Skip to main content

सीतेच्या वनवासा पेक्षाही माझा वनवास कमी नव्हता , खासदार हेमंतभाऊ पाटील व गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांच्या समक्ष भावनावश झाल्या - दिव्यांग सुनिता गुटे - फड

 


हिंगोली:

आम्हाला पाय नसल्याने कुठे जाता येत नाही खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी सायकल, ट्राय सायकल, इलेक्ट्रिकल सायकल, दिली नसती तर आम्हाला घरामध्येच बसावं लागलं असतं, घरात बसून दुःखी राहत होते, पण भाऊंच्या माध्यमातून ही सायकल मिळाल्यामुळे बाहेरचं जग पहायला मिळेल, या उपक्रम सेवाभाव विचारातुन, आम्हाला भरपूर आनंद होत आहे, घरात राहून कंटाळवाणं वाटायचं, नको ते विचार मनात यायचे, सायकल, इलेक्ट्रिकल सायकल दिव्यांग बांधवांना दिल्यात, यामुळे घरातुन बाहेर निघाल्यावर मन बदलल्या सारख होईल हे शब्द आहेत दिव्यांग सुनिता ह्यांचे.


दिव्यांग बांधवांच्या जाहिर कार्यक्रमात हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत त्या ध्वनीक्षेपकावर व्यक्त होत होत्या, त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते, उपस्थितांची मन काही वेळासाठी हळहळली होती. अपंगाकडे घरातले नातेवाईक सुद्धा, अपंग व्यक्ती काहीच करू शकत नाही, बिन कामाची व्यक्ती आहे अशी हेटाळणी पनाने वागणूक देतात, अपंगाचा मानसन्मान होत नाही, घरातील केरकचरा जसा झाडूने लोटला जातो अगदी तशाच पद्धतीने रक्ताचे नातेवाईक पण दुर लोटतात या अनुभवातून मी दिव्यांग इथपर्यंत आली आहे, खासदार हेमंत भाऊ तुम्ही अपंगासाठी दिव्यांग साहित्य उपलब्ध करून दिल्यामुळे आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, सीतेच्या वनवासा पेक्षाही माझा वनवास कमी नव्हता, असं खासदार हेमंत भाऊ पाटील व गोदावरी उद्योग समुहाच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांच्या समक्ष सुनिता गुटे-फड गहिवरल्या होत्या. 


हा प्रसंग आहे हिंगोली जिल्ह्यात 3260 दिव्यांगाना दिव्यांग साहित्य वाटपाच्या हिंगोलीतील कल्याण मंडपम कार्यक्रमादरम्यानचा. दिव्यांग असुनही काहीतरी करण्याची जिद्द असलेल्या सुनिता सारख्या नेक विचारी महिलांसाठी, उद्योजीका राजश्रीताई पाटिल यांनी समाजाने नाकारलेल्या लोकांना पुढ आनण्यासाठी वित्तपुरवठा करून त्यांच्या जगण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी येथेच शब्द दिला, यामुळे दिव्यांगांच्या अपेक्षांवर मायेची फुंकर घालनार नेतृत्व खासदार हेमंतभाऊ पाटिल यांच्या रूपाने पुढे आल आहे.


सुनिता शंकरराव गुटे रा. सालेगाव ता. कळमनुरी, सर्वसामान्य कुटूंबात दि ९ नोव्हेंबर १९८६ ला  त्यांचा जन्म झाला, दोन आई, तिघी बहिणी, दोन भाऊ अस कुटूंब, जन्मानंतर साधारण चार वर्षाच वय, दुडू दुडू धावायला जमायच दरम्यान एकदा ताप आला होता, ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयी नसायच्या त्यातही मुलगी म्हटल की, कोणी फारशी काळजी देखिल करायच नाही, हि समाजात विक्रतीच होती, अशातही गावातील डॉक्टरांकड उपचारार्थ नेण्यात आल, अंगात ताप असतांना डॉक्टरांनी इंजक्शन लावल त्यानंतर त्यांचे दोन्ही पाय कमरे पासुन लुळे झाले.


१००% अपंगत्व आलेल्या सुनिता यांना हिंगोली येथिल खातीबा अस्थीव्यंग विद्यालयात पहिल्या वर्गात टाकण्यात आल, पायाने अपंग असलेल्या सुनिताची बुध्दी तल्लक, काहीतरी बनण्याची जिद्द मनात होती, वस्तीगृहात पोटाला पिळ पडायचा, कधी जेवन वेळेवर मिळायच नाही, मिळाल तर ताटात अळ्या किडे निघायचे, अन्नाला नाव ठेवण्या एवढी मोठी नव्हते परंतु त्याच ताटावर बसायची हिम्मत व्हायची नाही, किळसवान वाटायच, कधी कधी पाण्याविना रात्र काढावी लागायची, कुणाला करूण कहानी सांगितली तर संथाचालकाच बाहुल असलेल्या सरांच्या हातातील ओल्या फोकाच्या छडीची भिती वाटायची, आंबिल खावुन दिव्यांग शाळेत दिवस काढले, फार विट यायचा सर्व अनुभवाचा , सांगणार कोणीच नाही, सोबत माझ्या सारख्या, माझ्या पेक्षाही कटु अनुभवाच्या समविचारी वर्ग मैत्रिनी, वैतागलेल्या मनाला आपणच आवर घालत भविष्यात काहीतरी व्हायच हि जिद्द बळकवायची. तिथे सातवी पर्यंत शिक्षण पुर्ण केल.


