Skip to main content

सुर्य-चंद्र माणसासाठी माणसाचीच माणसाला का होते आडकाठी....... मराठी भाषा गौरव दिना निमित्त कवि समेंलन उत्साहात




(शहर प्रतिनीधी किनवट ):

दिवंगत प्रसिध्द, साहित्यिक, कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणुन साजरा केला जातो याच दिनाचे औचित्य साधुन बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तर्फे ऑनलाईन कवि संमेलानाचे आयोजन दुपारी १:०० वाजता करण्यात आले होते या कवितेच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द कवी, लेखक अॅड के.के. साबळे हे होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य राजकुमार नेम्मानिवार यांनी मांडले तर

 डॉ.एस.के. बेंबरेकर यांनी मराठी भाषा दिनाच्या ऑनलाईन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास ऑनलाईन प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील ,कार्यक्रमाची सुरवात ऑनलाईन कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन करुन झाली.

कविसंमेलनाच्या सुरवातीस कवी रमेश मुनेश्वर यांनी "हाता पायाच्या जखमा साऱ्या 

'बा' च्या कहाण्या सांगायच्या 

शेतामध्ये पीक नाही तरीही

बाप जगायचा" 

हि शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी काव्य रचना सादर केली व शब्दचक्षु नावाची प्रेम कविता सादर करुन ऑनलाईन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल .

या नतंर युवाकवी राजेश पाटील यांनी 

" खर सांगु माॅ तुझ्यावर लिहतांना शब्द सुध्दा अपुरे पडले

जीवन काय असते हे तुझ्या मुळेच कळले 

व "त्या लिबांच्या झाडाखाली सावली होती

तेव्हांच तु मला आय लव्ह यु म्हणाली होती"

 हि कविता सादर केली व उपस्थित लाईव्ह प्रेक्षकांची दाद मिळवली .

या नंतर कविसंमेलन अध्यक्ष अॅड के. के.साबळे  यांनी 

"सुर्य-चंद्र माणसासाठी पृथ्वीही माणसासाठी

माणसाचीच माणसाला का होते आडकाठी 

पर्वतही माणसासाठी 

नद्याही माणसासाठी

घाणीचे साम्राज्य माणसाने का 

करावे नद्याकाठी"

 हि सामाजिक रचना व " बाळा तुझी मला रे काळजी वाटे तुझ्या जीवनाला आता फुटले अनेक फाटे" हि रचना सादर केली व प्रेक्षकांची वाहवा मिळवली 

या नंतर कवी वैभव जिल्हावार कवी रुपेश मुनेश्वर,डॉ. आनंद भालेराव, प्रा.सुरेश पाटील,प्रा.विजया खामनकर व विद्यार्थी अर्जुन जाधव, दिव्या बावणे, राहुल करमनकर, नितीन भगत, राजेश्वरी मडावी, रामेश्वर शेंडे, शेख अरशद, शुभम राठोड, विकास ठाकरे आदी बळीराम पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी ऑनलाईन झुम अँपवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार बळीराम पाटील महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. पंजाब शेरे यांनी केले  .







Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...