Skip to main content

"धरती ही छान भिजली पाऊसही पडला चांगला शेतकरी राजा देखील आनंदाने नाहून गेला "

 


शिक्षक कविंनी मृग नक्षत्रा निमित्त केली शब्दांची ऑनलाईन पेरणी.. " कविता शेती मातीच्या " 🌱🌱🌱

रोपाला पाणी घालून केले कार्यक्रमाचे उदघाटन

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंचचा उपक्रम

नांदेड ( प्रतिनिधी ) :

मृग नक्षत्रा निमित्त अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच महाराष्ट्र शाखा नांदेड च्या वतीने औरंगाबाद विभागीय ऑनलाईन कविसंमेलन नुकतच संपन्न झालं या संमेलनाचे अध्यक्ष उस्मानाबाद येथील बाल साहित्यिक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य समाधान शिकेतोड तर उद्घाटक मुंबई येथील अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे संस्थापक तथा राज्याध्यक्ष नटराज मोरे होते. प्रमुख पाहुणे  विभागीय अध्यक्ष तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर आदी होते.


रोपाला पाणी घालून संमेलनाचे उद्घाटन झाले. श्री. मोरे यांनी उद्घाटकीय भाषणात विभागातील विविध जिल्हयाच्या शिक्षक कविना शुभेच्छा दिल्या.श्री मुनेश्वर यांनी मनोगत व्यक्त करून 'रानगंध ' ही कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव यांनी केले तर जिल्हा सरचिटणीस रुपेश मुनेश्वर यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करून आभार मानले. कविसंमेलनात गझलकार चंद्रकांत कदम, हृदयक्षर मिलिंद कंधारे, स्तंभलेखक नासा येवतीकर, कवयत्री अर्चना गरुड, महानंदा चिभडे, विजया तारू, कवीमित्र दर्शन जोशी, साहेबराव डोंगरे, भुमया इंदूरवार, सचिन बेंडभर , रामस्वरूपमडावी आदी सहभागी होते.


कवीसंमेलनाध्यक्ष समाधान शिकेतोड यांनी आपले मनोगत व्यक्त करून शेतकऱ्यांच्या जीवनावरती कविता सादर केली आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली..

"औत हाकला हाकला

 बाप थकला थकला 

कधी मस्तक फुटलं

औताच्या दांडीन 

सुटलेलं रूमण 

धरिता मांडीन "



गझलकार चंद्रकांत कदम यांनी शेती मातीच्या या विषयावरील सुंदर अशी रचना सादर करून दाद मिळवली..

"धर्माच्या पंथाच्या जातीच्या पातीच्या 

जागर करू या कवितांचा शेतीच्या मातीच्या 

कसा लागला क्रांतिकारी शेतीचा शोध 

मानवतेला कळू लागले हिरवे संबोध "


साहेबराव डोंगरे यांनी सुंदर गेय कविता गाऊन रसिकांच्या मनाचा ठाव घेतला..

"लागे मज लढा शेतीचा शेतीचा

 मोहवी मना गंध हा मातीचा 

तृप्त मातीत पिता पावसाचे पाणी 

जोजवी बीजाची पिले तानी तानी 

झाडे वेली गाणी आनंदाची गाणी "



हृदयक्षर मिलिंद कंधारे यांनी शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या मनातील घालमेल कवितेतून उद्युक्त केले..

"काही पानावर पडलाय मावा

 काही कुरतडले जात आहेत

 हळुवार मशागत चुकीची 

पक्की फसली पेरणी 

मेहनतीचे वाभाडे निघाले 

कळेना काय झाले ? "


महानंदा चिभडे या कवयित्रीने निसर्गाच्या सानिध्यातली सुंदर रचना सादर केली..

"धरणी माय माझी घेई सामावून  पाणी 

आणि शेतकरी मग पिकवी हिरवे रान 

पोटात आमच्या तृप्ती आराम

 बाकी बळीराजा काही दाम "



स्तंभलेखक नासा येवतीकर यांनी पावसावरची आणि शेतकऱ्यांच्या समस्या वरती कविता सादर केली..

"धरती ही छान भिजली

 पाऊसही पडला चांगला 

शेतकरी राजा देखील 

आनंदाने नाहून गेला "


कवियत्री अर्चना गरुड ह्यांनी निसर्गातील रम्य वातावरणातील सुंदर रचना सादर केली..

"लागे मृगाची चाहूल 

सजे बळी राजा रानी 

नदी-नाले खळाळत 

गाती झुळझुळ गाणी "



कवी सचिन बेंडभर यांनी पिकाची गाणी गेय कविता सादर केली..

"गात गाणी फिरे पाणी पाटातूनी खळखळ

तृष्णा भागवी पिकाची छाया धरते आभाळ "


विजया तारु  यांनी मृग नक्षत्रावर सुंदर कविता सादर  केली..

"मृग नक्षत्राच्या सरी धडकता

 गंध दरवळतो मातीचे 

त्या गंधातून वीज चमकता 

रंग फुलवता धरतीचे "



भुमया इंदुरवार यांनी पावसाच्या अन शेतीच्या कविता सादर केली..

"थेंब पावसाचे येता माती गर्भार राहिली 

काळ्या मातीने मातीत रूप आपले पाहिली "


"कणाकणात जगाच्या मनामनात बोलतो 

माझा विठू पांडुरंग 

माझ्या शिवारी डोलतो "

 दर्शन जोशी या कवींनी पांडुरंग अन शिवार यांचे सुंदर असे मिश्रण करून गेय कविता सादर करून वाहवा मिळवली.


हा कार्यक्रम मंडळाच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब वर प्रसारित झाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. असंख्य रसिक ऑनलाइन उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला