Skip to main content

किनवट च्या नागरीकांना पेट्रोल-डिझेल पासून मिळणार मुक्तता..!

 


किनवट :(तालूका प्रतिनिधी) 

          भारताला इंधनामध्ये स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारचे अथक प्रयत्न चालू असून त्याचाच एक भाग म्हणून CNG, PNG  गॅस व सेद्रिंय खत तयार करण्यासाठी  मोठ्या प्रमाणामध्ये भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने किनवट मध्ये CNG तयार होणारा असून  मोटरसायकल, आटो, कार ह्या वाहनासाठी CNG गॅसपंम्प सुरु होणार आहेत. त्याच बरोबर घरगुती गॅस तयार होणार आहे. सेंद्रिय खत शेतक-यांना दोन वर्ष मोफत देऊन सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तर मालाला बाजारपेठ उपलब्ध करुण देण्यात येईल. यासाठी नागरीकांनी सभासद होणे आवश्यक आहे. 

         बायो CNG म्हणजे गवत, काडीकचरा इत्यादी पासून नैसर्गिकरीत्या गॅस तयार करण्यात येतो. ज्यावर आता शहरातील मोटरसायकल, ऑटो,  कार  चालणार आहेत. त्यामुळे वाढत्या पेट्रोल व डिझेल किंमती पासुन कायमची मुक्तता तर  किनवट तालुका इंधनामध्ये स्वयंपूर्ण होऊन देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये वाटा उचलणार आहे. 



         बायो - CNG पासून शेतकऱ्यांनाही वर्षाला लाखोचे उत्पन्न एका एकर मध्ये मिळनार आहे. पुर्णपणे सेंद्रिय खतांवर आधारीत  गवत शेतकर्‍यांनी शेतात लावायच आहे.  त्यामुळे जमिनीच पत सुधारेल व  गॅसही मिळेल. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून CNG अतिशय फायदेशीर असल्याने दुहेरी फायदा आता किनवट तालुक्यातील नागरीकांना मिळणार आहे. 

        किनवट शहरामध्ये व परिसरात बायो सीएनजी पंप सुरू होणार असून याची नोंदणी करणाऱ्याला नागरीकांना CNG मिळणार आहे. तेव्हा लवकरात लवकर एम.सी.एल, गव्हाणे बायोफ्युल  व जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकडे संपर्क करून याचे सभासद व्हावे आणि भविष्यामध्ये विविध योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विनायक गव्हाणे ,चंपतराव जाधव ,सुरेश सोळंके पाटील, सौ.सुमनताई तिडके, राजु पाटील साळुंखे, बाळकृष्ण कदम, गौरव नेम्मानीवार यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...