Skip to main content

गोंडर कादंबरीचा वाचकवर्ग सिंगापुरात

 



- सिंगापूर सोबत जपान आणि कॅनडामध्येही गोंडर कादंबरीचे वाचक

नांदेड : येथील प्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे यांची गोंडर ही कादंबरी साहित्य क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरली असून कादंबरी विक्रीचे कादंबरी प्रसारणाचे आणि पुरस्काराचे अनेक विक्रम कादंबरीने मोडीत काढलेले आहेत. गोंडर ही कादंबरी जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा प्रकाशनपूर्व पहिल्या आवृत्ती विकल्या गेली त्यानंतर सबंध महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका, खेडोपाडी ही कादंबरी वाचकांपर्यंत पोहोचली आहे. या कादंबरीला महाराष्ट्रातील मान्यवर एकूण सोळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत तसेच आकाशवाणीवर क्रमशः वाचनाने अभिवाचनाने ही कादंबरी अजून सर्वजण पोहोचली आहे.हे सर्व होत असताना कादंबरी ही बहुचर्चित कादंबरी म्हणून गोंडर कादंबरीचे नाव अग्रेसर आहे. अशातच गोंडर कादंबरीच्या नावलौकिकामध्ये अजून एक भर पडली असून गोंडर कादंबरी साता समुद्रा पार असं म्हटल्याप्रमाणे सिंगापूर येथे पोहोचली आहे. सिंगापूर येथे गोंडर या कादंबरीचे वाचक असून त्याचबरोबर जपान आणि कॅनडा या ठिकाणी सुद्धा गोंडर ही कादंबरी वाचकांपर्यंत पर्यंत पोहोचली आहे. या कादंबरीचे वाचक सबंध जगभर आहेत. असेही म्हणायला हरकत नाही. अशी गोंडर ही अशोक कुबडे यांची कादंबरी इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे सरांनी मानधनासह स्वीकारून प्रकाशित केली आहे आणि या कादंबरीने अनेक नवीन विक्रम केलेले आहेत.आज सिंगापूर येथेही पोहोचले आहे आपण एकीकडे वाचक नाहीत हा सूर साहित्यात असतांना गोंडर या कादंबरीच्या वाचकांच्या प्रतिसादाच्या माध्यमातून खरोखरच दर्जेदार साहित्याला वाचक आहेत अशी एक मोठी चर्चा गोंडर या कादंबरीच्या निमित्ताने साहित्य वर्तुळात होत आहे. अलीकडील महाराष्ट्रातील अनेक विक्रम मोडणारी ही कादंबरी आता सिंगापूरून अशोक कर्णिक या वाचकांनी हा कादंबरी चा फोटो टाकून साहित्य विश्वात एक खळबळ निर्माण केली आहे.यातून गोंडर ही कादंबरी सर्व दूर पोहोचल्याचे निदर्शनास येते. कादंबरीच्या सर्व दूर पोहोचण्याबद्दल,पुरस्काराबद्दल आणि लोकप्रियतेबद्दल कादंबरीचे लेखक अशोक कुबडे यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला