Skip to main content

स्त्रीयात्त्वाची साखळी




ती एक नैसर्गीक प्राकृती...

हलती, बोलती, चालती आकृती

म्हणजे स्त्री...

पूर्वीच्या काळी स्त्री म्हणजे एक चाकोरीबद्ध जीवन जगणारी अनेक निर्बंध सहन करणारी स्त्री होती.  पण जसजसं जग आधुनिक होत गेलं तसं तसं स्त्रियासुद्धा आधुनिक विचारांच्या होतं गेल्या. आजची स्त्री महिला ज्या उच्चपदावर कार्य करीत  आहेत त्यानुषंगाने घरातील बंधने त्यांच्या वरील सेल होताना दिसत आहेत .

  आज पुरुषांपेक्षा स्त्रिया ह्या  मोठा पदावर कार्यरत असून ..जे कार्य पुरुष करीत आहेत व त्यांची मक्तेदारी दाखवत आहेत. त्याच क्षेत्रामध्ये महिलां कंबर कसून  कार्यरत आहेत.

उदा: संरक्षण क्षेत्र, विमान, रेल्वे वाहतूक क्षेत्र, अंतराळायीन क्षेत्र, न्यायालयीन क्षेत्र अश्या अनेक अवघड समजली जाणारी क्षेत्रे याचबरोबर शेती-ग्रहउद्योग अशी बरीच क्षेत्रे आज महिलांनीकाबिज केली आहेत. व त्यात स्त्रिया अतुलनीय अशी प्रगती ही करीत आहे. 

आजच्या घडीला पाहता महिला व मुली या शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा आघाडीवर आहेत. पूर्वीच्या काळी स्त्रीयां वरती अनेक बंधने होती त्या शाळेत जात नव्हत्या, शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांच्या वर बंधने घातली जात होती. परंतु आजचे चित्र बदलले आहे. 

भारतात आज 80 टक्के स्त्रिया हा स्वातंत्र्य काळात नंतर  सुशिक्षित झाल्या आहेत. आजकाल प्रत्येक पालक आपल्या मुलीला शाळेत पाठण्यासाठी व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी

पुढाकार घेत आहे. 

आजची स्त्री ही आधुनिक विचारसरणीची आहे. जिथे महिलांवर अन्याय होतो तिथे आवाज उठवणारी आहे .ऐवढेच नाही तर प्रत्येक महिला ही त्यांची परिधन करायची वस्त्र आणि गरज 

ही ओळखुन आहे. तसेच  लग्न जुळताना करण्यात येणार्या विचारांवर सुद्धा आधुनिक झाल्या आहेत.  

महिलांवर होणार्या अत्याचाराचा विचार करता आज कायदा व सुव्यवस्था त्याच्या पाठशी आहे. त्यामुळे अत्याचारावर त्या ठामपणे बोलताना दिसत आहेत .याचबरोबर महिला संरक्षण कायदा किंवा महिला आरक्षण या विषयावर त्या लढाई देताना दिसत आहेत . 

आज महिला घरातील बंधने झुगारून देत आहेत.  ज्या महिला चूल आणि मूल एवढ्यावरच होत्या ते आज अनेक क्षेत्र पादाक्रांत करत आहेत. स्त्रिया संबंधित कुठलाही इतिहास काढून पाहिल्यास असे कळते की कुठल्याही कार्यास त्यांनी हात लावल्यास ते त्याचं यशस्वीच झालेले दिसून येते...त्याग, समर्पण, बलिदान यात ही त्या मागे नाहीत.

 "स्त्री हा समाजाचा मूलभूत घटक... नवी पिढी घडवणारी, कुटुंबव्यवस्थेला आकार देणारी, घराघरात सुसंवाद राखणारी... समाजात स्त्रीचं स्थान जितकं महत्त्वाचं, आदराचं, तितकाच तो समाज सभ्य, सुसंस्कृत. समजला जातो...

 मुलगी, बहीण, मैत्रीण, आई, पत्नी वा अन्य जिव्हाळ्याची ही नाती स्त्रियांमुळे जोपासली जातात.. स्त्रीमुळे नातेसंबंधात एक वेगळीच मृदुता, जिव्हाळा, माया, प्रेम उत्पन्न होते. स्त्रियांमध्ये

 खरी आत्मनिर्भरता येते ती आंतरिक बदलातून, वैचारिक आणि आध्यात्मिक परिवर्तनातून, शास्त्रीय ज्ञानातून, निकोप  शरीरस्वास्थ्यातून आणि तर्कशुद्ध विचारसरणीतून... केवळ स्त्रियांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही आत्मनिर्भर होऊन आपला व्यक्तिमत्वविकास कसा साधावा...हा बदल स्त्रियां मुळेच शक्य आहे.

आजच्या युगात स्त्रीयाने मोठी प्रगती केली असली तरी, कुठे तरी त्यांच्या मनात इतरांविषयी ईर्षा, द्वेश,मत्सर आणि तिरस्कार अजून ही घर करून उरलेलं आहे.

तो भाव जोपर्यंत बंद होत नाही... तो पर्यंत प्रत्येक स्त्री ही दुसर्या स्त्री ची वैरी राहणार आहे. त्यामुळें एकमेकास साह्य करून स्त्रियां च्या आत्मनिर्भर व आत्मसम्मान ची साखळी बनूया...बस एवढंच...

माझ्या सर्व सखीनां महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...




रूचिरा बेटकर,नांदेड.

9970774211

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला