Skip to main content

मी ...तू... आणि शेकोटी... प्रसिद्ध लेखीका रुचिरा बेटकर यांचा वाचनीय लेख



सध्या थंडीने चांगलीच हुडहुडी भरवलीय...अशा थंडगार वातावरणात एकदा तरी शेकोटीची उब घेण्याचा अनुभव काही निराळाच ...हातावर हात चोळत शेकोटी च्या भोवती बसून गप्पांची एक मैफल रंगवून जाते...अंगावर येणार्या थंडगार वार्यांना परतून लावण्यासाठी पेटवली जाणारी शेकोटी म्हणजे..एक न्यारीच उब...

आसमंतात अदृष्य गारव्याचा काहूरा कोंडलेला राहतोय आणि त्यामुळे दिवसाढवळ्या अंधार वाटु लागतोय. 

गारेगार थंडीत गरमागरम पदार्थांवर ताव मारून शेकोटीभोवती रंगलेली गप्पांची मैफल, कानावर पडली... आणि मी कसलाही विचार न करता तिथे पोहचले...ईथे

हॉररपासून म्युझिकपर्यंतच्या सगळ्या गोष्टी या अन्फरगॉटेबल ठरत होत्या. कडाक्याच्या थंडीत शेकोटी पेटल्यावर मनाचे सगळे कप्पे एक एक करून खुलत होते. गप्पां करत आठवणींचे  दारे उघडत होते फुल्ल नाइट गप्पांचा फड रंगणार होता. त्यात कोणताही विषय वर्ज्य नसणार होतो.अश्यात हातामध्ये

गरमागरम वाफाळत्या कॉफी चे झुरके मारत केलेल्या गप्पा, गोष्टी त...मला तुझी आठवण येणं हे नक्कीच होतं...आता ही शेकोटी ची, धग हवीहवीशी वाटतं होती. एकूण काय तर

आकाशात उडणाऱ्या शिकोटीच्या चिटोर्या सह स्वप्नरंजनाचे  आकर्षण होऊ लागले....अश्याच एका आठवणीत माझं मन तुझ्यात रंगल....

पश्चिमेला सूर्य मावळत असताना सूर्याची किरणे अंगावर घेताना आपण नितांतसुंदर वाहणार्या एखाद्या नदीच्या काठावर बसलो होतो... सोबतीला तू होतास..अर्थात तु हवाच होतास सोबतीला ....

त्या गुलाबी थंडी मध्ये आपण होतो...आणि समोर होती धगधगती शेकोटी...धगधगत मन...

पण तिथे आपल्या आपण असण्यामध्ये मी संपून गेले होते आणि तू देखील... चांगल्या वाईट व्यवहाराच्या पलीकडे फक्त भावनांची अभिव्यक्ती उरली होती...या भावनांना शब्दच उरले नव्हते... उरले होतं फक्त कुतूहल, उत्कंठा ,एक अनामिक पीडा ते कधी ही संपणार नसल्याचे भासतं होते... अशा स्थितीत एक वेळ अशी होती की हे क्षण संपणार तर नाहीत ना याची भिंती वाटायला लागली होती... मग नकळत एका अलौकिक प्रवासावर आपण दोघे निघालो होतो... हा प्रवास कुठेही जाण्यासाठीचा नव्हता ... तर स्वतः मधली पोकळी बाजूला सारून एकरूप होण्याचा प्रवास... समरूप होण्याचा प्रवास... या प्रवासात वेदना आहे,.. दुःख आहे... तरीही सहप्रवासी म्हणून दोघे खूप खुश होतो.. शेवटी कुठेतरी भावविभोर होऊन अश्रूंना वाट मोकळी करून दिली होतीच...जे या मनःपटलावर गुलाबी थंडी मुळे चे सुखद व हव्याहव्याश्या वाटणार्या अनुभूतीची अभिव्यक्ती देत होते... म्हणजे ते अश्रू नव्हते तर सुखद ,समाधानाच प्रतिक होतं...आता तू व मी असे दोघे नसून...आता एक झाले होतो...आपण ... तिथे कायमचं राहणार होतो एका आठवणींच्या पांघरुणात गुंडाळून... खरतर आपल्याला आपण असण्यासाठी शरीर व किंबहूना या मनाची देखील गरज नव्हती. या गुलाबी थंडी मुळे आपण म्हणजे तू... मी आणि मी ...तू... म्हणून उरले होतो... पुन्हा असं वाटतं की चल जाऊ त्या गुलाबी थंडी मध्ये जिथे मी मी राहणार नाही... तेथे तु...तू राहणार नाही... अश्या आठवणींच्या प्रवासावर...

रात्र कधी...? कशी...? संपली हे कळलंच नाही...

दिवस उजाडलेला होता...दिवस आणि मी आठवणीत गोठलेलेच राहिलोत असंच वाटतयं...आकाशात मळभ ही दाटून आलेलं.भर दिवसादेखील अंगावर सूर्यप्रकाश पडला तरी तो तापदायक वाटत नाही या सूर्याची किरणे अगदी सोनेरी वाटू लागतायत आणि अंगावर येणारी वाऱ्याची झुळूक .... माझ्यातल्या तु ची आणि तुझ्यातल्या मी ची आठवण करून देऊ लागली होती...


सौ.रूचिरा बेटकर नांदेड.

9970774211


Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.