Skip to main content

किनवटच्या शिक्षकाचा प्रामाणिकपणा ! एसबीआय बँकेची जास्त आलेली रक्कम परत केली



 किनवट येथील उर्दू शाळेमध्ये शिक्षक असलेल्या सुबहान चव्हाण यांनी  बँकेला परत करून इमानदारीचा आदर्श घालून दिला आहे.

सुभान चव्हाणांच्या या प्रामाणिकपणाचे बँक कर्मचाऱ्यांसह नागरिकांकडून कौतुक होत आहे.

झाले  असे की किनवट येथे उर्दु शाळेमध्ये शिक्षक  असलेले सुबहान चव्हाण यांचे येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत खाते आहे. 

दिनांक 18 डिसेंबर रोजी त्यांना पैशाची आवश्यकता असल्यामुळे ते आपल्या खात्यातील 3 लाख 40 हजार रुपये उचल करण्यासाठी बँकेत गेले.

 तेथे पैसे उचलण्याची स्लिप भरून दाखल केली असता संबंधित कर्मचाऱ्याने नजरचुकीने 340000 रक्कमे ऐवजी 3 लाख 80 हजार रुपये सुबहान चव्हाण यांच्या हातात दिले.

 रक्कम मोठी असल्यामुळे चव्हाण यांनी मोजणी न करता पूर्ण रक्कम बॅगमध्ये टाकून घरी परतले

 घरी आल्यानंतर पैशाची बॅग जशीच्या तशी कपाटात ठेवून ते नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी  बाहेरगावी गेले. कार्यक्रम आटोपून रविवारी घरी परतल्यानंतर त्यांनी बँकेतून उचललेल्या पैशाची मोजणी केली असता 40 हजार रुपयाची रक्कम 

अधिक आल्याचे त्यांच्या लक्षात आले परंतु 40 हजार रु जास्त आले म्हणून उल्हासित न होता सुबहाण चव्हाण यांनी तात्काळ स्टेट बँक ऑफ इंडिया गाठून तेथे बँक मॅनेजर भेट घेतली व घडलेला सर्व प्रकार सांगून अधिक आलेले 40 हजार रुपये बँक मॅनेजरला साभार परत केल्यानंतर चौहान यांच्या प्रामाणिकपणाबद्दल बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे.पैसे बघितल्यानंतर बऱ्याचदा इमानदारीने वागणाऱ्या व प्रामाणिक समजल्या जाणाऱ्या 

माणसाची सुद्धा नियत बिघडत असते याचा आपण नेहमीच अनुभव घेतो परंतु सुबहान चव्हाण सारखी  प्रामाणिक माणसे कशीही 

परिस्थिती असली तरी आपला प्रामाणिकपणा कायम ठेवून लबाड्याना इमानदारीचा आदर्श घालून देत असतात याचा प्रत्यय यानिमित्ताने  आला आहे

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.