साहित्यिकांनी भूमिका घेऊन लिहिले पाहिजे - अशोक कुबडे -राज्यस्तरीय साहित्य संमेलनाध्यक्षांचे प्रतिपादन - साहित्य लेखनाबरोबर प्रसारणही आवश्यक
वर्धा/ पुलगाव- साहित्यिक लेखकांनी आपली भूमिका निश्चित करून साहित्य लेखन केले पाहिजे. उत्स्फुर्तपणे आलेल्या विषयावरती लेखन केले तरच दर्जेदार साहित्य निर्मिती होते.नवोदीत साहित्यिकांनी ज्येष्ठ साहित्यिकांचे साहित्य वाचलं पाहिजे तरच आपल्या साहित्याला योग्य दिशा मिळेल अन्यथा आपण भरकटत राहू. जास्तीत जास्त वाचन करून कमीत कमी लेखन केले पाहिजे अन्यथा या साहित्य लेखनाच्या प्रचंड मोठ्या प्रवाहात आपण सहज वाहून जाऊ.. प्रत्येकाने लेखन आणि साहित्य वाचकांपर्यंत पोहोचणे हे जबाबदारीने केले पाहिजे साहित्य लिहून मोकळे होता कामा नये. साहित्यिकांनी नियोजनबद्धपणे लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्यिकांनी आपली लेखनाची साहित्य प्रसारणाची एक भूमिका घेऊन साहित्य लेखन केले पाहिजे. असे प्रतिपादन पुलगाव वर्धा येथे पार पडलेल्या चौथ्या अव्यक्त अबोली राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून प्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे यांनी केले. यावेळी मंचावर साहित्य संमेलनाचे उद्घाटक दीपक नगराळे, स्वागताध्यक्ष मनोहर शहारे,साहित्यिक अशोक वाघमारे, मुख्य आयोजक जयश्री