अण्णाभाऊ साठे हे एक समाजसुधारक तर होतेच याचसोबत ते एक साहित्यिक,लेखक,कांदंबरीकार,देखील होते.
ज्या जमातीवर ब्रिटीश राजवटीच्या काळात अपराधी म्हणुन शिक्का मारण्यात आला होता अशा घराण्यात अण्णाभाऊंचा जन्म झाला.
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 आँगस्ट रोजी सांगली जिल्हयामधील वाळवा नावाच्या तालुक्यात असलेल्या वाटेगाव ह्या छोटयाशा गावी एका आदीवासी मांग कुटुंबात झाला.
अण्णाभाऊंचे पुर्ण नाव हे तुकाराम भाऊराव साठे असे आहे. यांच्या आईचे नाव वालुबाई अणि वडिलांचे नाव भाऊराव असे होते.अण्णाभाऊ साठे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कोंडाबाई अणि तिच्या निधनांनंतर त्यांनी जयवंता हिचेशी विवाह केला.
अण्णाभाऊ साठे यांच्या मुलाचे मधुकर असे नाव होते आणि मुलींचे नाव शांता तसेच शकुंतला असे होते.
अण्णाभाऊ साठे जेव्हा त्यांच्या वडिलांसमवेत लहान असताना मुंबई मध्ये गेले तेव्हा तिथे त्यांनी गिरणीत झाडु मारणे कोळसे वेचणे असे मिळेल ते काम केले.
त्यांनी छ.शिवाजी महाराज यांच्यावर अनेक पोवाडे रचले म्हणुन त्यांना शिवशाहीर असे देखील म्हटले जाते.
अण्णाभाऊ साठे यांना आर्थिक परिस्थितिमुळे त्यांचे शालेय शिक्षण पुर्ण करता आले नव्हते.तरी देखील त्यांना अक्षराची ओळख होती.
“माझी मैना गावाकड ऱ्हांयली , माझ्या जीवाची होतीया काह्यली" या सारख्या ठसकेबाज लावण्या आणि ‘फकीरा','वारणेचा वाघ',' माकडी ची माळ','मास्तर ‘
'आबी' आणि ' वैजयंता' यांसारख्या त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या समाज मनाचा ठाव घेणार्या आहेत. त्यांच्या अंतर मनाचा तो प्रकट हुंकार आहे. समाज परिवर्तनाचा विचार मांडणारा हा साहित्यिक स्वातंत्र चळवळी च्या जनसागरात गुंतलेला लढाऊ माणूस अण्णांनी आपल्या लेखणीतून उभा केला. ग्रामीण, पददलित, आणि लाचारीचे जिने जगणारी माणसे त्यांनी आपल्या खास शैलीत उभी केली.
कादंबर्या, नाटके, लोकनाट्ये, कथा संग्रह आणि सात चित्रपट कथा लिहिणार्या अण्णाभाऊंनी फक्कड लावण्याही लिहिल्या. शाहीर गवानकरांच्या ‘ लालबावटा ‘ कलापथकां द्वारा अनेक तमाशेही केले.जगण्यासाठी लढणार्या माणसांचे चित्रण करणार्या अन्नाभाउंनी “मुंबई नगरी बडीबांका,जशी रावणाची लंका वाजतोय डंका चौहुमुलुखी”अश्या शब्दात मुंबईचे चित्र रेखाटले.
"फकिरा" ही त्यांची विशेष गाजलेली कादंबरी ज्यात त्यांनी मांग समाजाचे जीवन चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.
या कादंबरीचा मुख्य नायक फकिरा हा मांग समाजातील शुर व्यक्ती असतो जो दुष्काळात ब्रिटीश राज्यकर्त्यांना लुटतो अणि तीच लुटलेली संपत्ती चोरलेले अन्न गरीबांना वाटुन देतो.
त्यांच्या ह्या कांदबरीस राज्य शासनाकडुन सर्वोत्कृष मराठी कादंबरी म्हणुन गौरविण्यात तसेच सम्मानित करण्यात आले होते.
"माझा रशियाचा प्रवास" हे प्रवासवर्णन देखील अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले आहे.याचसोबत त्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर चरित्रलेखन देखील केले.ज्याचे पुढे जाऊन त्यांनी रशियन भाषेमध्ये देखील रूपांतरण केले.
अण्णाभाऊंनी निर्माण केलेल्या प्रत्येक साहित्य प्रकारातुन सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी त्यांच्या रचलेल्या सर्व लावणी,पोवाडया मार्फत कष्टकरी जनतेच्या जीवनात सुधारणा घडवून त्यांना प्रेरीत करण्याचा प्रयत्न केला.म्हणून जगाने त्यांना लोकशाहीर ही उपाधी दिली.
स्वातंत्र्याच्या आधी तसेच स्वातंत्र्यानंतर देखील अण्णाभाऊ साठेंनी अनेक महत्वाच्या राजकीय प्रश्नांच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये जनजागृती देखील केली.
अण्णाभाऊ साठे यांनी तमाशा ह्या लोककलेस लोकनाट्य असा दर्जा प्राप्त करून दिला.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कार्यात अण्णाभाऊ साठे यांचे देखील विशेष योगदान होते.त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतुन तसेच गोवा मुक्ती संग्रामामध्ये त्यांचा विशेष सहभाग होता.
अण्णा भाऊ साठे यांची " वैजयंती " ह्या कादंबरीतून ज्या स्त्रिया तमाशामध्ये पहिल्यांदा काम करतात त्यांचे लोकांकडुन कसे शोषण करण्यात येते हे चित्रित केले आहे.
"माकडाची माळ" ह्या कादंबरीतुन भटक्या विमुक्त जातीच्या जीवनाचे चित्रण केले आहे.
शेवटी, अण्णाभाऊ ह्या थोर समाजसुधारकाचा,लोकशाहीर तसेच साहित्यिकाचा अखेरीस 1969 मध्ये 18 जुलै रोजी प्राणज्योत मावळली.
लेखीका :रूचिरा बेटकर नांदेड
Comments
Post a Comment