Skip to main content

साहित्यिकांनी भूमिका घेऊन लिहिले पाहिजे - अशोक कुबडे -राज्यस्तरीय साहित्य संमेलनाध्यक्षांचे प्रतिपादन - साहित्य लेखनाबरोबर प्रसारणही आवश्यक

 

 वर्धा/ पुलगाव- 


 साहित्यिक लेखकांनी आपली भूमिका निश्चित करून साहित्य लेखन केले पाहिजे. उत्स्फुर्तपणे आलेल्या विषयावरती लेखन केले तरच दर्जेदार साहित्य निर्मिती होते.नवोदीत साहित्यिकांनी ज्येष्ठ साहित्यिकांचे साहित्य वाचलं पाहिजे तरच आपल्या साहित्याला योग्य दिशा मिळेल अन्यथा आपण भरकटत राहू. 

          जास्तीत जास्त वाचन करून कमीत कमी लेखन केले पाहिजे अन्यथा या साहित्य लेखनाच्या प्रचंड मोठ्या प्रवाहात आपण सहज वाहून जाऊ.. प्रत्येकाने लेखन आणि साहित्य वाचकांपर्यंत पोहोचणे हे जबाबदारीने केले पाहिजे साहित्य लिहून मोकळे होता कामा नये. साहित्यिकांनी नियोजनबद्धपणे लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्यिकांनी आपली लेखनाची साहित्य प्रसारणाची एक भूमिका घेऊन साहित्य लेखन केले पाहिजे.

           असे प्रतिपादन पुलगाव वर्धा येथे पार पडलेल्या चौथ्या अव्यक्त अबोली राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून प्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे यांनी केले.


                  यावेळी मंचावर साहित्य संमेलनाचे उद्घाटक दीपक नगराळे, स्वागताध्यक्ष मनोहर शहारे,साहित्यिक अशोक वाघमारे, मुख्य आयोजक जयश्री चव्हाण आणि संस्थेचे सचिव योगेश ताटे, कवी हरिदास कोष्टी आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना अध्यक्ष अशोक कुबडे यांनी नवोदिकांनी साहित्य लेखन करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी वर्धा जिल्ह्याचा साहित्यिक, सांस्कृतिक,सामाजिक आढावा घेतला तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करून आठवण केली. 

        साहित्य लेखन प्रभावी करण्यासाठी लागणाऱ्या अनेक बाबी त्यांनी भाषणात व्यक्त केल्या. तसेच पंधरा पाणी भाषण लेखी स्वरूपातही प्रसारित केले.

या एकदिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनात महाराष्ट्रातून साहित्यिकांची उपस्थिती होती.

उद्घाटकीय प्रास्ताविक शिला आठवले यांनी केले. उद्घाटकीय सत्रा नंतर प्रा. डॉ. भूषण रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली "धर्मराष्ट्र विरुद्ध भारतराष्ट्र" परिसंवाद झाला होता.

त्यानंतर खुशबू बडवाने यांचा "मी सावित्री बोलते" तर कु. स्वराली वाणी यांचा "मी विठ्ठल बोलते" हा एकपात्री प्रयोग झाला...त्यानंतर विद्यानंद हाडके यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा पार पडला. या गजल मुशायऱ्याचे निवेदन प्रसिद्ध गझलकार किरण मडावी यांनी केले तर शेवटच्या टप्प्यात प्रसिद्ध कवी हरिदास कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले.

          या कवविसंमेलनात महाराष्ट्रातून आलेल्या कवींसोबत गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील कवींनी आपला सहभाग नोंदवला होता. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन स्नेहल सोनटक्के यांनी केले.

                 समारोपाच्या कार्यक्रमात साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक कुबडे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलनात घेतलेले ठराव वाचन करण्यात आले. ठरावाचे वाचन प्रवीण भगत यांनी केले तर ठरावास अनुमोदन योगेश ताटे यांनी दिले.

अव्यक्त अबोली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पुलगाव यांच्यावतीने या चौथ्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 

                 हे साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष जयश्री चव्हाण सचिव योगेश ताटे, मनोहर शहारे, स्नेहल मेंढे,शीला आठवले, राजेश पोफारे,प्रवीण भगत आदींनी अथक परिश्रम घेतले आणि हे साहित्य संमेलन पार पाडले

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.