Skip to main content

गणपती बाप्पा झाले डाऊनलोड...

 


कोरोना व्हायरस पासून मुक्त होऊन गणपती पृथ्वीतलावर पुढील दहा दिवसांसाठी डाऊनलोड झाले. एखाद्या चांगल्या ॲप्स चे पिक्चर जसे कार्य करते अगदी तसेच पुढील दहा दिवसांसाठी पृथ्वीतलावर गणपती डाउनलोड झाल्यावर सर्व लोक त्यांच्यासाठी एका फीचर्स प्रमाणे उत्तम उत्तम कामं करण्यासाठी एकत्र येतात.

 नुकतेच गणेशोत्सवाला सुरुवात झाली म्हणून आपण जोरदार तयारीला लागलो. केवढी उत्सुकता ! आपल्या घरात दहा दिवसांसाठी एक छोटासा पाहूणा येणार म्हणून तयारी चाललेली असते. मोबाईल बॉक्स मध्ये एखादे ॲप डाऊनलोड केल्यानंतर एखादी जागा व्यापते तसेच गणपती सुद्धा आपल्या घरात डाऊनलोड झाल्यावर घर छोटे असो वा मोठे असो ती आपल्या घरातील नुसतीच जागा नाही तर संपूर्ण घर मंत्रमुग्ध करून व्यापून घेते. एखाद्या मोबाईल मधील एखादे फीचर्स आपल्याला खूप आवडत असते. तसेच, आता घरातील ती जागा भिंतीचा कोपरा म्हणून राहीलेला नसतो. तर ती जागा आपल्या श्रद्धेचे , भाव-भावनांशी जुळलेली जागा असते...

अतिशय सुंदर असे सुशोभीकरण करून तिथे गणपतीला विराजमान करतो.

टेबलावर दोन्ही बाजूंनी झिरझिरीत पडदे सोडले जातात. घुगूरमाळा सोडल्या जातात. गणपतीला बसवण्यासाठी सुंदर मखराची सजावट केली जाते. गणपतीला बसवायला मऊ-मऊ मखमलीचे आसन केले जाते. त्याच्या मुगूटाच्या पाठीमागे विद्यूतप्रवाहाद्वारे सुशोभित कागदांचे सुदर्शन चक्र सतत फिरते ठेवले जाते. असा सर्व देखावा नेत्रदीपक केला जातो. वेगवेगळ्या रंगाचे चकचकीत कागद लावून चकाकत्या झुरमुळया गणपतीच्या दोन्ही बाजूला सोडल्या जातात.

    आप-आपल्या सवडीने व आवडीने मनाजोगे हवं ते सुशोभीकरण करत असतो.

मनोरंजनासाठी गणपतींच्या गाण्याची गीते चालू ठेवली जातात.त्यामुळे सर्व घरभर धार्मिक वातावरण तयार होते. अशा प्रकारे घरा-घरात , गल्ली-बोळात,अगदी सर्वत्र गणपती डाउनलोड होतात.

बर्याच मंडळांमध्ये विविध प्रकारचे देखावे केले जातात.ते पाहून मन प्रफुल्लीत होते.  गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळे ही नाटक, कलापथक, वगनाट्य, चित्रकला,खेळ, विविध स्पर्धेचे आयोजन करतात. यांचे पुर्वनियोजन केले जाते आणि तशी तयारी ही ठेवली जाते. 

 गणपती ११ दिवसांचा असल्याने सर्व दिवस कार्यक्रमांची रेलचेल असते. निरनिराळे कलाकार आपले कलागुण दाखवत असल्याने त्यांच्या गुणांना वाव मिळत असतो. रोज नवनवीन प्रसाद असल्याने बालचमू आरतीच्या कार्यक्रमाला प्रचंड संख्येने हजेरी लावतात. सर्व गरीब-श्रीमंत एकजुटीने इथे गणरायाची ओवाळणी करण्यात दंग असतात. इथे उच्च, निच हा भेद विसरुन एकजूटीने गणेशोत्सव साजरा केला जातो. म्हणूनच, विषमता नष्ट होण्यास मदत होते. दुसऱ्यांची कुरापत न काढता एकत्र येतात. व आपल्याच घरचे कार्य असल्याप्रमाणे एकजूटीने सर्व कामे पार पाडतात. 

११ व्या दिवशी महाप्रसाद, बँडपथक व लेझीमच्या खणखणाटात 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’अशा आरोळ्यांनी परिसर दुमदुमुन निघतो व गणपतीबाप्पाला निरोप दिला जातो. या मिरवणूकीत सर्व आबालवृद्ध सामील करून असंख्य अश्या फीचर्स ची सेवा करवून गणराया Uninstall म्हणजेच विसर्जित केला जातो.



सौ.रूचिरा बेटकर नांदेड

9970774211

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला