Skip to main content

एक -एक शब्द एक ग्रंथ निर्माण करते.प्रत्येक शब्द म्हणजे भाषा आहे. शब्द वाढल्याशिवाय भाषा वाढणार -प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ऑनलाईन कार्यक्रमात यांचे गौरवोद्गार"

(किनवट वृतांत:)

 एक -एक शब्द एक ग्रंथ निर्माण करते.प्रत्येक शब्द म्हणजे भाषा आहे. शब्द वाढल्याशिवाय भाषा वाढणार नाही.असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड भाषा, वाङमय व संस्कृती अभ्यास संकुल आणि बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किनवट मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कार्यक्रमात प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी व्यक्त केले.प्रारंभी पूज्य वंदनीय स्वामी रामानंद तीर्थ, थोर समाजसुधारक बळीराम पाटील यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.


हा कार्यक्रम किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य सुरेश पाटील यांच्या स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.एस.के.बेंबरेकर होते.मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून प्रा. डॉ.वैजनाथ अनमुलवाड, तर प्रमुख पाहुणे प्रसिध्द वक्ते डॉ. आनंद इंजेगावकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख प्रा.डाॅ.पंजाब शेरे यांनी केले.पुढे बोलतांना डॉ. अनमूलवाड सर म्हणाले,मराठी भाषा समृद्ध करावी लागणार आहे. अनेक बोलीतून भाषा तयार होत असते. प्रत्येक भाषा एक वेगळे अस्तित्व निर्माण करीत असते.आपल्या सर्वांना भाषिक लोक चळवळ गतीमान करावी लागणार आहे. मातृभाषेतून शिक्षण मिळावे. बहुभाषिक शाळा हवी असे मत व्यक्त करुन या वेबिनारचे उदघाटन झाल्याचे जाहीर केले. 

प्रमुख पाहुणे डॉ. आनंद इंजेगावकर यांनी आपल्या व्याख्यानातून, मराठी भाषिकांनी नवे नवे शोध लावावे. नव्या शोधातून पर्यायी शब्द निर्माण करावे. मराठी भाषा मरणार नाही. तिचे संवर्धन करावे. भाषेला जपावे असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर यांनी केला आहे. 

या आॅनलाईन वेबिनारमध्ये भारत जोडो युवा अकादमीचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, प्रा. डॉ. सुरेंद्र शिंदे,याच्यासह मराठी भाषेचे विद्यार्थी ,संशोधक ,अभ्यासक उपस्थित होते. आभार, डॉ. पंजाब शेरे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला