Skip to main content

थोर समाज सुधारक बळीराम पाटील यांच्य४८ व्या स्मृतीदिना निमित्त रक्तदान शिबीर संपन्न



(ता. प्र. किनवट/ राजेश पाटील)

 बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात एकुण चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रारंभी थोर समाजसुधारक स्मृतीशेष बळीराम पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांचा प्रेरक अर्धकृत्ती पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, माजी आयुक्त, वसई विरार,मुंबई येथील गोविंद राठोड,किशिसस्थेचे सचिव शंकरराव चाडावार, कोष्याध्यक्ष जसवंतसिंग सोखी,डाॅ.प्रशांतजी मांडवी, माजी प्राचार्य वि.मा.शिंदे, रक्तदान शिबिराचे उदघाटन डॉ. यू. पी.धुमाळे, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. घोडके ऋषीकेश ,महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर, उपप्राचार्य प्रा. राजकुमार नेम्मानीवार, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील ,राष्ट्रीय छात्र सेना विभागप्रमुख प्रा. काझी एस.एस.रासेयो स्वयंसेवक किशोर आडे , निलेश राठोड, यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा विभागीय समन्वयक प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी केले. प्रास्ताविकातून थोर समाजसुधारक स्मृतीशेष बळीराम पाटील यांच्या समाजिक, शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला.रक्तदानांचे महत्त्व सांगितले.याप्रसंगी महाविद्यालयास पहिल्यांदा सदिच्छा भेट दिल्यामुळे गोविंद राठोड, माजी आयुक्त ,वसईविरार,मुंबई यांचा सत्कार महाविद्यालय,व संस्थेच्या वतीने करण्यात आले.किनवट शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय व रुग्णालय,नांदेड येथील रक्तसंक्रमण अधिकारी संपूर्ण टीमचे स्वागत करण्यात आले.राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी भारतीय सैन्य दलात लागल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना या महभंयकार रोगाची लागण झाल्याने संपूर्ण जग एका बिकट परिस्थितीत वावरत आहे.आशा बिकट परिस्थितीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रक्तदान शिबिर घेऊन एकुण चाळीस पिशव्या रक्तसंक्रमण करण्यात आले.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबीर घेऊन सेवा करण्याचे काम रासेयो विभागाने केले आहे. रासेयो स्वयंसेवक, स्वयंसेविका, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक,शाखा बळीराम पाटील महाविद्यालय,किनवट माजी पर्यवेक्षक प्रा. प्रकाश उत्तरवार यांनी सत्तरा वेळा रक्तदान केले.ती परंपरा पुढे चालू ढेवण्यासाठी त्यांचा मुलगा शंतनू उतरवार यांनी रक्तदान केले.एलआयसी डि.ओ.प्रतिक मुनेश्वर, नगर परिषद किनवट येथील विद्युत अभियंता विनोद पवार, हिंदी विभागाचे डॉ. गजानन वानखेडे, रासेयो स्वयंसेविका कोमल राठोड, सामाजिक क्षेत्रातील यमुना केंद्रे, ज्योती कोटावार,महम्मद कलीम, म. हाजी, जफर खान अफीफ खान, संदीप येशीमोड,यांनीही रक्तदान केले.एकुण चाळीस रक्तदात्यांनी स्वइच्छेने रक्तदान केले.



कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रासेयो सल्लागार प्रा. डॉ. आनंद भालेराव,डाॅ.अंबादास कांबळे, डॉ. सुरेंद्र शिंदे, प्रा. विजय खूपसे, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.लता पेडलवाड , कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र धात्रक, डि. टी. चाटे, रासेयो स्वयंसेवक किशोर आडे, निलेश राठोड, अनिकेत पहूरकर,अनिकेत ठाकुर,सुधीर पाटील याच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.रक्तदान शिबिराचे संचलन रासेयो क. म. कार्यक्रम अधिकारी प्रा. पुरुषोत्तम येरडलावार यांनी केले.तर आभार महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. सुलोचना जाधव यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला