Skip to main content

किनवटच्या शिक्षकाचा प्रामाणिकपणा ! एसबीआय बँकेची जास्त आलेली रक्कम परत केली



 किनवट येथील उर्दू शाळेमध्ये शिक्षक असलेल्या सुबहान चव्हाण यांनी  बँकेला परत करून इमानदारीचा आदर्श घालून दिला आहे.

सुभान चव्हाणांच्या या प्रामाणिकपणाचे बँक कर्मचाऱ्यांसह नागरिकांकडून कौतुक होत आहे.

झाले  असे की किनवट येथे उर्दु शाळेमध्ये शिक्षक  असलेले सुबहान चव्हाण यांचे येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत खाते आहे. 

दिनांक 18 डिसेंबर रोजी त्यांना पैशाची आवश्यकता असल्यामुळे ते आपल्या खात्यातील 3 लाख 40 हजार रुपये उचल करण्यासाठी बँकेत गेले.

 तेथे पैसे उचलण्याची स्लिप भरून दाखल केली असता संबंधित कर्मचाऱ्याने नजरचुकीने 340000 रक्कमे ऐवजी 3 लाख 80 हजार रुपये सुबहान चव्हाण यांच्या हातात दिले.

 रक्कम मोठी असल्यामुळे चव्हाण यांनी मोजणी न करता पूर्ण रक्कम बॅगमध्ये टाकून घरी परतले

 घरी आल्यानंतर पैशाची बॅग जशीच्या तशी कपाटात ठेवून ते नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी  बाहेरगावी गेले. कार्यक्रम आटोपून रविवारी घरी परतल्यानंतर त्यांनी बँकेतून उचललेल्या पैशाची मोजणी केली असता 40 हजार रुपयाची रक्कम 

अधिक आल्याचे त्यांच्या लक्षात आले परंतु 40 हजार रु जास्त आले म्हणून उल्हासित न होता सुबहाण चव्हाण यांनी तात्काळ स्टेट बँक ऑफ इंडिया गाठून तेथे बँक मॅनेजर भेट घेतली व घडलेला सर्व प्रकार सांगून अधिक आलेले 40 हजार रुपये बँक मॅनेजरला साभार परत केल्यानंतर चौहान यांच्या प्रामाणिकपणाबद्दल बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे.पैसे बघितल्यानंतर बऱ्याचदा इमानदारीने वागणाऱ्या व प्रामाणिक समजल्या जाणाऱ्या 

माणसाची सुद्धा नियत बिघडत असते याचा आपण नेहमीच अनुभव घेतो परंतु सुबहान चव्हाण सारखी  प्रामाणिक माणसे कशीही 

परिस्थिती असली तरी आपला प्रामाणिकपणा कायम ठेवून लबाड्याना इमानदारीचा आदर्श घालून देत असतात याचा प्रत्यय यानिमित्ताने  आला आहे

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...