नांदेड : नांदेड जिल्ह्यातील किनवट- माहुर रस्त्यावर अय्यपा स्वामी मंदीराजवळ अज्ञात इसमाचा अपघात झाला ही बातमी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे किनवट तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील तात्काळ घटनास्थळी पोहचले व रुग्णवाहिका गाडीला फोन करून बोलावून घेतले व घटनास्थळी जमलेल्या लोकांच्या मदतीने अपघात झालेल्या व्यक्तीला रुग्णवाहिकामध्ये बसवून अपघात झालेल्या रुग्णास गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव वाचला असून ते सुखरूप आहेत. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे किनवट तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील यांनी रिस्क घेऊन अपघातग्रस्त व्यक्तीला जीवदान दिल्यामुळे संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य महिलाध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, सर्व राज्य व विभागीय पदाधिकारी, मराठवाडा संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, कार्याध्यक्ष हुकुमत मुलाणी, मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव, नांदेड जिल्हाध्यक्ष संजयकुमार गायकवाड, किनवट तालुकाध्यक्ष आशिष शेळके ,कार्याध्यक्ष सय्यद नदीम, सचिव नसीर तगाले,शेख अतीफ, प्रणय कोवे, विशाल गिमेकार, रमेश परचाके इंद्रपाल कांबळे, गौतम कांबळे, राज माहुरकर, अरवींद सुर्यवंशी, मारोती देवकते, परमेश्वर पेशवे, अक्रम चव्हाण, शे. सईद, विकास वाघमारे गणेश यमजलवाड, विनोद कांबळे आदीनीं या कार्याबद्दल अभिनंदन केले.
सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण
Comments
Post a Comment