कुटूंबाकडुन कधी लाड पुरले नाही, सनवार निट करता आला नाही, उन्हाळ्यातील सुट्ट्या, अपंगत्व आल की नातेवाईकांनाही नकोस वाटायच, ईश्वर सत्व परीक्षा घेत असतो, मी देखिल ईश्वराला म्हणत असते, किती परीक्षा घ्यायची ते घे..! बघुत कोण? मी हारते का? तु ते..!


कोणासाठी तरी जगायच असते, तस तर दवाखाण्यात मृत्यु शय्येवर अनेक जन उपचार घेणारे, कृत्रिम ऑक्सीजन लावलेले पुष्कळ अंथरूनावर पडुन आहेत, मी अपंग असली तरी काय झाल कशाला मरणाचा विचार करू... म्हणत जगत आहे.


आठवी ते दहावी पर्यंतच शिक्षण परभणीतील रामराव कान्हेकर विद्यालयातुन पुर्ण केल, कळमनुरीतील डॉ. शंकरराव सातव कॉलेज मधुन बारावी पास झाले, घरी बसुन कला शाखेतुन बि.ए. ची पदवी घेतली. संगणक ऑपरेटर पदी सेतु सुविधा केंद्रात कंत्राटी पध्दतीवर नौकरी केली, परवा कोरोना काळात नौकरी गेली. 


नातेवाईकातील केशव नारायण फड यांचेशी १७ मार्च २०१३ ला हिंदु समाज व्यवस्थे प्रमाणे, विवाह जुळुन आला, सर्व सोपस्कारा प्रमाणे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम घरीच झाला दिव्यांग असुनही माझे पती केशवराव यांनी मला स्विकारला माझ्यासाठी पती हेच परमेश्वर आहेत, एक तासात सोयरीक, एक महिण्यात विवाह झाला, दिल्या घरी शेती उत्पन्नाच साधन नव्हत, इंग्लीश स्कुलच्या लेकरांना शाळेत ने आण करण्यासाठी मॅक्सीमो गाडी घेतली त्यावर चरीतार्थ चालायचा.


गरोदर पणात नवऱ्याने तळहाताच्या फोडा प्रमाणे सांभाळल, प्रसृतीसाठी दवाखाण्यात भर्ती होते, सिझर कराव लागल, मुलगी झाली, डॉक्टरांची सर्व फिस भरली परंतु पैशाची जुळवा जुळव करतांना शेवटच्या दिवशी ७०० रूपये आमचे कडे नव्हते, म्हणुन सुट्टी देण्यासाठी दवाखाण्यात आडकाठी केली होती, घराकडुन पैसे येणार होते, बाजुच्या रूग्णांच्या विनंती नंतरही डॉक्टरांनी सुट्टी दिली नाही, तिथेच ठरवल आता थांबायच नाही, मुलीला खुप शिकवायच एमबिबीएस डॉक्टर करायच समाजात जे गरीब लोक आहेत, ज्यांना उपचारासाठी पैसा घडत नाही, अशा लोकांकडुन जेवढा मेडीकल औषध खर्च आहे, तेवढाच खर्च घे..! अशी शिकवन देण्याची खुनगाठ तेंव्हा पासुन मनात बांधली आहे. ते स्वप्न पुर्ण करणार आहे.


कोरोना मध्ये शाळा बंद पडल्यात, पर्यायान शाळेला लावलेली गाडी बंद ठेवावी लागली, घरात येनारे दोन पैसे थांबले, बेकारीची कुऱ्हाड कोसळली, गाडी जागेवर थांबुन असल्यामुळे टायर निकामी झाले, इंजनच काम निघाल, ५० हजार रूपये खर्च लागला, आता मुलगी आठ वर्षाची झाली तिच्या शिक्षणाचा खर्च , घरगाडा चालवन अशक्य होत आहे, अशा वेळी खासदार हेमंतभाऊ पाटिल यांनी दिव्यांग बांधवांसाठी मोफत साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला, या परस्थितीत इल्क्ट्रीक मोटार ट्रायसिकल मला मिळाली. हि गाडी घेण्याचा डोक्यात विचार देखिल आनु शक्त नव्हते, दिवस कसा काढावा याच विचारात असायचे, बाजारात ज्याची किंमत लाख रूपये असेल ती मोफत उपलब्ध करून दिली त्यामुळे आभारी आहे,,,, खासदार हेमंतभाऊ सारखा पाठीराखा असल्याचा मनोमन आनंद होत आहे.


दिव्यांग महिला पोटतिडकीन मांडत असलेला कटु अनुभव गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटिल ह्या सुनिताच्या बाजुलाच उभ्या होत्या कार्यकर्त्यांचा गराडा, हजारोंची उपस्थिती सुनिताचा एकन एक शब्द एैकतांना त्यांनाही अश्रु अनावर झाले होते. स्वत:ला सावरत त्यांनिही दिव्यांग सुनिताच्या पाठीशी उभे राहत गृह उद्योगासाठी हातभार लावण्याच सांगितल.


गोविंद गोडसेलवार सरसमकर

ता. हिमायतनगर

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला