वीकारेल का?

अवघ्या जगाला शांती, प्रज्ञा आणि मैत्रीची शिकवण देणा-या तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या भारत देशात‘असहिष्णुते' ने वातावरण गढूळ केलं आहे. नाना जातींचा, नाना धर्माचा, विविध भाषा बोलणारा भारत देश स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेच्या पायावर टिकून आहे. भारतीय संविधान हा पवित्र ग्रंथ आपणा सर्वाना देशधर्म सांगत आहे,‘मी कोणत्याही जात, धर्माचा असलो तरी ‘मी प्रथम भारतीय व अंतिमही भारतीय आहे' हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. भारतात धर्म नि जातीच्या नावाने आपसात युद्ध घडवणे सहज सोपे हे ज्यांना ठाऊक आहे. ते माणसा-माणसांत आग लावून देण्याचे काम करत आहेत.

‘असहिष्णू’ या शब्दाभोवती सध्या देशाचे राजकारण नि समाजकारण फिरतं आहे. समाजवाद व धर्मनिरपेक्षतेची व्याख्या शोधण्याचा प्रयत्न स्वातंत्र्याच्या नंतर का होईना, सुरू झाला आहे. धर्मनिरपेक्षतेची व्याख्या जो-तो आपल्या परीने करत आहे. काहींना भारतीय राज्यघटनेमुळे मिळालेल्या संविधानात्मक पदाचाही आदर राखणेही अवघड जात आहे.

देशात ‘धर्मयुद्ध'  पेटण्यास या नेते मंडळी खतपाणी घालण्यात  नाहीत का?‘असहिष्णुता ' म्हणजे काय रे भाऊ..! असा सवाल देशातील गरीब, कष्टक-यांना पडला आहे.

 भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून काही ‘वाचाळवीरांची' फौज देशातील सामाजिक सलोखा बिघडवत आहेत. विविधतेत एकता सांगणारा नि ‘मानवधर्म’ जोपासणारा आपला भारत देश संपूर्ण जगासाठी आदर्श.

इथे विज्ञानवाद जवळ करणारा, अहिंसा, प्रज्ञा, मैत्री आणि करुणा हा युद्धापासून परावृत्त करणारा बुद्धांचा मार्ग आहे. प्रत्येकाने मानवधर्मातील परिवर्तनाचा रथ पुढे झाल्या म्हणून या रथाचे सारथ्य करावे, 

जात, वंश, लिंग, भेदाच्या भिंती येथे कोसळून पडाव्यात. सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या भारतभूमीत आपसातील युद्धाची भाषा थांबावी. हा शांती व ममतेचा संदेश घेऊन जगात शांतता प्रस्थापित होण्यासाठी भारतात ‘शांतिदूत’निर्माण  होण्याची गरज  आहे.



रूचिरा शेषराव बेटकर,नांदेड

9970774211

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला