Skip to main content

सुर्य-चंद्र माणसासाठी माणसाचीच माणसाला का होते आडकाठी....... मराठी भाषा गौरव दिना निमित्त कवि समेंलन उत्साहात




(शहर प्रतिनीधी किनवट ):

दिवंगत प्रसिध्द, साहित्यिक, कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणुन साजरा केला जातो याच दिनाचे औचित्य साधुन बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तर्फे ऑनलाईन कवि संमेलानाचे आयोजन दुपारी १:०० वाजता करण्यात आले होते या कवितेच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द कवी, लेखक अॅड के.के. साबळे हे होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य राजकुमार नेम्मानिवार यांनी मांडले तर

 डॉ.एस.के. बेंबरेकर यांनी मराठी भाषा दिनाच्या ऑनलाईन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास ऑनलाईन प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील ,कार्यक्रमाची सुरवात ऑनलाईन कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन करुन झाली.

कविसंमेलनाच्या सुरवातीस कवी रमेश मुनेश्वर यांनी "हाता पायाच्या जखमा साऱ्या 

'बा' च्या कहाण्या सांगायच्या 

शेतामध्ये पीक नाही तरीही

बाप जगायचा" 

हि शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी काव्य रचना सादर केली व शब्दचक्षु नावाची प्रेम कविता सादर करुन ऑनलाईन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल .

या नतंर युवाकवी राजेश पाटील यांनी 

" खर सांगु माॅ तुझ्यावर लिहतांना शब्द सुध्दा अपुरे पडले

जीवन काय असते हे तुझ्या मुळेच कळले 

व "त्या लिबांच्या झाडाखाली सावली होती

तेव्हांच तु मला आय लव्ह यु म्हणाली होती"

 हि कविता सादर केली व उपस्थित लाईव्ह प्रेक्षकांची दाद मिळवली .

या नंतर कविसंमेलन अध्यक्ष अॅड के. के.साबळे  यांनी 

"सुर्य-चंद्र माणसासाठी पृथ्वीही माणसासाठी

माणसाचीच माणसाला का होते आडकाठी 

पर्वतही माणसासाठी 

नद्याही माणसासाठी

घाणीचे साम्राज्य माणसाने का 

करावे नद्याकाठी"

 हि सामाजिक रचना व " बाळा तुझी मला रे काळजी वाटे तुझ्या जीवनाला आता फुटले अनेक फाटे" हि रचना सादर केली व प्रेक्षकांची वाहवा मिळवली 

या नंतर कवी वैभव जिल्हावार कवी रुपेश मुनेश्वर,डॉ. आनंद भालेराव, प्रा.सुरेश पाटील,प्रा.विजया खामनकर व विद्यार्थी अर्जुन जाधव, दिव्या बावणे, राहुल करमनकर, नितीन भगत, राजेश्वरी मडावी, रामेश्वर शेंडे, शेख अरशद, शुभम राठोड, विकास ठाकरे आदी बळीराम पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी ऑनलाईन झुम अँपवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार बळीराम पाटील महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. पंजाब शेरे यांनी केले  .







Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.