Skip to main content

देशभक्ती हिच ईश्वर भक्ती

 


"आपल्या देशाचा तिरंगा हा वाऱ्यामुळे नव्हे तर ह्या देशातील शूर जवानांच्या धाडसामुळे शौर्यामुळे आज फडकतो आहे.

 एकवेळ श्वास थांबेल पण देशप्रेमाचा मनातील भाव थांबणार नाही"

आज आपला भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे होत आहेत.म्हणूनच आपण स्वातंत्र्याचा अमृत  महोत्सव साजरा करत आहोत.  हर घर तिरंगा, घरोघरी तिरंगा असे आगळे वेगळे उपक्रम साजरे होताना दिसत आहेत.  म्हणून हे  सर्व स्वातंत्र्य वीरांच्या  बलिदानामुळेच  मिळाले. त्यांचे बलिदान विसरून आपल्याला चालणार नाही. जरा आठवण बघा. आपण ज्यावेळी गुलामगिरी मध्ये होतो त्यावेळी आपल्याला कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते. इंग्रज त्यांना वाटेल तसा मनमानी कारभार करत होते. 

 भारतीय लोकांमध्ये जाती-धर्माच्या नावाखाली भेदाभेद निर्माण करत होते व फायदा उठवत होते. आपला देश कसा चालावा? यासाठी कुठलेही नियम आणि कायदे त्यावेळी नव्हते. केवळ अनागोंदी असे सर्व काही,अशी परिस्थिती होती. इंग्रज आपल्या देशातून केवळ संपत्तीची लूट करत होते असे नाही तर पिळवणूक देखील करत होते. असे चित्र असताना लोकमान्य टिळक, महात्मा गांधी,सुभाष चंद्र बोस, सावरकर यासारखी अनेक मंडळी परदेशी शिक्षण घेऊ लागली होती.त्यांना सध्या आपण पारतंत्र्यामध्ये आहोत याची जाणीव होऊ लागली. आणि मग सर्वांनी जो संघर्ष केला ,उठाव केला तो सर्व उठाव म्हणजे आपला स्वातंत्र्यलढा होय. 

आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काही लोक शांततेच्या मार्गाने लढा देत होते, तर काही विद्रोहाच्या मार्गाने लढा देत होते. या विद्रोहाच्या मार्गामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा समावेश होतो. आयुष्याच्या मार्गाने लढा देणारे महात्मा गांधी आणि त्यांना मदत करणारे त्यांचे अनुयायी होत होत. आज आकाशामध्ये तिरंगा फडकताना दिसत आहे, परंतु तिरंगा हा जरी फडकत असला तरी तो फडकवण्यासाठी किंवा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांच्या आहुति  दिलेले आहे. जवान लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले आहे. हे विसरून आपल्याला चालणार नाही. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण त्यांचे स्मरण केले पाहिजे. शाळा,महाविद्यालय विविध कार्यालयामधून ,भाषणां मधून आपण त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला पाहिजे, असा दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन. या स्वातंत्र्यांना दिनाच्या दिवशी संपूर्ण भारतातील वातावरण हे देशभक्तीमय झालेले असते आज आपण पारतंत्र्यात नसलो तरी आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी जे जवान डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहेत,म्हणूनच आपण सुखाचे क्षण अनुभवत आहोत यांचा विसर पडून आपल्याला चालणार नाही तर या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यांच्या देखील कार्याला आपण सलाम केला पाहिजे. 

आपला देश मोठा झाला पाहिजे. आपला देश आर्थिक महासत्ता झाला पाहिजे .नुसती  स्वप्न पाहून चालणार नाही तर आजच्या तरुणाईने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मोबाईल, टीव्ही -  इंटरनेट यांचा उपयोग आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी केला पाहिजे.आज बरेचसे विद्यार्थी या सोशल मीडियाचा उपयोग नको त्या कामासाठी करत आहेत. जर आपण असे करत राहिलो तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण आपल्या राष्ट्राने प्रगती किती केली? याविषयी आपण स्वाभिमानाने काही बोलू शकणार नाही. 

आपली तरुण पिढी आज नको इतका वेळ मोबाईल, इंटरनेट,व्हाट्सअप ,फेसबुक यांच्यावरती घालवत आहे.  खरोखरच ही  एक चिंतेची बाब आहे. यांच्या वापरामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत. एकदा का आरोग्याचे प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात झाली ,की आपल्या देशाचे रक्षण कोण करणार? सीमांचे रक्षण कोण करणार हे बळकट भाव कोठून येणार.या सर्वांचा विचार व्हायला हवा. आपण बौद्धिक आरोग्य इतके शारीरिक आरोग्याला देखील महत्व दिले पाहिजे .असा या स्वतंत्र्य दिनाच्या निमित्ताने संकल्प करूया. आणि आपल्या महान व्यक्तींनी जे स्वप्न पाहिलेला आहे की भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचे ते स्वप्न पूर्ण करूया. 

अंधश्रद्धा ,बेरोजगारी, दहशतवाद व वाढती लोकसंख्या सायबर क्राइम  यासारख्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या समस्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला काय करता येईल? यासाठी तरुण पिढीने योगदान दिले  तरच आजचा हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव किंवा हर घर तिरंगा ,घरघर तिरंगा किंवा घरोघरी तिरंगा हा उपक्रम यशस्वी झाला असे सर्व चित्र असेल.देशप्रेम, देशभक्ती रक्तात असली पाहिले...रक्ताच्या प्रत्येक थेंबात भिनली पाहिजे...

देशभक्ती या शब्दातच भक्ती आहे...आणि ही भक्ती निर्विकार,निसंकोच,अखंड,निरामय अशी केली पाहिजे..‌.याचबरोबर  या तिरंग्याचा अवमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.


जय हिंद, जय भारत

सौ.रूचिरा बेटकर,नांदेड

9970774211

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला