Skip to main content

साहित्यिकांनी भूमिका घेऊन लिहिले पाहिजे - अशोक कुबडे -राज्यस्तरीय साहित्य संमेलनाध्यक्षांचे प्रतिपादन - साहित्य लेखनाबरोबर प्रसारणही आवश्यक

 

 वर्धा/ पुलगाव- 


 साहित्यिक लेखकांनी आपली भूमिका निश्चित करून साहित्य लेखन केले पाहिजे. उत्स्फुर्तपणे आलेल्या विषयावरती लेखन केले तरच दर्जेदार साहित्य निर्मिती होते.नवोदीत साहित्यिकांनी ज्येष्ठ साहित्यिकांचे साहित्य वाचलं पाहिजे तरच आपल्या साहित्याला योग्य दिशा मिळेल अन्यथा आपण भरकटत राहू. 

          जास्तीत जास्त वाचन करून कमीत कमी लेखन केले पाहिजे अन्यथा या साहित्य लेखनाच्या प्रचंड मोठ्या प्रवाहात आपण सहज वाहून जाऊ.. प्रत्येकाने लेखन आणि साहित्य वाचकांपर्यंत पोहोचणे हे जबाबदारीने केले पाहिजे साहित्य लिहून मोकळे होता कामा नये. साहित्यिकांनी नियोजनबद्धपणे लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्यिकांनी आपली लेखनाची साहित्य प्रसारणाची एक भूमिका घेऊन साहित्य लेखन केले पाहिजे.

           असे प्रतिपादन पुलगाव वर्धा येथे पार पडलेल्या चौथ्या अव्यक्त अबोली राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून प्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे यांनी केले.


                  यावेळी मंचावर साहित्य संमेलनाचे उद्घाटक दीपक नगराळे, स्वागताध्यक्ष मनोहर शहारे,साहित्यिक अशोक वाघमारे, मुख्य आयोजक जयश्री चव्हाण आणि संस्थेचे सचिव योगेश ताटे, कवी हरिदास कोष्टी आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना अध्यक्ष अशोक कुबडे यांनी नवोदिकांनी साहित्य लेखन करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी वर्धा जिल्ह्याचा साहित्यिक, सांस्कृतिक,सामाजिक आढावा घेतला तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करून आठवण केली. 

        साहित्य लेखन प्रभावी करण्यासाठी लागणाऱ्या अनेक बाबी त्यांनी भाषणात व्यक्त केल्या. तसेच पंधरा पाणी भाषण लेखी स्वरूपातही प्रसारित केले.

या एकदिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनात महाराष्ट्रातून साहित्यिकांची उपस्थिती होती.

उद्घाटकीय प्रास्ताविक शिला आठवले यांनी केले. उद्घाटकीय सत्रा नंतर प्रा. डॉ. भूषण रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली "धर्मराष्ट्र विरुद्ध भारतराष्ट्र" परिसंवाद झाला होता.

त्यानंतर खुशबू बडवाने यांचा "मी सावित्री बोलते" तर कु. स्वराली वाणी यांचा "मी विठ्ठल बोलते" हा एकपात्री प्रयोग झाला...त्यानंतर विद्यानंद हाडके यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा पार पडला. या गजल मुशायऱ्याचे निवेदन प्रसिद्ध गझलकार किरण मडावी यांनी केले तर शेवटच्या टप्प्यात प्रसिद्ध कवी हरिदास कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले.

          या कवविसंमेलनात महाराष्ट्रातून आलेल्या कवींसोबत गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील कवींनी आपला सहभाग नोंदवला होता. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन स्नेहल सोनटक्के यांनी केले.

                 समारोपाच्या कार्यक्रमात साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक कुबडे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलनात घेतलेले ठराव वाचन करण्यात आले. ठरावाचे वाचन प्रवीण भगत यांनी केले तर ठरावास अनुमोदन योगेश ताटे यांनी दिले.

अव्यक्त अबोली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पुलगाव यांच्यावतीने या चौथ्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 

                 हे साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष जयश्री चव्हाण सचिव योगेश ताटे, मनोहर शहारे, स्नेहल मेंढे,शीला आठवले, राजेश पोफारे,प्रवीण भगत आदींनी अथक परिश्रम घेतले आणि हे साहित्य संमेलन पार पाडले

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला