Skip to main content

किनवट चे पत्रकार आनंद भालेराव यांचा जिल्हाअध्यक्ष नागेलीकर यांच्या उपस्थित काँग्रेस पक्षप्रवेश

 


डिजिटल सदस्य नोदणी जास्तीत जास्त करण्याचे नागेलीकर यांनी कार्यकर्त्यांना केले अवाहन


किनवट/प्रतिनिधी:     आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष गोविंदराव  शिंदे पाटील नागेलीकर यांच्या हस्ते तसेच किनवट ता.अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी व माहूर ता.अध्यक्ष संजयभाऊ राठोड,राजेंद्र केशवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार आनंद भालेराव यांचा भाजपातून काँग्रेस पक्षात प्रवेश  झाला.

       राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने डिजिटल सदस्य नोंदणी मोहीम सुरू असून या निमित्य जिल्हाअध्यक्षा चा अध्यक्षतेखाली माहूर येथील कपीलेश्वर धर्मशाळेत पदाधिकारी व कार्यकर्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. 

 याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष नागेलिकर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री व पालकमंत्री अशोकराव चव्हाण व प्रदेशअध्यक्ष  नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील नांदेड जिल्ह्यातील  डिजिटल सदस्य नोंदणी अभियान सुरु असून नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त डिजिटल सदस्य नोंदणी करून नांदेड जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे आव्हान केले.

या प्रसंगी काँग्रेस नेते यादवराव जाधव,किनवट ता.अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी, माहूर ता.अध्यक्ष संजयभाऊ राठोड,माजी नगराध्यक्ष माहूर राजेंद्र केशवे,किसनराव राठोड,ईश्वर चव्हाण, निरंजन केशवे,गिरीश नेमानीवार,जवाद आलम, आनंद तुपदळे,जयकुमार अडकीने,फारुख चव्हाण, प्रीती मुनेश्वर, शेख शहेनज, शेख परवीन, जयश्री भरणे,डॉ. तौफिक,राहुलवार सर, व पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...