Skip to main content

टिपू सूलतान ब्रिगेडतर्फे देवीनगरतांडा येथे ईद मिलन निमित्ताने अनोखा कार्यक्रम संपन्न

 


कार्यक्रमात शिरखुर्माची मेजवाणी बरोबरच गरजूंना कपडे भेट देण्यात आले.


कार्यक्रमास टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शेख सुभान अली यांची उपस्थिती.


किनवट : टिपू सुलतान ब्रिगेड नांदेडच्या वतीने मुहम्मद पैगंबर (स.स.) सर्वांसाठी अभियान 2022 अंतर्गत किनवट तालुक्यातील देवीनगर येथे आज 16 मे, 2022, सोमवार रोजी ईद मिलन कार्यक्रम अत्यंत अनोख्या रीतीने संपन्न झाला.

        टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शेख सुभान अली सरांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील मुस्लिम समाज मागील पाच वर्षांपासून महाराष्ट्रातील शोषित, पीडित, वंचित बांधव, अनाथ मुले, निराधार आणि विधवा आई-बहिणी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब यांच्यासोबत ईद साजरी करत आहेत. कार्यक्रमात शिरखुर्माची मेजवाणी बरोबरच गरजूंना कपडे भेट देण्यात येतात.

          टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड तर्फे यावर्षीची ईद किनवट तालुक्यातील देवीनगर तांड्यातील आपल्या गोर बंजारा बांधवांसोबत साजरी करण्यात आली. सर्व गावकऱ्यांना शिरखुर्माची मेजवाणी देण्यात आली आणि अनाथ व गरजू मुलांना कपड़े भेट करण्यात आले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवीनगर तांड्याचे श्री. नाथु नायक होते आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शेख सुभान अली सर यांची उपस्थिती होती. शेख सुभान अली सर यांनी सर्वप्रथम उपस्थित बंजारा बांधवांची, आई-बहिणींची माफी मागितली की आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यास खूप उशीर झाला. आम्ही आजपर्यंत अनेक ईद तुमच्याशिवाय, तुम्हाला सोडून साजऱ्या केल्या. इस्लाम शिकवितो की पृथ्वीतलावरील सर्व मानव एकच आहेत, भाऊ-भाऊ आहेत. भारतात भाऊ-बहिण जर उपाशीपोटी झोपत असेल तर आम्ही मुस्लिम होऊच नाही शकत. सर्व बहुजन बांधवांत एकोपा, प्रेम आणि बंधुभाव वृद्धिंगत करणे, सांप्रदायिक सदभाव आणि सलोखा वाढविणे, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता अबाधित राखणे, देशसेवा आणि मानव सेवेस समर्पित युवा पिढी तयार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की बहुजन युवकांनी काही  राजकारण्यांच्या मानवता विरोधी, देशविरोधी मानसिकतेला बळी पडू नये.

         कार्यक्रमाचे प्रस्ताविक टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांनी केले. त्यांनी मुहम्मद पैगंबर स.स. सर्वांसाठी अभियान आणि ईद मिलन कार्यक्रमा मागची भूमिका विशद केली. गोर सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष ॲड. प्रदीप डी. राठोड यांनी यावेळी आपल्या मनोगतात टिपू सुलतान ब्रिगेड आणि त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

        कार्यक्रमाला देवीनगरचे प्रतिष्ठित नागरिक गेम सिंग राठोड, बुजुर्ग महिला यशोदाबाई राठोड,  गोरसिकवाडीचे मा. विष्णु लालसिंग डुंगावत राठोड, गोरसेना तालुका अध्यक्ष अतुल राठोड, पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा सरचिटणीस मा. आनंद भालेराव, पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष मा. आशिष शेळके, पत्रकार सेवा संघाचे मा. प्रणय कोवे आणि रमेश परचाके, जमीयते उलेमाचे माहूर अध्यक्ष मौलाना सनाउल्ला खान, जमात-ए-इस्लामी हिंदचे डाॅ. मुखीत, टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा संघटक फयाज पठाण, धर्माबाद तालुका अध्यक्ष खुर्रम बेग पटेल, तालुका उपाध्यक्ष इब्राहिम बेग पटेल, तालुका सचिव सय्यद शाहिद अली, उमरी तालुका अध्यक्ष सय्यद फेरोज पटेल, मुदखेड तालुका अध्यक्ष मुजीब अहमद, इ. ची उपस्थिती होती.

        कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम, विष्णु राठोड, सुभाष राठोड, शेख अजमल, शेख ज़ुबेर, साहिल खान, शेख मुनव्वर, शेख शकील, शेख सोनू, सय्यद अलीम यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला