Skip to main content

"धरती ही छान भिजली पाऊसही पडला चांगला शेतकरी राजा देखील आनंदाने नाहून गेला "

 


शिक्षक कविंनी मृग नक्षत्रा निमित्त केली शब्दांची ऑनलाईन पेरणी.. " कविता शेती मातीच्या " 🌱🌱🌱

रोपाला पाणी घालून केले कार्यक्रमाचे उदघाटन

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंचचा उपक्रम

नांदेड ( प्रतिनिधी ) :

मृग नक्षत्रा निमित्त अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच महाराष्ट्र शाखा नांदेड च्या वतीने औरंगाबाद विभागीय ऑनलाईन कविसंमेलन नुकतच संपन्न झालं या संमेलनाचे अध्यक्ष उस्मानाबाद येथील बाल साहित्यिक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य समाधान शिकेतोड तर उद्घाटक मुंबई येथील अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे संस्थापक तथा राज्याध्यक्ष नटराज मोरे होते. प्रमुख पाहुणे  विभागीय अध्यक्ष तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर आदी होते.


रोपाला पाणी घालून संमेलनाचे उद्घाटन झाले. श्री. मोरे यांनी उद्घाटकीय भाषणात विभागातील विविध जिल्हयाच्या शिक्षक कविना शुभेच्छा दिल्या.श्री मुनेश्वर यांनी मनोगत व्यक्त करून 'रानगंध ' ही कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव यांनी केले तर जिल्हा सरचिटणीस रुपेश मुनेश्वर यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करून आभार मानले. कविसंमेलनात गझलकार चंद्रकांत कदम, हृदयक्षर मिलिंद कंधारे, स्तंभलेखक नासा येवतीकर, कवयत्री अर्चना गरुड, महानंदा चिभडे, विजया तारू, कवीमित्र दर्शन जोशी, साहेबराव डोंगरे, भुमया इंदूरवार, सचिन बेंडभर , रामस्वरूपमडावी आदी सहभागी होते.


कवीसंमेलनाध्यक्ष समाधान शिकेतोड यांनी आपले मनोगत व्यक्त करून शेतकऱ्यांच्या जीवनावरती कविता सादर केली आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली..

"औत हाकला हाकला

 बाप थकला थकला 

कधी मस्तक फुटलं

औताच्या दांडीन 

सुटलेलं रूमण 

धरिता मांडीन "



गझलकार चंद्रकांत कदम यांनी शेती मातीच्या या विषयावरील सुंदर अशी रचना सादर करून दाद मिळवली..

"धर्माच्या पंथाच्या जातीच्या पातीच्या 

जागर करू या कवितांचा शेतीच्या मातीच्या 

कसा लागला क्रांतिकारी शेतीचा शोध 

मानवतेला कळू लागले हिरवे संबोध "


साहेबराव डोंगरे यांनी सुंदर गेय कविता गाऊन रसिकांच्या मनाचा ठाव घेतला..

"लागे मज लढा शेतीचा शेतीचा

 मोहवी मना गंध हा मातीचा 

तृप्त मातीत पिता पावसाचे पाणी 

जोजवी बीजाची पिले तानी तानी 

झाडे वेली गाणी आनंदाची गाणी "



हृदयक्षर मिलिंद कंधारे यांनी शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या मनातील घालमेल कवितेतून उद्युक्त केले..

"काही पानावर पडलाय मावा

 काही कुरतडले जात आहेत

 हळुवार मशागत चुकीची 

पक्की फसली पेरणी 

मेहनतीचे वाभाडे निघाले 

कळेना काय झाले ? "


महानंदा चिभडे या कवयित्रीने निसर्गाच्या सानिध्यातली सुंदर रचना सादर केली..

"धरणी माय माझी घेई सामावून  पाणी 

आणि शेतकरी मग पिकवी हिरवे रान 

पोटात आमच्या तृप्ती आराम

 बाकी बळीराजा काही दाम "



स्तंभलेखक नासा येवतीकर यांनी पावसावरची आणि शेतकऱ्यांच्या समस्या वरती कविता सादर केली..

"धरती ही छान भिजली

 पाऊसही पडला चांगला 

शेतकरी राजा देखील 

आनंदाने नाहून गेला "


कवियत्री अर्चना गरुड ह्यांनी निसर्गातील रम्य वातावरणातील सुंदर रचना सादर केली..

"लागे मृगाची चाहूल 

सजे बळी राजा रानी 

नदी-नाले खळाळत 

गाती झुळझुळ गाणी "



कवी सचिन बेंडभर यांनी पिकाची गाणी गेय कविता सादर केली..

"गात गाणी फिरे पाणी पाटातूनी खळखळ

तृष्णा भागवी पिकाची छाया धरते आभाळ "


विजया तारु  यांनी मृग नक्षत्रावर सुंदर कविता सादर  केली..

"मृग नक्षत्राच्या सरी धडकता

 गंध दरवळतो मातीचे 

त्या गंधातून वीज चमकता 

रंग फुलवता धरतीचे "



भुमया इंदुरवार यांनी पावसाच्या अन शेतीच्या कविता सादर केली..

"थेंब पावसाचे येता माती गर्भार राहिली 

काळ्या मातीने मातीत रूप आपले पाहिली "


"कणाकणात जगाच्या मनामनात बोलतो 

माझा विठू पांडुरंग 

माझ्या शिवारी डोलतो "

 दर्शन जोशी या कवींनी पांडुरंग अन शिवार यांचे सुंदर असे मिश्रण करून गेय कविता सादर करून वाहवा मिळवली.


हा कार्यक्रम मंडळाच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब वर प्रसारित झाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. असंख्य रसिक ऑनलाइन उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...