Skip to main content

नामांतर लढा आणि आम्ही पँथर.....

 


किनवट : दलित पँथरची स्थापना जरी १९७२ ची असली तरी आम्हच्या  किनवटला  पोंहचली ती १९७४ साली.शहरातील हनुमान मंदिराला लागुनच आम्हची गल्ली आहे.जी पुर्वी "ईनकर गल्ली",म्हणून ओळखल्या जायायची गावातील सर्वजन आम्हाला "ईनकरोलू",म्हणायचे.नंतरच्या काळात भीमजयंती आम्हच्या गल्लीत साजरी करण्यात येऊ लागली.त्यानंतर मात्र आम्हची गल्ली "बौद्ध वाडा", म्हणून ओळखल्या जाऊ लागली.किनवटला रेल्वे कर्मचारी असलेले बळखंडे हे रेल्वे कर्मचाऱ्यांना एकत्र करून भीमजयंती साजरी करत असत.यामुळे त्यांच्या प्ररणेने आम्हच्या गल्लीत ही छोट्या प्रमाणात का होईना भीम जयंती साजरी होऊ लागली.माझ्या आठवणीप्रमाणे तो काळही १९७० नंतरचाच.त्या काळात आम्हच्या वार्डाचे नगरसेवक होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पुंडलिक कावळे त्यांना मेंबर कुंडलिक म्हणूनच सर्व जन ओळखायचे.दुसरे एक कम्युनिस्ट पक्षाचे कट्टर कार्यकर्ते होते गंगाराम दगडू भरणे.त्यानंतर पुंडलिक कावळे यांचे छोटे भाऊ वामन कावळे हे ही सुरवातीच्या काळात कार्यकर्ते च होते.त्यांच्या पुढाकाराने गल्लीत भीमजयंतीची सुरुवात झाली.



    १९७४ - ७५ साली बळीराम पाटील महाविद्यालयात समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून पी.एस.धन्वे हे रुजु झाले.ते आम्हच्या गल्लीत च राहायला आले.त्यांनी नियोजित बुद्ध विहाराजवळील रामा कावळे यांची रुम भाड्याने घेतली.त्यांच्या आधी पोस्ट ऑफिस मध्ये असलेले पी.जी.गायकवाड हे कर्मचारी आम्हच्या गल्लीत माझ्या घरा समोरच्या रामा कावळे यांच्या रूम मध्ये किरायाने राहायला आले.त्यांच्या सोबत त्यांचा लहान भाऊ सुरेश गायकवाड हे  ही रहात असत. धन्वे व गायकवाड हे आम्हच्या गल्लीत रहायला आल्यापासून आमच्या गल्लीचे वातावरण पार बदलून गेले.आमच्या गल्लीत महाराष्ट्रातील दलितांची परिस्थिती व भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या कार्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली.मी ४थी, ५ वीत असूनही मला ब-या  पैकी समज असल्याने मी या चर्चा अगदी मन लावून ऐकत असे. 

    याच काळात एक घटना घडली,पुढे चालून ती पँथर स्थापनेचे निमित्त ठरली.कॉस्मापॉलिटन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.जे.कांबळे यांना संस्था पदाधिका-यांनी कामावरुन कमी केले होते.त्यांना कामावर घ्यावे म्हणून त्या वेळी दादाराव कयापाक,सुरेश गायकवाड व रामराव भरणे यांनी उपोषण केले होते.परिस्थिती वाईटच होती.येणाऱ्या काळात दलितावरील अन्याय,अत्याचाराला तोंड देण्यासाठी प्रा.धन्वे यांनी 'दलित पँथर', ची स्थापना करण्यास सांगीतले.त्यांच्याच मार्गदर्शना खाली नियोजित बुद्ध विहाराच्या जागेवर रात्री एक बैठक झाली व त्यात "दलित पँथर",ची स्थापना करण्यात आली. या बैठकीला मोजकेच पण अत्यंत निष्ठावान व जिवाला जिव देणारे कार्यकर्ते उपस्थित होते.हे वर्षे होते १९७६ चे.

अध्यक्ष म्हणून दादाराव कयापाक व सचिन म्हणून सुरेश गायकवाड यांची एकमताने निवड झाली. या बैठकीस माझ्या आठवणी प्रमाणे कॉस्मापॉलिटन विद्यालयाचे कर्मचारी डी.टी.कदम,दादाराव कयापाक, सुरेश गायकवाड, सुखदेव मुनेश्वर, मनोहर भगत,जी.एस.रायबोळे, रामराव भरणे,माधव कावळे,यादव नगारे, नितिन कावळे,रघुनाथ कावळे,लक्ष्मण कांबळे, प्रकाश नगराळे, मी(मिलिंद सर्पे),माझे बाल मित्र प्रकाश पाटील व कहीजण. 

   १९७६ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणी जाहीर केली. यानंतर दलित पँथरचे तत्कालीन नेते राजा ढाले यांनी पँथर बरखास्त केल्याचे जाहीर केले व 'मास मुव्हमेंट', या संघटनेची स्थापना केली.याच काळात आम्हच्या तालुका नेतृत्वानेही कोठारी(चि.)येथे मास मुव्हमेंट ची पहीली शाखा काढली व तिचे अध्यक्षपद हरिप्रसाद सर्पे यांना दिले.परंतु,नंतरच्या कांही घडामोडीनंतर आम्ही एस.एम.प्रधान,गंगाधर गाडे व प्रा.अरुण कांबळे यांच्या दलित पँथर मध्ये च काम करू लागलो.१९७८ मध्ये सुरेश गायकवाड हे बळीराम पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसदेचे सचिव म्हणून आले,तर दुसऱ्या वर्षी ते विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष झाले.यामुळे महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी हे दलित पँथर मध्ये सहभागी झाले होते.

   पुढेचालून २७ जुलै १९७८ साली नामांतराचा ठराव विधिमंडळात पारित झाला.परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नाही.नामांतराच्या सर्वच लढाईत किनवट तालुका दलित पँथर अग्रभागी होतो.याबरोबरच तालुक्यातील दलितांचे रक्षण करण्यातही  पँथर अग्रभागी होतो.याकाळाती ऐक-ऐक घटना सांगितल्या तर त्याचा एक प्रेरणादायी इतिहास होईल. कोणत्याही चळवळीला चढ -उतार असतातच.आम्हचे काम  हे चळवळीच्या चढावरील काम होते.कोणत्याही चळवळीचा पाया रचणे फारच अवघड असते.परंतु, त्यावर ईमारत बांधणे सोपे असते.आम्हाला अभिमान व गर्व आहे की, फुले -आंबेडकरी चळवळीच्या पायाचे दगड म्हणून आम्ही काम केले व आजही जमेल तसे व जमेल त्या पध्दतीने काम करीत आहोत.नामांतराचा लढा हा आम्हच्या साठी स्वाभिमान शिकवणारा होता.आता कार्यकर्ते तयार होतांना दिसत नाहीत. दिड दमडिच्या लोभापायी समाजाला विकणारे कार्यकर्ते गावोगावी तयार झाले आहेत,ही आम्हची खंत आहे,तेही नामांतर दिनानिमित्त... यावर येत्या काळात काही विचार होईल काय?....

*#एड.मिलिंद सर्पे, किनवट*

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला