Skip to main content

साहित्यिकांनी भूमिका घेऊन लिहिले पाहिजे - अशोक कुबडे -राज्यस्तरीय साहित्य संमेलनाध्यक्षांचे प्रतिपादन - साहित्य लेखनाबरोबर प्रसारणही आवश्यक

 

 वर्धा/ पुलगाव- 


 साहित्यिक लेखकांनी आपली भूमिका निश्चित करून साहित्य लेखन केले पाहिजे. उत्स्फुर्तपणे आलेल्या विषयावरती लेखन केले तरच दर्जेदार साहित्य निर्मिती होते.नवोदीत साहित्यिकांनी ज्येष्ठ साहित्यिकांचे साहित्य वाचलं पाहिजे तरच आपल्या साहित्याला योग्य दिशा मिळेल अन्यथा आपण भरकटत राहू. 

          जास्तीत जास्त वाचन करून कमीत कमी लेखन केले पाहिजे अन्यथा या साहित्य लेखनाच्या प्रचंड मोठ्या प्रवाहात आपण सहज वाहून जाऊ.. प्रत्येकाने लेखन आणि साहित्य वाचकांपर्यंत पोहोचणे हे जबाबदारीने केले पाहिजे साहित्य लिहून मोकळे होता कामा नये. साहित्यिकांनी नियोजनबद्धपणे लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्यिकांनी आपली लेखनाची साहित्य प्रसारणाची एक भूमिका घेऊन साहित्य लेखन केले पाहिजे.

           असे प्रतिपादन पुलगाव वर्धा येथे पार पडलेल्या चौथ्या अव्यक्त अबोली राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून प्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे यांनी केले.


                  यावेळी मंचावर साहित्य संमेलनाचे उद्घाटक दीपक नगराळे, स्वागताध्यक्ष मनोहर शहारे,साहित्यिक अशोक वाघमारे, मुख्य आयोजक जयश्री चव्हाण आणि संस्थेचे सचिव योगेश ताटे, कवी हरिदास कोष्टी आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना अध्यक्ष अशोक कुबडे यांनी नवोदिकांनी साहित्य लेखन करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी वर्धा जिल्ह्याचा साहित्यिक, सांस्कृतिक,सामाजिक आढावा घेतला तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करून आठवण केली. 

        साहित्य लेखन प्रभावी करण्यासाठी लागणाऱ्या अनेक बाबी त्यांनी भाषणात व्यक्त केल्या. तसेच पंधरा पाणी भाषण लेखी स्वरूपातही प्रसारित केले.

या एकदिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनात महाराष्ट्रातून साहित्यिकांची उपस्थिती होती.

उद्घाटकीय प्रास्ताविक शिला आठवले यांनी केले. उद्घाटकीय सत्रा नंतर प्रा. डॉ. भूषण रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली "धर्मराष्ट्र विरुद्ध भारतराष्ट्र" परिसंवाद झाला होता.

त्यानंतर खुशबू बडवाने यांचा "मी सावित्री बोलते" तर कु. स्वराली वाणी यांचा "मी विठ्ठल बोलते" हा एकपात्री प्रयोग झाला...त्यानंतर विद्यानंद हाडके यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा पार पडला. या गजल मुशायऱ्याचे निवेदन प्रसिद्ध गझलकार किरण मडावी यांनी केले तर शेवटच्या टप्प्यात प्रसिद्ध कवी हरिदास कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले.

          या कवविसंमेलनात महाराष्ट्रातून आलेल्या कवींसोबत गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील कवींनी आपला सहभाग नोंदवला होता. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन स्नेहल सोनटक्के यांनी केले.

                 समारोपाच्या कार्यक्रमात साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक कुबडे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलनात घेतलेले ठराव वाचन करण्यात आले. ठरावाचे वाचन प्रवीण भगत यांनी केले तर ठरावास अनुमोदन योगेश ताटे यांनी दिले.

अव्यक्त अबोली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पुलगाव यांच्यावतीने या चौथ्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 

                 हे साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष जयश्री चव्हाण सचिव योगेश ताटे, मनोहर शहारे, स्नेहल मेंढे,शीला आठवले, राजेश पोफारे,प्रवीण भगत आदींनी अथक परिश्रम घेतले आणि हे साहित्य संमेलन पार पाडले

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...