Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे व महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित



अकलूज (सोलापूर) : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, सोलापूर जिल्हा यांचे वतीने उत्कृष्ट सेवा पुरस्कार सोहळा, पत्रकारांचा स्नेहमेळावा व एक दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे व ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांच्या हस्ते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांना उत्कृष्ट संपादक पुरस्कार तर लातूर जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील यांना उत्कृष्ट महिला पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लहुकुमार शिंदे यांनी २००३ पासून सामाजिक कार्यास सुरुवात केली असून, २००४ मध्ये महाराजकारण या वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून काम पाहिले. 


त्यांना नेहरू युवा पुरस्कार, राजाभाऊ महाळंगी विशेष प्रतिनिधी म्हणून निवड, स्नेहल संस्कृतीक प्रतिष्ठान पुणेचा कविवर्य सन्मान, अखिल भारतीय शाहिर परिषद मुंबई उत्कृष्ट नवकवी सन्मान,१४ वे अखिल भारतीय परिषदेचा पुरस्कार, २००८ मध्ये वेदना साहित्य संग्रह प्रकाशित २००९ मध्ये समाजसेवेसाठी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाकडून निवड, कै. ॲड. देविदास जमदाडे प्रबोधन व विचारमंच राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्य पुरस्कार, मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर सामाजिक संस्था व माता रमाई फाउंडेशन बोट मोगरा मुखेडचा जीवन गौरव पुरस्कार, राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था समाजरत्न पत्रकार पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिंदे यांनी तू ही मेरी जान या हिंदी चित्रपटात पंडितजीची उत्कृष्ट भूमिका साकारली आहे. २०१२ पासून सुवर्णयुग या वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून कार्य करीत आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने उत्कृष्ट संपादक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महिला जिल्हाध्यक्षा वैशाली भगवानराव पाटील या साप्ताहिक पुरोगामी विचाराचा विकास व विकास दर्पण या यूट्यूब चॅनलच्या मुख्य संपादिका म्हणून कार्य करीत आहेत.

त्यांना दिल्लीचा नॅशनल पुरस्कार, ( मराठवाड्याची वन कन्या ) पर्यावरणचा पुरस्कार, कोल्हापूरी बाणा पुरस्कार, महात्मा जोतिबा फुले शिक्षक परिषदेकडून राज्यस्तरीय नारीरत्न नागरी पुरस्कार, जनकल्याण सामाजिक सेवा संस्था, कोल्हापूरकडून क्रांतिज्योती पुरस्कार, संकल्प भारत मंचच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने उत्कृष्ट महिला पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे माढा तालुका अध्यक्ष कुंदन वजाळे, उपाध्यक्ष नाथा सावंत, करमाळा तालुका सचिव अक्षय वरकड, सहसचिव हर्षवर्धन गाडे, सांगोला तालुका अध्यक्ष प्रवीण सावंत, सातारा जिल्हाध्यक्ष पंकज धायगुडे-पाटील, संपादक भाग्यवंत नायकूडे, नानासाहेब नाईकनवरे, रजनी साळवे, दादा साळवे, अतुल मदने, मयूर भोरे, सागर वाघमारे, दत्तात्रय वाघमारे, निकम वाघमारे, दिनेश बंडगर, विश्वजीत जाधव, दत्तात्रय नाईकनवरे, संतोष अडगळे, रवी ढोबळे, इस्माईल पठाण, सुनील चेळेकर यांचेसह सोलापूर, लातूर सातारा, पुणे जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे संयोजक जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, शशिकांत कडबाने, नौशाद मुलानी व गणेश जाधव यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला