Skip to main content

टिपू सूलतान ब्रिगेडतर्फे देवीनगरतांडा येथे ईद मिलन निमित्ताने अनोखा कार्यक्रम संपन्न

 


कार्यक्रमात शिरखुर्माची मेजवाणी बरोबरच गरजूंना कपडे भेट देण्यात आले.


कार्यक्रमास टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शेख सुभान अली यांची उपस्थिती.


किनवट : टिपू सुलतान ब्रिगेड नांदेडच्या वतीने मुहम्मद पैगंबर (स.स.) सर्वांसाठी अभियान 2022 अंतर्गत किनवट तालुक्यातील देवीनगर येथे आज 16 मे, 2022, सोमवार रोजी ईद मिलन कार्यक्रम अत्यंत अनोख्या रीतीने संपन्न झाला.

        टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शेख सुभान अली सरांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील मुस्लिम समाज मागील पाच वर्षांपासून महाराष्ट्रातील शोषित, पीडित, वंचित बांधव, अनाथ मुले, निराधार आणि विधवा आई-बहिणी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब यांच्यासोबत ईद साजरी करत आहेत. कार्यक्रमात शिरखुर्माची मेजवाणी बरोबरच गरजूंना कपडे भेट देण्यात येतात.

          टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड तर्फे यावर्षीची ईद किनवट तालुक्यातील देवीनगर तांड्यातील आपल्या गोर बंजारा बांधवांसोबत साजरी करण्यात आली. सर्व गावकऱ्यांना शिरखुर्माची मेजवाणी देण्यात आली आणि अनाथ व गरजू मुलांना कपड़े भेट करण्यात आले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवीनगर तांड्याचे श्री. नाथु नायक होते आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शेख सुभान अली सर यांची उपस्थिती होती. शेख सुभान अली सर यांनी सर्वप्रथम उपस्थित बंजारा बांधवांची, आई-बहिणींची माफी मागितली की आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यास खूप उशीर झाला. आम्ही आजपर्यंत अनेक ईद तुमच्याशिवाय, तुम्हाला सोडून साजऱ्या केल्या. इस्लाम शिकवितो की पृथ्वीतलावरील सर्व मानव एकच आहेत, भाऊ-भाऊ आहेत. भारतात भाऊ-बहिण जर उपाशीपोटी झोपत असेल तर आम्ही मुस्लिम होऊच नाही शकत. सर्व बहुजन बांधवांत एकोपा, प्रेम आणि बंधुभाव वृद्धिंगत करणे, सांप्रदायिक सदभाव आणि सलोखा वाढविणे, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता अबाधित राखणे, देशसेवा आणि मानव सेवेस समर्पित युवा पिढी तयार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की बहुजन युवकांनी काही  राजकारण्यांच्या मानवता विरोधी, देशविरोधी मानसिकतेला बळी पडू नये.

         कार्यक्रमाचे प्रस्ताविक टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांनी केले. त्यांनी मुहम्मद पैगंबर स.स. सर्वांसाठी अभियान आणि ईद मिलन कार्यक्रमा मागची भूमिका विशद केली. गोर सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष ॲड. प्रदीप डी. राठोड यांनी यावेळी आपल्या मनोगतात टिपू सुलतान ब्रिगेड आणि त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

        कार्यक्रमाला देवीनगरचे प्रतिष्ठित नागरिक गेम सिंग राठोड, बुजुर्ग महिला यशोदाबाई राठोड,  गोरसिकवाडीचे मा. विष्णु लालसिंग डुंगावत राठोड, गोरसेना तालुका अध्यक्ष अतुल राठोड, पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा सरचिटणीस मा. आनंद भालेराव, पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष मा. आशिष शेळके, पत्रकार सेवा संघाचे मा. प्रणय कोवे आणि रमेश परचाके, जमीयते उलेमाचे माहूर अध्यक्ष मौलाना सनाउल्ला खान, जमात-ए-इस्लामी हिंदचे डाॅ. मुखीत, टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा संघटक फयाज पठाण, धर्माबाद तालुका अध्यक्ष खुर्रम बेग पटेल, तालुका उपाध्यक्ष इब्राहिम बेग पटेल, तालुका सचिव सय्यद शाहिद अली, उमरी तालुका अध्यक्ष सय्यद फेरोज पटेल, मुदखेड तालुका अध्यक्ष मुजीब अहमद, इ. ची उपस्थिती होती.

        कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम, विष्णु राठोड, सुभाष राठोड, शेख अजमल, शेख ज़ुबेर, साहिल खान, शेख मुनव्वर, शेख शकील, शेख सोनू, सय्यद अलीम यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...