Skip to main content

जर पोलिस संपावर गेले तर ...... धनश्री सुगावकर यांचा वाचनिय लेख

 

               


                         आपण शाळेत असताना वेगवेगळ्या प्रकारचे खूप निबंध लिहिलेलं  आहेत. जसे की कामगार  संपावर गेले तर ,शिक्षक संपावर गेले तर, डॉक्टर संपावर गेले तर, अशा विविध प्रकारचे निबंध आपण प्रत्येक  विषयावर लिहिलेले आहेत. पण तुमच्या मनात कधी असा विचार आला का, जे पोलिस संपावर गेले तर...... हा निबंध कधी लिहिला का तुम्ही ?का कधी या विषयाचा विचार केला का? कारण मी सांगते आपण असा विचार कधीच केला नाही, कारण आपल्या सभोवतालचे वातावरण याला जबाबदार आहे. म्हणजे बर्‍याच लोकांचे असे विचार आहेत की, पोलिसांची नोकरी खूप मस्त खूप मस्त असते. बाहेर पोलीस पोलिसांना सर्व घाबरतात .ते काहीच काम करत नाहीत. दादागिरी करतात ,कोणतीही वस्तू घ्यायची तर त्यांना ती फुकटच मिळते ,अशी वेगवेगळ्या प्रकारचे विचार काही लोक करतात. पोलिसांच्या कामाची सत्य परिस्थिती ही खूप कमी लोकांना माहीत आहे जर पोलिस संपावर गेले तर हा विचार केला तर.... अंगावर शहारे येतील. शिक्षक संपावर गेले तर शिक्षणाचे विद्यार्थ्यांचे कसे होईल ,कामगार संपावर गेले तर कारखान्याचे तसेच दैनंदिन वस्तू लागतात त्याचे कसे होईल ,डॉक्टर संपावर गेले तर पेशंट कसे होईल, असे आपण विचार करतो पण पोलिस संपावर गेले तर बापरे विचार जरी केला तर अच्छा देश समोर दिसतो हो ना?

             एक दिवस पोलीस स्टेशन बंद राहिले ,तर किती खुन होतील, दरोडे पडतील, चोऱ्या होतील, भांडणे होतील ,मुलींची छेडछाड होईल,  याचा विचार करा. जगामध्ये सर्व संपावर जाऊ शकतील, पण पोलीस संपावर नाही जाऊ शकणार कारण पोलिसांना माहिती आहे की आपण जर संपावर गेले , तर देशाचे काही खरे राहणार नाही. एक दिवसात  सर्व संपून जाईल. जनजीवन विस्कळीत होईल इतका पोलीस विचार करतो तरी तो आपल्या नजरेत काटो असतो त्याचे जनतेप्रती काम दिसत नाही का?

                        पोलिसांच्या पण खूप समस्या आहेत. तरी आतापर्यंत त्यांना कोणी विचारले का तुमच्या काही समस्या आहेत का ?त्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचू. पोलिसांचे जर काम पाहिले तर ते 24 तास आपले कर्तव्य बजावतात  .त्यांना कधी ठरावीक वेळ नाही की त्यांनी  इतका वेळ काम करावे आणि जास्तीचे काम केल्यावर त्यांना त्या कामाचे पैसे सुद्धा मिळत नाहीत मग पोलीस आणि संपावर का गेले नाही पाहीजे. आपल्याला जर एखादी इमर्जन्सी आली तर आपण सर्व कामे सोडून जातो तशी जर  पोलिसांना इमर्जन्सी आली तर पोलिस जाऊ शकत नाहीत कारण त्यांना काम असते आपल्या कर्तव्य पेक्षा कोणते काम त्यांना महत्वाचे वाटत नाही मग पोलिसांनी संपावर का जाऊ नये? वाढदिवस ,पार्ट्या ,कार्यक्रम ,लग्न सोहळा असे विविध कार्यक्रम आपण करत असतो पण बाराही महिने पोलीस कोणताही सण साजरे करू शकत नाही मग पोलिसांनी संपावर का जाऊ नये ?स्वतःच्या मुलाचा  वाढदिवशी तो हजर नाही राहु शकत किती वाईट परिस्थिती आहे.

                     एक तर पोलिसवाला सांगत होता की त्याच्या मुलीची लग्न  पाठवनी होती पण तो घरी जाऊ शकला नाही कारण महत्त्वाचा बंदोबस्त लागला होता हे ऐकून  मन सुन्न झालं.  हे ऐकून खूपच त्रास झाला की, अशी कशी पोलिसांची नोकरी की तो मुलीला वाट सुद्धा लावू शकत नाही मग पोलिसांनी संपावर का जाऊ नये? 

      सकाळी आठ नऊ वाजता गेलेला पोलीस हा रात्री दहा-अकरा वाजता घरी येतो किती वेळ ही नोकरी.सारखे  दिवस-रात्र काम करायचे . पोलिस संपावर गेले तर देशाचे खूप मोठे नुकसान होईल, हा विचार जरी केला तर समजेल .पोलिस हा जनतेचा कणा आहे ,त्यामुळे त्याचा आदर करायला शिका, त्यांना सहाय्य करा .पोलीस हा पण माणूसच आहे त्यांना बोलून तर पहा खूप गोष्टींची माहिती तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्हाला समजेल की आपण जो विचार करतो तो त्याच्या खूप विरुद्ध पोलीस नोकरी करतो.



                         धनश्री सुगावकर वागरे

                            सातवा माळा बिल्डिंग नंबर 1 आर. ए .के .मार्ग पोलिस अधिकारी , वसाहत शिवडी, (प) मुंबई.

      9096504021



Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...