किनवट:
मुंबईच्या मेहर हॉल मध्ये डॉक्टर कृष्णा चव्हाण द्वारा महात्मा गांधी रत्न अवार्ड 2021 चे शानदार आयोजनकरण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी बहुल भागातील आज की न्युज चे संपादक नसीर तगाले यांना मुंबई येथे "महात्मा गांधी रत्न अवार्ड 2021" ने सन्मानीत करण्यात आले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद भालेराव, तालुका अध्यक्ष आशिष शेळके, तालुका उपाध्यक्ष शेख आतिफ , सहसचिव प्रणय कोवे, तालुका संघटक राज माहुरकर ,प्रसिद्धीप्रमुख गंगाधर कदम,सदस्य विशाल गिमेकर ,रमेश परचाके आदी उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या जयंतीदिनी मुंबई या देशाच्या आर्थिक एक राजधानीमध्ये डॉक्टर कृष्णा चव्हाण यांनी महात्मा गांधी रत्न अवार्ड 2021 चे शानदार आयोजन केले होते कृष्णा चव्हाण फाउंडेशन रजिस्टर रजिस्टर्ड महात्मा गांधी रत्न अवार्ड 2019 चे आयोजन केले होते डॉक्टर डॉ भारती लव्हेकर, वर्सोवा अंधेरी मुम्बई च्या आमदार आणि गजेंद्र चौहान यांच्या हस्तेव सर्वाना आवार्ड प्रदान करण्यात आले. यात महात्मा गांधी रत्न अवार्ड 2021 सुनील बोंडे एसीपी, अनु मलिक, मधुश्री, गजेंद्र चौहान, डायरेक्टर मेहुल कुमार, प्रेमा किरण, सुनील पाल, एहसान कुरैशी, बीएन तिवारी,सिकन्दर खान, अरुण उग्रेजा, ज़ुबैर अली खान, ऎक्ट्रेस शबनम खान, मुनीश खान, गीतकार सुधाकर शर्मा, पारस अरुण बख्शी, दादा साहेब फाल्के के पोते चंद्रशेखर पुसाल्कर, डॉ योगेश लखानी, गणेश पचाने, आदत एमपी डायरेक्टर साउथ सिनेमा, वीआईपी कॉमेडियन, अली खान, एकता जैन, बबलू एक्स पोकल्स, आर राजपाल बेस्ट पब्लिसिटी डिज़ाइनर तसेच अनेक दिग्गजना सन्मानित करण्यात आले.
सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण
Comments
Post a Comment