Skip to main content

एक -एक शब्द एक ग्रंथ निर्माण करते.प्रत्येक शब्द म्हणजे भाषा आहे. शब्द वाढल्याशिवाय भाषा वाढणार -प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ऑनलाईन कार्यक्रमात यांचे गौरवोद्गार"

(किनवट वृतांत:)

 एक -एक शब्द एक ग्रंथ निर्माण करते.प्रत्येक शब्द म्हणजे भाषा आहे. शब्द वाढल्याशिवाय भाषा वाढणार नाही.असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड भाषा, वाङमय व संस्कृती अभ्यास संकुल आणि बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किनवट मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कार्यक्रमात प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी व्यक्त केले.प्रारंभी पूज्य वंदनीय स्वामी रामानंद तीर्थ, थोर समाजसुधारक बळीराम पाटील यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.


हा कार्यक्रम किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य सुरेश पाटील यांच्या स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.एस.के.बेंबरेकर होते.मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून प्रा. डॉ.वैजनाथ अनमुलवाड, तर प्रमुख पाहुणे प्रसिध्द वक्ते डॉ. आनंद इंजेगावकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख प्रा.डाॅ.पंजाब शेरे यांनी केले.पुढे बोलतांना डॉ. अनमूलवाड सर म्हणाले,मराठी भाषा समृद्ध करावी लागणार आहे. अनेक बोलीतून भाषा तयार होत असते. प्रत्येक भाषा एक वेगळे अस्तित्व निर्माण करीत असते.आपल्या सर्वांना भाषिक लोक चळवळ गतीमान करावी लागणार आहे. मातृभाषेतून शिक्षण मिळावे. बहुभाषिक शाळा हवी असे मत व्यक्त करुन या वेबिनारचे उदघाटन झाल्याचे जाहीर केले. 

प्रमुख पाहुणे डॉ. आनंद इंजेगावकर यांनी आपल्या व्याख्यानातून, मराठी भाषिकांनी नवे नवे शोध लावावे. नव्या शोधातून पर्यायी शब्द निर्माण करावे. मराठी भाषा मरणार नाही. तिचे संवर्धन करावे. भाषेला जपावे असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर यांनी केला आहे. 

या आॅनलाईन वेबिनारमध्ये भारत जोडो युवा अकादमीचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, प्रा. डॉ. सुरेंद्र शिंदे,याच्यासह मराठी भाषेचे विद्यार्थी ,संशोधक ,अभ्यासक उपस्थित होते. आभार, डॉ. पंजाब शेरे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.