Skip to main content

दलित पॅंथर ही आग आहे, पिढ्यानपिढ्या जळत राहणार- डॉ.सुरज येंगडे

 


- दलित पॅंथरचा सुवर्ण महोत्सव; तरुणांचा उस्पूर्त सहभाग

औरंगाबाद: दलीत पँथर अगोदरच काळ साहित्य विद्रोहाचा काळ आहे. साहित्यातून विचार तयार झाला विचारातून नवी ऊर्जा तयार झाली आणि नव्या ऊर्जेला पर्याय म्हणून  पॅंथरच निर्माण झालं. त्यानंतरने चार वर्ष मोठ्या ताकतीने काम केलं. पॅंथर मोठी होत गेली. नेतेही मोठे होत गेले.ज्या ठिकाणी अंन्याय अत्याचार व्हायचे त्या ठिकाणी पँथर जाणारा हे कळताच तेव्हा प्रस्थापितांच्या मनात थरकाप उडायचा असा धाक पँथरचा होता.मात्र आयडीयॉलोजी कारणाने पँथर बरखास्त करण्यात आली. यामध्ये विरोधकांचा हस्तक्षेप महत्त्वाचा होता. मात्र दलित पॅंथर ही आग आहे ही सहज विझत नाही ती पिढ्यानपिढ्या जळत राहणार आहे असेही येंगडे म्हणाले.





 दलित पॅंथरच्या पन्नासाव्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य सभागृहामध्ये रविवार दि.१८ रोजी शेवटचा दिवस होता.या यावेळी मार्गदर्शक म्हणून संशोधक डॉ. सुरज येंगडे जेष्ठ पत्रकार दिलीप मंडल पोलीस अधिकारी प्रवीण मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, पँथरच्या माध्यमातून तुमच्या पूर्वजांनी विषमतावादी लोकांच्या विरोधात लढे उभारले होतो.ते समाजाला सुधरवण्याचे आंदोलन होत.तुम्ही जेव्हा समाजाला सुधरवता तेव्हा तुम्ही देश सुधरवण्याच काम करत असता.यासाठी देश सुधरवणाऱ्या दलीत पँथरचे पन्नासावे वर्ष अभिमानाने साजरे करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. तंबाखू, गुटखा यासारख्या पदार्थांची जाहिरात करणारे आजच्या तरुण पिढीचे आदर्श कसे असू शकतात.आजच्या चित्रपटांची खरापणे गेला आहे. इतर देशातील चित्रपटांचं अनुकरण करून इथले चित्रपट तयार केले जातात.हे चित्रपट तयार करणाऱ्यांनी ठरवलंय तुम्ही नवीन काही बघू शकतं नाही.यामुळे आजच्या तरुणाचे आदर्श हे व्यावस्थे विरुद्ध लढून स्वाभिमानाने जगायला लावणारे असावे असे सुरज येंगडे म्हणाले.

आंदोलनातून घरी पाठवण्याचा अर्थ कळाला....

डॉ. सुरज येंगडे म्हणाले, महाविद्यालयात असताना आमच्या परिसरात एक आंदोलन होत होत.त्यात मी सहभागी झालो.मात्र आमच्या परिसरातील लोकांनी मला त्या ठिकाणाहून घरी पाठवून दिलं.त्यावेळी मला अस वाटलं की मी तरुण आहे.आंदोलनात गरज पडली तर दगडही मारू शकतो, मग मला घरी का पाठवलं.मात्र मला उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचं होत आणि त्यासाठी पासपोर्ट काढायची गरज पडली त्यावेळी मोठ्या लोकांनी घरी का पाठवलं त्याच खर कारण कळलं.


जेष्ठ पत्रकार दिलीप मंडल म्हणाले की, भारतीय दलीत पँथर ने करोडो लोकांच्या आयुष्यात न्याय मिळवून दिला.एखादी मुव्हमेंट म्हणजे अस नाही की लगेच त्याच काय इनपुट आहे. मुव्हमेंट पूर्ण झाल्यानंतर इनपुट मिळत असतात.सध्याच्या परिस्थितीत आपण आपल्या स्वप्नांची उंची वाढवणं गरजेच आहे.सध्याची परिस्थिती यासाठी अनुकूल नसेलही.मात्र पुर्वी च्या तुलनेत आपल्याकडे सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. दलीत पँथर म्हणजे असंतोषातून निर्माण झालेली चळवळ आहे.या चळवळीने समाजातील पीडितांना न्याय मिळवून दिला.

प्रस्ताविक सतीश पट्टेकर,सूत्रसंचालन राजेंद्र गोणारकर यांनी केले.


ह्यावेळी राहुल प्रधान, सचिन निकम,सिद्धार्थ शिंगारे,गुणरत्न सोनवणे,अतुल कांबळे, सिद्धार्थ मोरे,राहुल खंडागळे,प्रशांत बोराडे, भीमराव वाघमारे,भागवत चोपडे संदिप तूपसमुद्रे,जयेश पठाडे,राहुल वडमारे,आदींची उपस्थिती होती.

दुसऱ्या सत्रात लोकनाथ यशवंत,शेषराव धांडे,वनश्री वनकर यांनी कविता सादर केल्या.

महिला चळवळीवरील परिसंवादात डॉ.सुनीता सावरकर,योगिनी पगारे,वनश्री वनकर,डॉ.सोनाली म्हस्के यांनी आपले विचार मांडले.

सुशीला खडसे,प्राचार्य यशवंत खडसे,अमोल झोडपे,के व्ही मोरे,डॉ.प्रमोद दुथडे,डॉ.अविनाश सोनवणे,विलास जगताप,प्रा.सुरेश शेळके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सायंकाळी विपीन तातड यांनी वंदन माह्या भीमा,महिलांचे प्रश्न मांडणारे हॅपी वुमन्स दे,घे ना लॉकडाऊन हे   रॅप सादर करून महोत्सवात रंग भरले.

कैलास खानजोडे यांनी साकारलेली सुंदर रंगोळी चित्र उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...