Skip to main content

आदिवासींच्या हक्कासाठी महामुक्काम आदोंलन

 


किनवट ,ति.२५ : अखिल भारतीय किसान सभा ,आदिवासी आधिकर राष्ट्रीय मंच व आदिवासी संघर्ष समिती किनवट – माहूर च्या वतीने जमिनीच्या हक्कासाठी आजपासून(ता. २५) उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर आदिवासी बांधवांचे महामुक्काम आंदोलन सुरु झाले आहे

   या आंदोलनात प्रचंड संख्येने आदिवासी सामील झाले आहेत.



आदिवासींचे क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांनी स्वातंत्र्याच्या  चळवळीपासून आदिवासींना जल, जंगल व जमिनीचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी सशस्त्र उठाव केला. स्वातंत्र्यानंतर माहूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी जमीनदार ग्रामीण भागातील सेठ सावकार यांनी जबरदस्तीने किंवा कवडीमोल किमतीने भ्रष्ट तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, दलाल चमचे, यांच्या मदतीने आदिवासींच्या जमिनी हडप करून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 36 व 36 अनुसार आदिवासी खातेदारांच्या जमिनीचे कोणत्याही प्रकारच्या हस्तांतरणास कडक निर्बंध घालण्यात आलेले असतानासुद्धा किनवट माहूर तालुक्यात आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचे करण्याचे सत्र चालूच आहे.


    सारखणी(ता. किनवट) येथील सेवानिवृत्त तहसीलदार सिताराम रामजी कूडमेत्ते,डोणीकर यांचे वडील रामजी महादू कुडमेते डोनीकर यांना हैदराबाद कूळ कायदा ३८ ई प्रमाणे २१ मे १९५७ ला ३० एकर जमीन मिळाली होती.परंतु,सारखणी परिसरातील भूमाफियानी बळजबरी ने महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात जमिनीची लूट करून आलिशान बंगले उभे केले आहेत. उदरनिर्वाहासाठी शिल्लक असलेल्या जमिनीवर डोळा ठेवून किनवट -  माहूर राज्य मार्गाला लागून असलेल्या जमिनीच्या काही क्षेत्रावर 11 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी दहा वाजता च्या सुमारास गैर आदिवासी रमेश राठोड, निर्मला राठोड, मयूर रमेश राठोड, यांनी बेकायदेशीर 15 ते 20 लोकांचा जमाव करून कुडमेते, डोणीकर व परिवाराला जातीवाचक शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या देऊन अतिक्रमण करून टिनाचे शेड उभे केले आहे. सदर अतिक्रमणाबाबत तहसीलदार किनवट,पोलीस स्टेशन सिंदखेड यांना तक्रार दिली असता अद्याप कारवाई झालेली नाही. दिवसेंदिवस आदिवासी वरील अत्याचार वाढतच आहे.अन्याय अत्याचाराच्या विरोधात सारखणी सह किनवट - माहूर तालुक्यातील आदिवासींच्या हस्तांतरित जमिनीची एसआयटीमार्फत चौकशी होऊन संबंधित शेतकऱ्याला किंवा त्यांच्या वारसांना जमीन परत देण्याची कारवाई करा,11 फेब्रुवारी 2020 रोजी कुडमेते, डोनीकर कुटुंबीयांच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण तत्काळ हटवा व अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे अतिक्रमण धारकावर गुन्हे दाखल करा, कसत असलेल्या जमिनीचे पट्टे वाटप करा, उनकेश्वर येथील माधव गेडाम यांना मारहाण करून पिकाची नासाडी करणाऱ्या मांडवी वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करा व तत्काळ नुकसानभरपाई देऊन सहकार्य करा,निराळा येथील माजी सरपंच सुनील गेडाम यांना जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब जेरबंद करा, या मागणीसाठी आदिवासी आधिकर राष्ट्रीय मंच व आदिवासी संघर्ष,किसान  समिती व किसान सभा माहूर -किनवट च्या वतीने जमिनीच्या हक्कासाठी  उपविभागीय कार्यालय समोर आदिवासी बांधवांचे महामुक्काम आंदोलन सुरु झाले  आहे.

  या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीया किसान सभा राज्य अध्यक्ष कॉम्रेड किसन गुजर, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच चे कॉम्रेड शंकर सिडाम, माकप राज्य समितिचे सदस्य काॅ.अर्जुन आडे आदिवासी संघर्ष समिती किनवट माहूर चे वसंत कुडमेते,गणपत मडावी,काॅ.शेषेराव ढोले,दादाराव टारपे हे करत अाहेत.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला