Skip to main content

जर पोलिस संपावर गेले तर ...... धनश्री सुगावकर यांचा वाचनिय लेख

 

               


                         आपण शाळेत असताना वेगवेगळ्या प्रकारचे खूप निबंध लिहिलेलं  आहेत. जसे की कामगार  संपावर गेले तर ,शिक्षक संपावर गेले तर, डॉक्टर संपावर गेले तर, अशा विविध प्रकारचे निबंध आपण प्रत्येक  विषयावर लिहिलेले आहेत. पण तुमच्या मनात कधी असा विचार आला का, जे पोलिस संपावर गेले तर...... हा निबंध कधी लिहिला का तुम्ही ?का कधी या विषयाचा विचार केला का? कारण मी सांगते आपण असा विचार कधीच केला नाही, कारण आपल्या सभोवतालचे वातावरण याला जबाबदार आहे. म्हणजे बर्‍याच लोकांचे असे विचार आहेत की, पोलिसांची नोकरी खूप मस्त खूप मस्त असते. बाहेर पोलीस पोलिसांना सर्व घाबरतात .ते काहीच काम करत नाहीत. दादागिरी करतात ,कोणतीही वस्तू घ्यायची तर त्यांना ती फुकटच मिळते ,अशी वेगवेगळ्या प्रकारचे विचार काही लोक करतात. पोलिसांच्या कामाची सत्य परिस्थिती ही खूप कमी लोकांना माहीत आहे जर पोलिस संपावर गेले तर हा विचार केला तर.... अंगावर शहारे येतील. शिक्षक संपावर गेले तर शिक्षणाचे विद्यार्थ्यांचे कसे होईल ,कामगार संपावर गेले तर कारखान्याचे तसेच दैनंदिन वस्तू लागतात त्याचे कसे होईल ,डॉक्टर संपावर गेले तर पेशंट कसे होईल, असे आपण विचार करतो पण पोलिस संपावर गेले तर बापरे विचार जरी केला तर अच्छा देश समोर दिसतो हो ना?

             एक दिवस पोलीस स्टेशन बंद राहिले ,तर किती खुन होतील, दरोडे पडतील, चोऱ्या होतील, भांडणे होतील ,मुलींची छेडछाड होईल,  याचा विचार करा. जगामध्ये सर्व संपावर जाऊ शकतील, पण पोलीस संपावर नाही जाऊ शकणार कारण पोलिसांना माहिती आहे की आपण जर संपावर गेले , तर देशाचे काही खरे राहणार नाही. एक दिवसात  सर्व संपून जाईल. जनजीवन विस्कळीत होईल इतका पोलीस विचार करतो तरी तो आपल्या नजरेत काटो असतो त्याचे जनतेप्रती काम दिसत नाही का?

                        पोलिसांच्या पण खूप समस्या आहेत. तरी आतापर्यंत त्यांना कोणी विचारले का तुमच्या काही समस्या आहेत का ?त्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचू. पोलिसांचे जर काम पाहिले तर ते 24 तास आपले कर्तव्य बजावतात  .त्यांना कधी ठरावीक वेळ नाही की त्यांनी  इतका वेळ काम करावे आणि जास्तीचे काम केल्यावर त्यांना त्या कामाचे पैसे सुद्धा मिळत नाहीत मग पोलीस आणि संपावर का गेले नाही पाहीजे. आपल्याला जर एखादी इमर्जन्सी आली तर आपण सर्व कामे सोडून जातो तशी जर  पोलिसांना इमर्जन्सी आली तर पोलिस जाऊ शकत नाहीत कारण त्यांना काम असते आपल्या कर्तव्य पेक्षा कोणते काम त्यांना महत्वाचे वाटत नाही मग पोलिसांनी संपावर का जाऊ नये? वाढदिवस ,पार्ट्या ,कार्यक्रम ,लग्न सोहळा असे विविध कार्यक्रम आपण करत असतो पण बाराही महिने पोलीस कोणताही सण साजरे करू शकत नाही मग पोलिसांनी संपावर का जाऊ नये ?स्वतःच्या मुलाचा  वाढदिवशी तो हजर नाही राहु शकत किती वाईट परिस्थिती आहे.

                     एक तर पोलिसवाला सांगत होता की त्याच्या मुलीची लग्न  पाठवनी होती पण तो घरी जाऊ शकला नाही कारण महत्त्वाचा बंदोबस्त लागला होता हे ऐकून  मन सुन्न झालं.  हे ऐकून खूपच त्रास झाला की, अशी कशी पोलिसांची नोकरी की तो मुलीला वाट सुद्धा लावू शकत नाही मग पोलिसांनी संपावर का जाऊ नये? 

      सकाळी आठ नऊ वाजता गेलेला पोलीस हा रात्री दहा-अकरा वाजता घरी येतो किती वेळ ही नोकरी.सारखे  दिवस-रात्र काम करायचे . पोलिस संपावर गेले तर देशाचे खूप मोठे नुकसान होईल, हा विचार जरी केला तर समजेल .पोलिस हा जनतेचा कणा आहे ,त्यामुळे त्याचा आदर करायला शिका, त्यांना सहाय्य करा .पोलीस हा पण माणूसच आहे त्यांना बोलून तर पहा खूप गोष्टींची माहिती तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्हाला समजेल की आपण जो विचार करतो तो त्याच्या खूप विरुद्ध पोलीस नोकरी करतो.



                         धनश्री सुगावकर वागरे

                            सातवा माळा बिल्डिंग नंबर 1 आर. ए .के .मार्ग पोलिस अधिकारी , वसाहत शिवडी, (प) मुंबई.

      9096504021



Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला