Skip to main content

संस्कृती चे जतन करण्यासाठी जीवन भर समाज प्रबोधन करणारे:- किर्तनकार सत्यपाल महाराज..


किनवट (तालुका प्रतिनिधी) माझ्या महाराष्ट्रातील तमाम वाचक बांधवांनो आज वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती प्रत्येक भारतीयाच्या अंगी यावी यासाठी सतत प्रयत्न करणारे तथा कीर्तनातून प्रबोधन करणारे आदरणीय सत्यपाल महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या समाजप्रबोधन कार्या विषयी आज लेखक त्यांच्या शब्दरूपी भावनेतून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे जर वाचकाच्या जीवनात या लेखाच्या माध्यमातून आपल्या भारतीय  संस्कृतीच्या वारसाचे जतन करण्याची मनोवृत्ती निर्माण झाल्यास त्या मनोवृत्ती मध्ये लेखकाचा फक्त आणि फक्त खारीचा वाटा असेल हे मात्र निश्चित मित्रांनो आज आपण अशा महा प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज यांच्या विषयी जाणून घेणार आहोत सत्यपाल महाराज यांनी 

महामानवांच्या विचार आणि कार्याचा वारसा चालविणारे ,पंधरा हजार पेक्षा जास्त किर्तनातून लोकांच्या वर्तनात परिवर्तन घडून आणणारे , समाजप्रबोधनकार मा.सत्यपाल महाराज प्रत्येक नागरिकांनी संविधानाचे पालन करावे संविधानातील आदर्शाचा सन्मान करावा हे आपल्या कीर्तनातून समाजाला सांगणारे आदरणीय सत्यपाल महाराज. 

मानवाची प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न समाजाने करावा हे सांगणारे सत्यपाल महाराज. आपल्या पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्या व ती सर्व पालकांनी करून दिलीच पाहिजे ही भावना जनसामान्यात निर्माण करणारे आदरणीय सत्यपाल महाराज. ज्या ज्या महामानवाने गुलामगिरीतून मानवाला स्वातंत्र्याकडे परावर्तन केले त्यांची महिमा आपल्या शब्दरूपी भावनेतून समाजापर्यंत पोहोचवणारे आदरणीय सत्यपाल महाराज. देशाचे तथा समाजाचे अखंडत्व कसे राहील यांची काळजी घेऊन समाज प्रबोधन करणारे आदरणीय सत्यपाल महाराज. सर्व प्रकारचे भेद विसरून समाजामध्ये एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना निर्माण व्हावी तसा निर्माण झालेली भावना जोपासण्यात यावी तथा समाजातील स्त्रियांचा प्रतिष्ठेला कुठेही कमीपणा येणार नाही या दृष्टिकोनातून समाजाचे प्रबोधन करणारे आदरणीय सत्यपाल महाराज. देशामध्ये लाभलेल्या नैसर्गिक साधन संपत्ती तथा पर्यावरणाचे सर्वच मानवाने संरक्षण केले पाहिजे या दृष्टिकोनातून समाजामध्ये प्रबोधन करणारे आदरणीय सत्यपाल महाराज. आपल्या कीर्तनातून समाजामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण समाज कसा करेल ही परिस्थिती तथा मत निर्माण करणारे आदरणीय सत्यपाल महाराज. सत्यपाल महाराज यांचा जन्म १६ मे १९५६ रोजी सिरसोली ता.तेलारा जि.अकोला  येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सुशिलाबाई तर वडीलांचे नाव विश्वनाथ चिंचोलकर आहे . वडील कपडे शिवण्याचा व्यवसाय करत असत तर आई दुसऱ्याच्या शेतात कामाला जात असे . सत्यपाल महाराजांना  एक मुलगा व एक मुलगी असून मुलगा डाॕक्टर तर मुलगी गृहिणी आहे . सत्यपाल महाराज लहानपणी गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थनेस जात असत .राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या समाजपरिवर्तनवादी विचारांने प्रेरित होऊन मातीची   खंजीरी  वाजवत किर्तनास सुरूवात केली .नंतर ते लोकप्रबोधनाच्या चळवळीत सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज या नावाने ओळखल्या जाऊ लागले .सत्यपाल महाराज यांनी पंधरा हजारा पेक्षा जास्त मनोरंजनपर  किर्तनातून  आपल्या खास शैलीतून सप्त खंजिरी वाजवत ग्रामप्रबोधनात लक्षणीय योगदान दिल्यामुळे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून त्यांना अनेकदा विविध पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार, समाज प्रबोधनकार पुरस्कार, मराठा विश्वभूषण पुरस्कार, प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार, आम्ही सारे फाउंडेशन पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. पुणे येथे आयोजित अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलनाचे (२०११) अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

त्यांची महिमा शब्दरूपी आपण लिहावे इतपत लेखक मोठा नाही तरीपण थोडक्या मोडक्या शब्दात सत्यपाल महाराजांचे कर्म तथा कृती वाचकाच्या समोर देणे हे लेखकाला अभिप्रेत वाटले आणि या लेखामुळे समाजामध्ये एक चैतन्य निर्माण व्हावे या दृष्टीकोनातून लेखकाने वाचकाच्या समोर हा लेख आणलेला आहे.



विलास पाटील सुर्यवंशी 

राजेंद्रनगर किनवट 

ता किनवट जी. नांदेड 

मो न.9922910080

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...