किनवट:-सरस्वती अध्यापक महाविद्यालय किनवट येथील प्रा.डॉ. राजू मोतेराव यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे 2021 चा राज्यस्तरीय गुरगौरव शिक्षक रत्न पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले आहे. सन्मानात सन्मानचिन्ह, गौरव पदक, मानपत्र, महावस्त्र, मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार, सचिव कृष्ण कुमार नेमानीवार, एड. जी.एस. रायबोळे, एड. मिलिंद सरपे, प्राचार्या अनुजा पाटील मॅडम, प्राचार्य आनंद भंडारे, प्राचार्य किरण पाईकराव, डॉ. सुनील व्यवहारे, डॉ. मार्तंड कुलकर्णी, डॉ. पंजाब शेरे, प्रा. प्रदीप एडके, प्रा. रुपेश कांबळे, प्रा. रमेश शिंदे, प्रा. श्वेता राठोड, सागर नेमानीवार, महेंद्र एडके, कामराज जाधव, सुरेश सावंगेकर,रमेश सुरेशवार, रवी सावंगेकर, गजू भुरे, सतीश सामावार, प्रा. सुभाष मोहरले, विजय जाधव, चंद्रकांत वंजारे,मोहन कोवे, गणेश एरकाडे, सुधाकर पवार, मिलिंद एंगडे, निलेश चहांदे,सागर पाटील, अजय साळवे आदिने त्याचे अभिनंदन केलेले आहे.
सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण
Comments
Post a Comment