Skip to main content

होळी आणि गाणी....




 होळी आणि गाणी..

होळी हा असा एक सण आहे, जो केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरील अनेक देशांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. होळीच्या दिवशी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल सुद्धा राहते. अलीकडच्या काळात होळी सेलिब्रेशन करण्यासाठी वेगवेगळे इव्हेंट ऑर्गनाइज केले जात आहेत. एकमेकांना रंगाने रंगवून होळी स्पेशल गाणी लावून खूप धमाल केली जाते. .

होळी खेळताना गाणी वाजवली नाही तर ही होळी अपूर्ण वाटते. आधीच्या काळापासून होळीच्या दिवशी लोक स्वतः गाणी म्हणायचे, कालांतराने त्यात गाण्यांची वाढ झाली. त्याच गाण्यांच्या तालावर संपूर्ण लोक नाचताना दिसत आहेत. परंतू होळी तोंडावर आली असताना धमाल करायला गाणीच आठवत नाहीत…मराठी आणि हिंदी गाण्यांमुळे होळीच्या सणाला खुप धमाल घातली जाते. चला तर मग, या ह्या होळीला गाण्यांवर नाचण्यासाठी सज्ज व्हा.

"खेळताना रंग बाई होळीचा होळीचा... फाटला गं कोना माझ्या चोळीचा" १९७१ वर्षातील हे गाणं जुनं आहे पण होळीसाठीच पक्कं समीकरण आहे. सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं हे गाणं विठ्ठल शिंदे यांनी ते संगीतबद्ध केलेलं आहे.

“चिकना चिकना म्हावरा माझा” या अल्बम मधील " आमच्या दाराशी हाय शिमगा" या गाण्याला होळीच्या दिवशी विशेष महत्त्व आहे . या गाण्याच्या बोलातून समस्त कोळी- आगरी बांधवांच्या भावना व्यक्त झालेल्या आहेत. 

१९७५ साली शोले चित्रपटातील आनंद बक्षी यांनी लिहिलेलं, आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याबद्दल काय बोलावं. शोले चित्रपटाने स्वतःचा असा एक इतिहास रचला हे सगळ्यांनाच माहीत आहे. "होली कब है या संवादासह

"होली के दिन दिल जब खिल जाते है...  रंगो में रंग मिली जाते है... गिले शिकवे भूल के दोस्तों... दुश्मन भी गले मिल जाती है..."अशा या गाण्याच्या बोलांनी त्या काळात प्रचंड अशी लोकप्रियता मिळवली आहे. होळी आली आणि हे गाणं वाजलं नाही असं कधीच होणार नाही.

स्वतः अमिताभ बच्चन याने गायलेलं सिलसिला या चित्रपटातील “रंग बरसे भीगे चुनरवाली...रंग बरसे” हे गाणं हरिवंशराय बच्चन यांनी शब्दबद्ध केले आहे. १९८१ साली हा चित्रपट आला होता. या गाण्याची लोकप्रियता आजही तेवढीच आहे.

२००३ साली प्रदर्शित झालेल्या बागबान या चित्रपटातील होळी स्पेशल गाणं म्हणजे "होरी खेले रघूवीरा....अवध में "होरी खेले रघूवीरा...." अमिताभ बच्चन, अलका यागनिक, सुखविंदर सिंग आणि उदीत नारायण यांनी गायलेलं हे गाणं आदेश श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेलं आहे.

मोहब्बते या चित्रपटातील गाणी सुद्धा तेवढीच लोकप्रिय झाली होती. "सोनी सोनी.... अखियों वाली" हे गाणं सुद्धा होळी स्पेशल असून आनंद बक्षी यांनी लिहिलेलं असून जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. 

“जुनं ते सोनं” कितीही नवीन गाणी आली तरी काही गाणी ही जूनी असली तरी आजही ऐकायला गोड वाटतात. “अंग से अंग लगाना” हे “डर” या चित्रपटातील गाणही तसच आहे. शाहरुख खान, सनी देओल आणि जुही चावला यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आहे.

रितेश देशमुख यांचा लयभारी आणि माऊली  

या चित्रपटातील रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्यावर चित्रित झालेलं गाणं "आला होळीचा सण लय भारी" आणि

"ज़रा पिरमानं वाग, माझा लयभारी स्वॅग…तुझ्या लवर चा टॅग मला देवून टाक…आत्ता कशाचा राग…हा तर पेरमाचा डाग…

तुझ्या साडीला सर्फ लावून धुवून टाक…"

ह्या दोन्ही गाण्यांना अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं आहे.

आताच्या तरूणाईला वेड लावणारी ही गाणी आहेत.

हल्लीच्या काळात ही होळीवर खुप गाणी चित्रित झाली आहेत आणि प्रचंड लोकप्रियता ही या गाण्याला मिळाली आहे. 

" रेस अगेन्स्ट द टाईम”वक्त या चित्रपटातील "उफ्फ ये होली हाय ये होली..." हे गाणं अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर चित्रित झालेलं आहे. 

२०१७. मधील चित्रपट जॉली एल. एल. बी.या चित्रपटातील "गो 

पागल" हे गाणं असंच काहीसं आहे. निंदी कौर आणि रफ्तार यांनी हे गाणं गायलं आहे.“ये जवानी है दिवानी” या चित्रपटातील “बलम पिचकारी…जो तुने मुझे मारी",२०१९ साली हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा वॉर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील "जय जय शिवशंकर" हे लोकांना विशेष आवडलं. 

 " अरे सुन साराअअअअआ रंग बता ब्ल्यु या लाल....बद्री की दुल्हनियाँ" हे गाणं सुद्धा होळी खेळताना आवर्जून लावलं जातं. बद्रीनाथ की दुल्हनियाँ या चित्रपटातील हे गाणं आलिया भट्ट आणि वरून धवण यांच्यावर चित्रित झालेलं आहे. याचबरोबर

"अरे जा रे हट हट ना छुना मेरा घुंगट... पलट के दूंगी आज तुझे गाली रे...", जुगी जी वा जुगी जी", "अगं नाच नाच नाच राधे उडुया रंग",  "आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी"... आणि रामलीला सिनेमातील "लहू मूँह लग गया  .."हे गाणंही गरबा आणि होळीमुळे खास लक्षात राहिलेलं गाणं आहे. 

 खरं तर मित्रांनो, अजून अशी बरीच हिंदी-मराठी चित्रपटातील गाणी आहेत जी होळीशी त्यांचा संबंध नसताना देखील तुम्हाला रंगपंचमीच्या दिवशी ऐकायला मिळतील. पण आज मी तुम्हाला जी गाणी सांगितली आहेत ती फक्त होळी  यावर चित्रित करण्यात आलेली आहेत. होळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी निवडा ही काही खास गाणी नैसर्गिक रंगासह. तुम्हाला पुन्हा एकदा रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा! 




रूचिरा बेटकर, नांदेड.

9970774211

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला