Skip to main content

दलित पॅंथर ही आग आहे, पिढ्यानपिढ्या जळत राहणार- डॉ.सुरज येंगडे

 


- दलित पॅंथरचा सुवर्ण महोत्सव; तरुणांचा उस्पूर्त सहभाग

औरंगाबाद: दलीत पँथर अगोदरच काळ साहित्य विद्रोहाचा काळ आहे. साहित्यातून विचार तयार झाला विचारातून नवी ऊर्जा तयार झाली आणि नव्या ऊर्जेला पर्याय म्हणून  पॅंथरच निर्माण झालं. त्यानंतरने चार वर्ष मोठ्या ताकतीने काम केलं. पॅंथर मोठी होत गेली. नेतेही मोठे होत गेले.ज्या ठिकाणी अंन्याय अत्याचार व्हायचे त्या ठिकाणी पँथर जाणारा हे कळताच तेव्हा प्रस्थापितांच्या मनात थरकाप उडायचा असा धाक पँथरचा होता.मात्र आयडीयॉलोजी कारणाने पँथर बरखास्त करण्यात आली. यामध्ये विरोधकांचा हस्तक्षेप महत्त्वाचा होता. मात्र दलित पॅंथर ही आग आहे ही सहज विझत नाही ती पिढ्यानपिढ्या जळत राहणार आहे असेही येंगडे म्हणाले.





 दलित पॅंथरच्या पन्नासाव्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य सभागृहामध्ये रविवार दि.१८ रोजी शेवटचा दिवस होता.या यावेळी मार्गदर्शक म्हणून संशोधक डॉ. सुरज येंगडे जेष्ठ पत्रकार दिलीप मंडल पोलीस अधिकारी प्रवीण मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, पँथरच्या माध्यमातून तुमच्या पूर्वजांनी विषमतावादी लोकांच्या विरोधात लढे उभारले होतो.ते समाजाला सुधरवण्याचे आंदोलन होत.तुम्ही जेव्हा समाजाला सुधरवता तेव्हा तुम्ही देश सुधरवण्याच काम करत असता.यासाठी देश सुधरवणाऱ्या दलीत पँथरचे पन्नासावे वर्ष अभिमानाने साजरे करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. तंबाखू, गुटखा यासारख्या पदार्थांची जाहिरात करणारे आजच्या तरुण पिढीचे आदर्श कसे असू शकतात.आजच्या चित्रपटांची खरापणे गेला आहे. इतर देशातील चित्रपटांचं अनुकरण करून इथले चित्रपट तयार केले जातात.हे चित्रपट तयार करणाऱ्यांनी ठरवलंय तुम्ही नवीन काही बघू शकतं नाही.यामुळे आजच्या तरुणाचे आदर्श हे व्यावस्थे विरुद्ध लढून स्वाभिमानाने जगायला लावणारे असावे असे सुरज येंगडे म्हणाले.

आंदोलनातून घरी पाठवण्याचा अर्थ कळाला....

डॉ. सुरज येंगडे म्हणाले, महाविद्यालयात असताना आमच्या परिसरात एक आंदोलन होत होत.त्यात मी सहभागी झालो.मात्र आमच्या परिसरातील लोकांनी मला त्या ठिकाणाहून घरी पाठवून दिलं.त्यावेळी मला अस वाटलं की मी तरुण आहे.आंदोलनात गरज पडली तर दगडही मारू शकतो, मग मला घरी का पाठवलं.मात्र मला उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचं होत आणि त्यासाठी पासपोर्ट काढायची गरज पडली त्यावेळी मोठ्या लोकांनी घरी का पाठवलं त्याच खर कारण कळलं.


जेष्ठ पत्रकार दिलीप मंडल म्हणाले की, भारतीय दलीत पँथर ने करोडो लोकांच्या आयुष्यात न्याय मिळवून दिला.एखादी मुव्हमेंट म्हणजे अस नाही की लगेच त्याच काय इनपुट आहे. मुव्हमेंट पूर्ण झाल्यानंतर इनपुट मिळत असतात.सध्याच्या परिस्थितीत आपण आपल्या स्वप्नांची उंची वाढवणं गरजेच आहे.सध्याची परिस्थिती यासाठी अनुकूल नसेलही.मात्र पुर्वी च्या तुलनेत आपल्याकडे सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. दलीत पँथर म्हणजे असंतोषातून निर्माण झालेली चळवळ आहे.या चळवळीने समाजातील पीडितांना न्याय मिळवून दिला.

प्रस्ताविक सतीश पट्टेकर,सूत्रसंचालन राजेंद्र गोणारकर यांनी केले.


ह्यावेळी राहुल प्रधान, सचिन निकम,सिद्धार्थ शिंगारे,गुणरत्न सोनवणे,अतुल कांबळे, सिद्धार्थ मोरे,राहुल खंडागळे,प्रशांत बोराडे, भीमराव वाघमारे,भागवत चोपडे संदिप तूपसमुद्रे,जयेश पठाडे,राहुल वडमारे,आदींची उपस्थिती होती.

दुसऱ्या सत्रात लोकनाथ यशवंत,शेषराव धांडे,वनश्री वनकर यांनी कविता सादर केल्या.

महिला चळवळीवरील परिसंवादात डॉ.सुनीता सावरकर,योगिनी पगारे,वनश्री वनकर,डॉ.सोनाली म्हस्के यांनी आपले विचार मांडले.

सुशीला खडसे,प्राचार्य यशवंत खडसे,अमोल झोडपे,के व्ही मोरे,डॉ.प्रमोद दुथडे,डॉ.अविनाश सोनवणे,विलास जगताप,प्रा.सुरेश शेळके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सायंकाळी विपीन तातड यांनी वंदन माह्या भीमा,महिलांचे प्रश्न मांडणारे हॅपी वुमन्स दे,घे ना लॉकडाऊन हे   रॅप सादर करून महोत्सवात रंग भरले.

कैलास खानजोडे यांनी साकारलेली सुंदर रंगोळी चित्र उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला