नांदेड :
महाराष्ट्रामधील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण करून घेणे महाराष्ट्र सरकारने अनिवार्य केले आहे. त्यामुळे भारतीय संविधानाने दिलेल्या मुलभूत हक्कावर वर गदा येत आहे.शाळा महाविद्यालय यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाचे 2 डोस घेतले आहेत. त्यांनाच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे अशी विद्यार्थ्यावर अन्यायकारक भूमिका या ठिकाणी काही महाविद्यालयांनी शाळा घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुढे बोलताना बुक्तरे म्हणाले की,जर महाविद्यालयांना लसीकरण अनिवार्य करायचं असेल तर त्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील लसीची मात्रा ची उपलब्धता करून घ्यावी व ज्या विद्यार्थ्यांना लसीची मात्रा घ्यायची आहे त्यांनी त्या विद्यार्थ्यांना द्यावी व जे विद्यार्थी कलर्स घेणार नाहीत त्यांना सक्ती करू नये लस घेतल्यामुळे कोरोना होणार नाही याची हमी नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी लाच घेतली त्यांना शारीरिक त्रास झाल्यास महाविद्यालय व प्रशासननाने याची जबाबदारी घ्यावी.
या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची पायमल्ली होताना दिसत आहे ही थांबली पाहिजे व सर्वसामान्य जनतेला सर्व योजनांचा लाभ दिला पाहिजे अन्यथा ऑल इंडिया पँथर सेना लसीकरणाची सक्ती करणाऱ्या महाविद्यालयाच्या समोर आंदोलन उभे केल्याशिवाय राहणार नाही. अशा आशयाचे पत्र निवेदन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले आहे .
यावेळी उपस्थित ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे , युवा जिल्हाध्यक्ष सुरेश सावते, नांदेड ता.उपाध्यक्ष आनंदा पाटील, पत्रकार गणेश ढोले, वंचितचे तालुका उपाध्यक्ष केशव जाधव , सुनील पाटील , अनिकेत पोहरे , पत्रकार संजय राक्षसे आदी जण उपस्थित होते.
Comments
Post a Comment